शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

‘एक अग्रवाल, एक शेतकरी’ दत्तक योजना राबवा

By admin | Updated: January 4, 2015 23:04 IST

राज्यात दुष्काळ, नापिकी, अस्मानी संकटाने शेतकरी आत्महत्या करीत आहे. बळीराजा जगला तर समाज जगेल, अन्यथा समाजाला अन्न कोण पुरवेल, हा खरा प्रश्न आहे.

अमरावती : राज्यात दुष्काळ, नापिकी, अस्मानी संकटाने शेतकरी आत्महत्या करीत आहे. बळीराजा जगला तर समाज जगेल, अन्यथा समाजाला अन्न कोण पुरवेल, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या अग्रवाल समाजाने शेतकऱ्याला संकटातून वाचविण्यासाठी ‘एक अग्रवाल, एक शेतकरी’ दत्तक योजना राबविण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, उद्योग, खनिकर्म राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे रविवारी केले.येथील एका आलीशान हॉटेलमध्ये अग्रवाल समाजाचे २१ वे राज्यस्तरीय दोन दिवसीय संमेलनाच्या नवरत्न सन्मान सोहळ्याच्या वितरणाप्रसंगी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अग्रवाल समाजाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मेरठचे खा. राजेंद्र अग्रवाल, आ. गोपीकिशन बाजोरिया, गोपालदास अग्रवाल, अनिल अग्रवाल, रवी अग्रवाल, ओमप्रकाश अग्रवाल, रामविलास गुप्ता, मनोहर भूत, भालचंद्र गनेडिवाल, पन्नालाल अग्रवाल, गजेंद्र केडीया, मालती गुप्ता, संजय अग्रवाल, किशोर गोयनका, सुनील अग्रवाल, दीपक अग्रवाल, राजेश अग्रवाल, ओ.पी. अग्रवाल, मुरारीलाल सराफ आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. पोटे म्हणाले, अग्रवाल समाज हा कष्टाने मोठा झाला असून व्यावसायिकदृष्ट्या सक्षम आहे. राज्य नव्हे, तर देशभरात या समाजाचे जाळे पसरले आहे. महाराजा अग्रेसन यांच्या विचारसरणीनुसार मानवता धर्म अंगिकारुन प्रत्येक अग्रवालांनी एक शेतकरी दत्तक घेऊन त्याच्यावर आलेल्या संकटातून सावरावे, असे आवाहन त्यांनी केले. नामशेष होत असलेले गोेवंश वाचविण्यासाठी अग्रवाल समाजाने पुढाकार घेत त्यांच्याकडे असलेल्या जागेवर गोधन जपावे, असे ते म्हणाले. शेतकरी दत्तक ही योजना राबविताना अग्रवाल समाजाने गाईचे संगोपन करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी ना. प्रवीण पोटे, खा. राजेंद्र अग्रवाल, आ. गोपीकिशन बाजोरिया यांचा तिरुपती सत्कार करण्यात आला. दरम्यान अतिथींच्या हस्ते किशोर गोयनका, विजय मित्तल, मनोहर भूत, नंदकिशोर गोयल, प्रदीप मेहाडिया, कमलकिशोर अग्रवाल, संतोष भूत आदींना अग्रश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अग्रभूषण पुरस्कार मुरारीलाल सराफ यांना गौरविण्यात आले. शनिवारी अग्रवाल समाजाचे महिला संमेलन तर हास्य कविसंमेलन पार पडले. या कार्यक्रमाला आ. सुनील देशमुख, माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता, संजय अग्रवाल यांची उपस्थिती होती. समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १०१ समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)