शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

ऑक्सिजन सुविधेच्या रुग्णवाहिकांकडून मनमानी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:11 IST

अमरावती : कोरोनाचे वाढत्या संसर्गात काही रुग्णांची प्रकृती गंभीर होत असल्याने त्यांना ऑक्सिजनची उपलब्धता असणाऱ्या रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला नेले जाते. ...

अमरावती : कोरोनाचे वाढत्या संसर्गात काही रुग्णांची प्रकृती गंभीर होत असल्याने त्यांना ऑक्सिजनची उपलब्धता असणाऱ्या रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला नेले जाते. प्रसंगी बेड उपलब्ध नसल्यास अन्य रुग्णालयांतही न्यावे लागते. परंतु, या रुग्णावाहिकेच्या दराबाबत एकवाक्यता नाही. रुग्णांच्या नातेवाइकाची हतबलता पाहून मनमानी दराची आकारणी होत असल्याचा आरोप आहे.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात अनेक रुग्णावाहिकांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कधी मोफत, तर कधी माफक दरात सेवा दिली. मात्र, त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये झालेला कोरोना उद्रेक व आता मार्च महिन्यांपासून वाढलेल्या कोरोना संसर्गात मात्र रुग्णांच्या नातेवाइकांच्या हतबलतेचा गैरफायदा घेतला जात असल्याचे काही उदाहरणे समोर येत आहेत.

जिल्ह्यात ऑक्सिजन सुविधेच्या २९ रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी बहुतांश खासगी आहेत. या रुग्णवाहिका चालकांनी आता शासनाने निश्चत केलेले दर बासनात गुंडाळून ठेवले व दामदुप्पट भावाने आता आकारणी केली जात आहे. याबाबत अद्याप तक्रार प्राप्त नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. यावर नियंत्रण कुणाचे, असा सवाल रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.

पाईंटर

ऑक्सिजन असलेल्या : २९

शासकीय रुग्णवाहिका : १३०

ऑक्सिजन असलेल्या : १८

खासगी रुग्णवाहिका : २२१

बॉक्स

नियंत्रण कुणाचे?

शासकीय रुग्णवाहिका मोफत असली तरी ती वेळेवर उपलब्ध होईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे ऐनवेळी खासगी रुग्णवाहिकेला बोलवावे लागते. परिस्थिती अशी असते की, त्याने मागेल ते दर मुकाट्याने द्यावे लागतात, अन्यथा हा विलंब रुग्णांचे जिवावर बेतणारा ठरतो. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी अवस्था झालेली आहे.

बॉक्स

रुग्णांचे नातेवाईक हतबल

शासकीय रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नाईलाजास्तव खासगी रुग्णावाहिकेचा आधार घ्यावा लागतो. अशावेळी शासनाद्वारे निश्चित दराला विचारतो कोण, अशी परिस्थती उद्भवते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दर निर्धारित केले असले तरी रुग्णवाहिकाचालक सांगेल तो दर मुकाट्याने द्यावा लागत असल्याची व्यथा रुग्णाच्या नातेवाइकांनी बोलून दाखविली.

बॉक्स

तक्रार करायची तरी कुठे?

ऑक्सिजन असलेल्या खासगी रुग्णवाहिकेच्या मनमानी दराबाबत तक्रार करायची तरी कुठे, असा रुग्णांच्या नातेवाइकांचा सवाल आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता, जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ यांच्याकडे तक्रार दाखल करता येईल, असे सांगण्यात आले. याविषयीची पुरेशी प्रसिद्धी होणे महत्त्वाचे आहे.

कोट

ऑक्सिजन असलेल्या रुग्णवाहिकेच्या दरासंदर्भात यापूर्वीच दरनिश्चिती करण्यात आली. त्यानुसारच भाडे घेणे महत्त्वाचे आहे. आगाऊ दर आकारणी झाल्यास त्याविषयीची तक्रार करावी.

- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी