शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

परतवाडा शहरात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:12 IST

लाखो लिटर पाण्याचा अपव्यय परतवाडा : परतवाडा शहरात पाच दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरांतील काही भागात ...

लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

परतवाडा : परतवाडा शहरात पाच दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरांतील काही भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात काही नागरिकांनी स्वतः पैसे खर्च करून पाण्याचे टँकर आपल्या परिसरात बोलाविले आहेत.

भीषण कृत्रिम पाणीटंचाईला नगरपालिका प्रशासन जबाबदार असून, त्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. लाखो लिटर पाण्याचा अपव्यय यात होत आहे. यात नगरसेवक नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांना, तर नागरिक नगरसेवकांना हात जोडत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, शेवटच्या टोकावरील नागरिकाला पाणी मिळावे, याकरिता नगरसेवकांनी अनेक निवेदने नगरपालिका प्रशासनाकडे दिली आहेत. पण, या निवेदनांची साधी दखलही प्रशासनाने घेतलेली नाही.

परतवाडा शहरातील खापर्डे प्लॉट, ब्राह्मण सभा, घामोडिया प्लॉटसह अनेक भागातील उंचावरील क्षेत्रात या पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. यात नळ आल्यानंतरही तासनतास नागरिकांना पाण्याकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरात पाईप लाईनमधून येणाऱ्या पाण्याला प्रेशर नाही. नाईलाजाने काही नागरिकांना या पाईप लाईनवर मोटर बसवून पाणी उपसावे लागत आहे.

कोट्यवधींचा खर्च

परतवाडा शहराला पाणी मिळावे, पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, याकरिता जवळपास ७७ कोटी खर्च करून चंद्रभागा पाणीपुरवठा योजना नगरपालिकेकडून अस्तित्वात आणली गेली. पाणी वितरण व्यवस्था अंतर्गत मजबूत असे पाईपही टाकले गेले. लागलीच पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने अचलपूर व परतवाडा या शहरांकरिता परत नव्याने जवळपास ५० कोटीची अमृत पाणीपुरवठा योजना आणली गेली. या अमृत योजनेंतर्गत शहरात नव्याने पाईप टाकले गेले.

पाईपलाईन निकृष्ट?

शहरात रोडच्या एका बाजूने चंद्रभागेची, तर दुसऱ्या बाजूने अमृतची पाईप लाईन फिरविली गेली.

अमृत योजनेंतर्गत शहरात फिरविली गेलेली पाईप लाईन कमजोर असून, जमिनीत आत निर्धारित अंतरावर ती टाकली गेली नाही. अनेक ठिकाणी ही पाईप लाईन जोडली गेली नाही. ज्या ले-आऊटला मान्यता नाही, अशा भागातही ही पाईप लाईन फिरविली गेली. अनेक भागात अमृतची पाईप लाईन अगदी जमिनीवर उथळ बघायला मिळत आहे. त्यामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.