शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

स्थापत्य अभियंत्याला न्यायालयाची ‘शो कॉज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 23:55 IST

स्थानिक सहदिवाणी न्यायालयाने महापालिकेच्या स्थापत्य अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात आपणाविरुद्ध फौजदारी कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.

ठळक मुद्देफौजदारी कारवाईची तंबी : सहदिवाणी न्यायालयाच्या स्मरणपत्राला केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक सहदिवाणी न्यायालयाने महापालिकेच्या स्थापत्य अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात आपणाविरुद्ध फौजदारी कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. न्यायालयाने संबंधित स्थापत्य अभियंत्यावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत.वाल्मीकी आंबेडकर योजनेतील घरकुलप्रकरणी किसन माहुरे विरुद्ध नर्मदा सदाफळे या खटल्यात ही नोटीस बजावण्यात आली. १९ एप्रिल रोजी न्यायालयाने महापालिकेला कमिश्नर रिट पाठवून अहवाल मागितला होता. मात्र, कार्यकारी अभियंता-२ कडे असलेल्या वाल्मीकी आंबेडकर आवास योजनेच्या संबंधित स्थापत्य अभियंत्याने न्यायालयात मुदतीत अहवाल सादर केला नाही. यामुळे न्यायालयाने ४ सप्टेंबरला स्मरणपत्र पाठवून १५ सप्टेंबरपर्यंत अहवाल देण्याचे निर्देश दिले; मात्र त्यानंतरही अहवाल सादर केला नाही. याप्रकरणी सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) पी.ए. पत्की यांच्या न्यायालयाने महापालिकेच्या स्थापत्य अभियंत्याला २१ सप्टेंबरला पुन्हा कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतरही या अभियंत्याने अहवाल आणि कारणे दाखवा नोटीसचे उत्तर देण्याची तसदी घेतली नाही. कमिश्नर रिट, स्मरणपत्र व एका कारणे दाखवा नोटीसनंतरही त्या अभियंत्याने तसदी न घेतल्याने दुसºयांदा ११ आॅक्टोबरला पुन्हा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. ती २६ आॅक्टोबरला विधी अधिकाºयांकडे प्राप्त झाली आहे.असे आहे प्रकरणमहापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बेलपुरा येथील नर्मदाबाई सदाफळे यांना तत्कालीन वाल्मिकी आंबेडकर योजनेतून घरकुल मंजूर झाले. मात्र, ते घरकुल आपल्या जागेत असल्याचा दावा त्यांच्या शेजाºयांनी केला. हा वाद महापालिका स्तरावर न मिटल्याने संबंधित दिवाणी न्यायालयात सन २००० साली धाव घेतली. या प्रकरणात महापालिकेच्या कार्यकारी अभियंता-२ कार्यालयाला त्यांची बाजू मांडायची होती. तसा अहवाल न्यायालयाला द्यावयाचा होता....तर फौजदारीचदुसºयांदा कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतरही ३१ आॅक्टोबरच्या आत अहवाल सादर केला नाही आणि कारणे दाखवा नोटीसचे उत्तर का दिले नाही याबाबत व्यक्तिश: हजर राहून म्हणणे लेखी मांडावे, अशी तंबी न्यायालयाने संबंधित स्थापत्य अभियंत्याला दिली आहे. ३१ आॅक्टोबरपर्यंत अहवाल व उत्तर सादर न केल्यास आणि यात कसूर झाल्यास पुढील फौजदारी कारवाईस आपण जबाबदार राहाल, असा इशारा न्यायाधीश पी.ए. पत्की यांनी दिला आहे.सहदिवाणी न्यायाधीशांची कारणे दाखवा नोटीस प्राप्त झाली. कार्यकारी अभियंता-२ याप्रकरणी ३१ आॅक्टोबरपर्यंत लेखी म्हणणे सादर करतील.- हेमंतकुमार पवारआयुक्त, महापालिका