शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परतवाडा शहरात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:12 IST

लाखो लिटर पाण्याचा अपव्यय परतवाडा : परतवाडा शहरात पाच दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरांतील काही भागात ...

लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

परतवाडा : परतवाडा शहरात पाच दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरांतील काही भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात काही नागरिकांनी स्वतः पैसे खर्च करून पाण्याचे टँकर आपल्या परिसरात बोलाविले आहेत.

भीषण कृत्रिम पाणीटंचाईला नगरपालिका प्रशासन जबाबदार असून, त्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. लाखो लिटर पाण्याचा अपव्यय यात होत आहे. यात नगरसेवक नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांना, तर नागरिक नगरसेवकांना हात जोडत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, शेवटच्या टोकावरील नागरिकाला पाणी मिळावे, याकरिता नगरसेवकांनी अनेक निवेदने नगरपालिका प्रशासनाकडे दिली आहेत. पण, या निवेदनांची साधी दखलही प्रशासनाने घेतलेली नाही.

परतवाडा शहरातील खापर्डे प्लॉट, ब्राह्मण सभा, घामोडिया प्लॉटसह अनेक भागातील उंचावरील क्षेत्रात या पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. यात नळ आल्यानंतरही तासनतास नागरिकांना पाण्याकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरात पाईप लाईनमधून येणाऱ्या पाण्याला प्रेशर नाही. नाईलाजाने काही नागरिकांना या पाईप लाईनवर मोटर बसवून पाणी उपसावे लागत आहे.

कोट्यवधींचा खर्च

परतवाडा शहराला पाणी मिळावे, पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, याकरिता जवळपास ७७ कोटी खर्च करून चंद्रभागा पाणीपुरवठा योजना नगरपालिकेकडून अस्तित्वात आणली गेली. पाणी वितरण व्यवस्था अंतर्गत मजबूत असे पाईपही टाकले गेले. लागलीच पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने अचलपूर व परतवाडा या शहरांकरिता परत नव्याने जवळपास ५० कोटीची अमृत पाणीपुरवठा योजना आणली गेली. या अमृत योजनेंतर्गत शहरात नव्याने पाईप टाकले गेले.

पाईपलाईन निकृष्ट?

शहरात रोडच्या एका बाजूने चंद्रभागेची, तर दुसऱ्या बाजूने अमृतची पाईप लाईन फिरविली गेली.

अमृत योजनेंतर्गत शहरात फिरविली गेलेली पाईप लाईन कमजोर असून, जमिनीत आत निर्धारित अंतरावर ती टाकली गेली नाही. अनेक ठिकाणी ही पाईप लाईन जोडली गेली नाही. ज्या ले-आऊटला मान्यता नाही, अशा भागातही ही पाईप लाईन फिरविली गेली. अनेक भागात अमृतची पाईप लाईन अगदी जमिनीवर उथळ बघायला मिळत आहे. त्यामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.