शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

असाईनमेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:09 IST

दोन महिन्यांपासून केंद्रचालकांना अनुदानाची प्रतीक्षा, रस्त्यावरील नागरिकांसह रुग्णांच्या नातेवाइकांना लाभ अमरावती : कोरोनाकाळात कुणीही उपाशी राहू नये म्हणून राज्य ...

दोन महिन्यांपासून केंद्रचालकांना अनुदानाची प्रतीक्षा, रस्त्यावरील नागरिकांसह रुग्णांच्या नातेवाइकांना लाभ

अमरावती : कोरोनाकाळात कुणीही उपाशी राहू नये म्हणून राज्य सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली. यातून अनेकांचे पोट भरले. मात्र, एक ते दोन महिन्यापासून केंद्रचालकांना मिळणारे अनुदान थकले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. यामुळे अनेकांच्या हाताचे काम गेले, तर अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आली. अशातच राज्य सरकारने मदतीचा हात पुढे करीत या संकटकाळात कुणीही उपाशी राहू नये म्हणून शिवभोजन थाळी देण्याचे ठरविले.

जिल्ह्यातील २३ शिवभोजन केंद्रांतून अनेकांना पोटभर जेवण मिळत असून या योजनेमुळे गरिबांना दिलासा मिळाला. मात्र, सध्या महिनाभराचा कालावधी लोटला असतानाही केंद्रचालकांना अनुदान मिळाले नसल्याने त्यांच्यासमोर संकट उभे ठाकले आहे. तरीही गरिबांना मोफत भोजन देण्याचा ध्यास त्यांनी सोडला नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. अमरावती शहरात सहा व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १७ शिवभोजन केंद्रांतून गरिबांना नि:शुल्क पोटभर भोजन दिले जात आहे. एकंदर ही योजना कोरोना संकटात गरजूंसाठी लाभदायी ठरली आहे.

प्रतिथाळी ४० रुपये अनुदान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत थाळीच्या अनुदानासाठी शासनाकडून शहरी भागासाठी प्रत्येकी ५० रुपये, तर ग्रामीण भागासाठी ३५ रुपये अनुदान मिळते. शिवभोजन थाळीत वरण, भात, भाजी, दोन चपात्यांचा समावेश असतो.

अनुदान रखडूनही थाळी संख्या वाढली

शहरातील पीडीएमसीतील शिवभोजन केंद्रात लॉकडाऊनमध्ये पूर्वी दररोज १९० थाळी वाटप केले जात होते. मात्र, आता तेथे रोजी २८५ थाळी वितरित होत आहेत. सामान्य नागरिकांसह रुग्णांच्या नातेवाइकांनाही त्याचा लाभ होत आहे. मात्र, शहर हळूहळू अनलाॅक होत असताना काही केंद्रांवरील वितरणात घट आली आहे.

कोट

केंद्रचालक काय म्हणतात...

कुणीही गरजू उपाशी राहू नये, हा योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मे आणि जूनमध्ये थाळी संख्या वाढवून दिली. अलीकडे पीडीएमसीमधील केंद्रावरून दररोज २८५ जणांना मोफत शिवभोजन थाळी देत आहोत. अडचणी येत राहतात, पण, सामान्य लोक रोज पोटभर जेवतात त्याउपर समाधान तरी काय?

- अतुल इंगोले, शिवभोजन केंद्रचालक, पीडीएमसी

कोट २

एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात अधिक लोकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. आमच्या केंद्रात मागील महिन्यांपासून थाळी संख्या वाढविण्यात आली. दोन महिन्यांचे अनुदान अप्राप्त आहे. मात्र, कुठलीही तक्रार नाही. पुण्याचे काम करतोय.

- धीरज कोकाटे, बाजार समिती केंद्रचालक

कोट

जिल्ह्यात एकूण २३ शिवभोजन केंद्रांतून गरजूंना पोटभर जेवण दिले जात आहे. अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विभागाकडे पुरेसा निधी आहे. काहींचे जीएसटी क्रमांक, तर काहींची देयके अद्याप अप्राप्त आहेत.

अनिल टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अमरावती

जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र २३

आतापर्यंत किती जणांनी घेतला लाभ ६,८२, ९५१

----------------------