शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

आश्रमशाळांच्या ‘स्वयंपाक खोल्या’ विनापरवाना

By admin | Updated: July 20, 2016 23:54 IST

शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळांमधील स्वयंपाक खोल्या विनापरवाना असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कागदोपत्री हजेरी : मुलींची ‘मासिक’ कुचंबना, अशुद्ध पाणी पुरवठानरेंद्र जावरे परतवाडाशासकीय आणि अनुदानित आश्रम शाळांमधील स्वयंपाक खोल्या विनापरवाना असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जेवनातून विषबाधा झाल्याचा त्याला जबाबदर कोण, हा प्रश्न अनुत्तरीत असून शेकडो मुलींची मासिक कुचंबना सुरू असल्याचे संतापजनक चित्र आहे. शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थ्यांची परवड सुरू आहे. शासनाच्या सोयी सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचतच नसल्याचे वास्तव बुधवारी ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यावर सर्वत्र एकच खळबळ उडाली. शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार काही संस्थाचालक करीत असून, शासकीय आश्रम शाळांमध्ये निकृष्ट साहित्याचा पुरवठा आणि धान्याची चोरी ‘आम बात’ असल्याचे दस्तुरखुद्द आदिवासी आता बोलू लागले आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार आश्रम शाळांमधील स्वयंपाकगृहे अन्न व औषध प्रशासनातर्फे दरवर्षी परवाना काढलेली असणे आवश्यक आहे.विनापरवाना स्वयंपाकगृहेपरतवाडा : शासकीय नियमानुसर फी भरुन घ्यावा लागणरा परवाना आश्रम शाळांनी काढलाच नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. का काढतात परवाना ? स्वयंपाकगृहात कुठल्याही प्रकारची विषबाधा झाली किंवा अपघात झाल्यास हा परवाना नयिमानुसार उपयुक्त ठरतो. तर स्वयंपाकी की मदतनीस यांना काही संसर्गजन्य रोग आहे का, याची तपासणी व तसे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र संबनधित कर्मचाऱ्यांने जोडणे अनिवार्य आहे. मा आश्रम शाळा संहितेला पायदळी तुडवित विना परवाना आश्रमशाळा सुरू असल्याचे चित्र आहे. स्वतंत्र निवास व्यवस्थापन धाब्यावर आश्रम शाळांमधील मुलांची व मुलींची निवास व्यवस्था स्वतंत्ररित्या ठेवण्यात यावी, असे असताना वर्गखोल्यांमध्ये त्याचा रात्री मुक्काम नियमाची एैसीतैशी करणार ठरला आहे. राज्यपालांच्या सचिवांची भेटमहामहिम राज्यापालांचे सचिव परिमल सिंह बुधवारी चिखलदरा तालुक्यात रायपूर आश्रम शाळेला भेट दिल्याचे धारणीचे सहा प्रकल्प अधिकारी एन.के. सोनकांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राज्यपालांचे सचिव दोन दिवसांपासून मेळघाट दौऱ्यावर आहेत. त्यांना आश्रम शाळेत कुठलीच त्रुटी आढळून येवू नये, यासाठी प्रशासनाने पूर्वीच खबरदारी घेतल्याचे चित्र होते. जलशुद्धीकरण यंत्र नाहीआदिवासी आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यात यावे, हा नियम सुद्धा धाब्यावर असून नदी, नाल्यासह हातपंपाचे दूषित पाणी विद्यार्थ्यांना प्यावे लागत आहे. आश्रमशाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रच नसल्याचे उघड झाले आहे. मुलींची कुचंबना निवासी आश्रम शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थिनी असल्याने वयात आलेल्या मुलींच्या मासिक पाळीसाठी प्रत्येक आश्रम शाळांमध्ये ‘सॅनटरी नॅपकीन’चा क्वॉईन बॉक्स बसविणे नियमानुसार आवश्यक आहे. परंतु या प्रश्नाकडे शाळा व्यवस्थापन आणि प्रशासकीय शाळा तपासणी अधिकारी पूर्णत: दुर्लक्ष करीत आहेत. दहा रुपयांत चार नॅपकीन देण्याचा नियम कायद्यावरच थांबला असून यासाठी मात्र अनुदान लाटण्याची आणि शासकीय आश्रम शाळांमध्ये कागदोपत्री खरेदी करण्याची पद्धत आजही सुरू आहे