शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठात अभ्यास मंडळावर अपात्र व्यक्तींच्या नियुक्त्या, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप

By गणेश वासनिक | Updated: April 18, 2023 18:33 IST

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी नुकत्याच अभ्यास मंडळावर केलेल्या नियुक्त्या अपात्र व्यक्तीच्या ...

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी नुकत्याच अभ्यास मंडळावर केलेल्या नियुक्त्या अपात्र व्यक्तीच्या असनू, त्या रद्द करण्यात याव्यात, या आशयाच्या मागणीचे निवेदन मंगळवारी एका शिष्टमंडळाने प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर यांना दिले आहे.

१२ एप्रिल रोजी विद्यापीठाद्वारे काढलेले अधिसूचना क्रमांक ५७/२०२३ नुसार विविध अभ्यास मंडळावर नामनिर्देशित करण्यासाठी लागणारी आवश्यक पात्रता नसलेल्या अध्यापकांना नामनिर्देशित केले आहे. ही अधिसूचना काढून विविध विद्याशाखेतील विविध अभ्यास मंडळावर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ मधील कलम ४०(२) (ब), (आय), ४० (२) या कलमांचा वापर करून सहा अध्यापकांना नामनिर्देशित केले. त्यापैकी पदव्युत्तर अध्यापकांमधून दोन अध्यापकांना नियुक्त करणे अपेक्षित होते. परंतु राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, इंग्रजी या विषयांमध्ये नामनिर्देशासाठी लागणारी आवश्यक पात्रता नसताना सुद्धा अध्यापकांची वर्णी लागली आहे.

त्यामुळे डॉ. प्रमोद येवले यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. मान्यताप्राप्त विभाग प्रमुख नसलेल्या तीन अध्यापक नामनिर्देशन करताना सुद्धा 'कॉमर्स अँड मॅनेजमेंट' या विद्याशाखेमध्ये सुद्धा ज्या अध्यापकांनी विभाग प्रमुख म्हणून मतदान केलेले आहेत. त्याच अध्यापकांना दुसऱ्या अभ्यास मंडळामध्ये विभाग प्रमुख नसलेल्या प्रवर्गातून नऊ अध्यापकांच्या नियुक्त केलेल आहेत.

विशेषतः ज्या संलग्नित महाविद्यालयामध्ये संबंधित विषयातील पदवीधर अभ्यासक्रम आहेत व त्या विषयांना शिकविणारे मान्यताप्राप्त पदव्युत्तर अध्यापक आहे, अशी सलग्नित महाविद्यालयामधील दोन मान्यता प्राप्त पदव्युत्तर अध्यापकांचे नामनिर्देशन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी संबंधित विद्याशाखेच्या अधिष्ठात्याशी विचार विनिमय करणे अपेक्षित होते. परंतु दुर्दैवाने असे झाले नाही. अपात्र व्यक्तींच्या नियुक्त्या रद्द करण्यासाठी सिनेट सदस्य प्रशांत विघे, समीर जवंजाळ, अक्षय साबळे, सागर कलाने, ओमप्रकाश झोड यांनी निवेदनातून केली आहे.

मराठवाडा विद्यापीठाचा अमरावतीत पायंडा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी २०१९ मध्ये अशाच प्रकारच्या चुकीच्या नियुक्ती केल्या होत्या. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाली काढलेला असून ज्या महाविद्यालयांत पदव्युत्तर शिक्षण घेतल्या जाते. त्याच महाविद्यालयातील शिक्षकांना नामनिर्देशित करता येईल, असा स्पष्ट निवाळा दिला आहे. तरीही कुलगुरू डॉ. येवले यांनी हीच कृती अमरावती विद्यापीठावर थोपविली आहे.