शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कलिंगड उत्पादकांत चिंतेचे वातावरण; मेहनत। खर्च निघेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:10 IST

किशोर मोकलकर - आसेगाव पूर्णा : कोरोना महामारीचे संकट, त्यात अवकाळी पाऊस पडल्याने यावर्षी सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

किशोर मोकलकर - आसेगाव पूर्णा : कोरोना महामारीचे संकट, त्यात अवकाळी पाऊस पडल्याने यावर्षी सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याही परिस्थितीत स्वत:ला सावरत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कलिंगड शेती केली. पीकही बहरून आले. मात्र या पिकाला तालुक्यात बाजारपेठ उपलब्ध नाही. तसेच मालाच्या साठवणुकीसाठी गोडाऊन उपलब्ध नसल्याचा फायदा व्यापारी उठवत आहेत. त्यातच कोरोनाने परत डोके वर काढले व पुन्हा लॉक डाऊन लागल्यामुळे व्यापारी शेतकर्‍यांना भीती दाखवत माल खरेदीसाठी येतच नाहीत. यामुळे बहरून आलेले कलिंगडाचे उत्पादन कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ येथील शेतकर्‍यांवर आली आहे.

अचलपूर तालुक्यात सोयाबीन खालोखाल कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये वाल, तूर, मूग, तीळ, उडीद, मटकी, चवळी आदी रब्बी पिके घेतली जातात. परंतु यावर्षी हवामान बदलाचा फटका रब्बी पिकांना बसल्याने ही पीकेही शेतकर्‍यांच्या हातून गेलेलीच आहेत. यातून सावरण्यासाठी कर्ज काढून भाजीपाला, कलिंगड, पपई ही फळशेती करण्याचा प्रयत्न करून सोयाबीन, रब्बी पिकातून झालेली हानी भरून काढण्याचा प्रयत्न येथील शेतकरी करून पाहत होता. कलिंगडचे पीकही बहरून आले आहे. मात्र खरेदी करणारे व्यापारी लॉक डाऊनमुळे फिरकतच नसल्याने मातीमोल किमतीत कलिंगडाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने बळीराजा मात्र आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्गाचा लहरीपणा व कोरोना महामारीचे संकट यावर मात करून येथील शेतकर्‍यांनी कलिंगडाची उत्तम शेती केली आहे. पीकही बहरून आले आहे. मात्र योग्य दराने विक्री होत नसल्याची खंत येथील शेतकरी सतीश जवंजाळ यांनी व्यक्त केली.