शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
11
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
12
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
13
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
14
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
15
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
16
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
17
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
18
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
19
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
20
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू

सरपंचपदाचे आरक्षण तत्काळ जाहीर करा

By admin | Updated: February 11, 2015 00:24 IST

एप्रिल महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण तत्काळ जाहीर करा अशी मागणी महाराष्ट्र सरपंच संघटनेचे ...

टाकरखेडा संभू : एप्रिल महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण तत्काळ जाहीर करा अशी मागणी महाराष्ट्र सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बोंडे यांनी राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. राज्यातील १८ हजार ग्रामपंचायतीची मुदत संपुष्टात आल्यामुळे निवडणूक आयोगाला एप्रिल ते जून २०१५ पर्यंत टप्प्याटप्प्याने राज्यभरात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घ्यायच्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अर्ध्याअधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या टप्प्यात होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता मार्च महिन्यात आदर्श आचारसंहितासुद्धा सुरू होणार आहे. परंतु अद्यापही निवडणूक आयोगाने सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले नाही. त्यामुळे गाव पातळीवर गोंधळाचे वातावरण व राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. ग्राम पातळीवरील स्थानिक कार्यकर्त्यांना निवडणुकीचे नियोजन करणे सोयीचे व्हावे यासाठी एप्रिल महिन्यात निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण लवकर जाहीर करावे, अशी मागणी गजानन बोंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. (वार्ताहर)