शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

शंकरपटाच्या बंदीमुळे नाराजी

By admin | Updated: May 19, 2015 00:17 IST

न्यायालयाने शंकरपटावर बंदी घालून शेतकऱ्यांचा हिरमोड केला आहे. जो शेतकरी आपल्या बैलांना उत्कृष्ट खाद्य...

सशक्त बैलजोड्या घडणार कशा ? : शेतकऱ्याचे करमणुकीवर विरजणतळेगाव दशासर : न्यायालयाने शंकरपटावर बंदी घालून शेतकऱ्यांचा हिरमोड केला आहे. जो शेतकरी आपल्या बैलांना उत्कृष्ट खाद्य घालून त्याची मुलाप्रमाणे जोपासना करतो. मात्र शंकरपटाच्या माध्यमातून त्यांची परवड होत होती. हा प्रकार थांबविण्यासाठी न्यायालयाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला. परंतु यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. शंकरपटाच्या निमित्ताने घडविलेला बैल उत्तम सशक्त चपळ व शेती कामासाठी उत्कृष्ट असतो. बहुतांश शेतकरी अल्पवयीन गोऱ्ह्यास बदाम दुध, लोण्याचे गोळे, कणकीचे ऊंडे व अंडी चारून धष्टपुष्ट, चपळ व गुळगुळीत बनवून शर्यतीत उत्तम धारण्यायोग्य बनवतात. त्यामुळे त्याची किंमत वाढते. एरवी ३० ते ४० हजारांपर्यंतचा बैल घडविल्यानंतर चार ते पाच लाखांपर्यंत विकला जातो. अशा बैलाचा शेतकरी छळ कसा करू शकेल, शिवाय शेतकरीच बैलाच्या स्पर्धा भरवून उत्कृष्ट वायुवेगाने धावणाऱ्या जोडीसाठी हजारो रूपयांची बक्षिसे ठेवतात. त्याचाही फायदा शेतकऱ्यांनाच होतो. आई-वडील जसे लहान मुलांची जोपासना करून लहानाचे मोठे करून कमविता बनवतात. तसेच शेतकरी आपल्या गोऱ्ह्यांची खाण्यापिण्याची योग्य निगा राखून त्यास अंगाने व धावण्यास चपळ बनवितात. त्या बैलांना इजा पोहोचू देत नाही. त्याला योग्यवेळी व्हेटरनरी डॉक्टर्सकडून तपासून वेळेवर माणसाप्रमाणे औषध-पाणी देऊन त्याची विशेष काळजी घेतात. पूर्वी करमणुकीची साधने नसल्याने पारावरच्या गप्पांमधूनच शंकरपटाची संकल्पना पुढे आली. खेडे विभागात आजही करमणुकीची साधने नाहीत, करमणूक म्हणून हा शेतकऱ्यांचा छंदच म्हणावा लागेल. २० व्या शतकात जरी आमुलाग्र बदल झाला तरी खेड्यातून मोबाईल, टीव्ही शिवाय दुसरे करमणुकीचे साधन नाहीत. तो बैलांनाच देव मानून पोळ्याला अंगावर साज घालून त्याची पूजा करतो. शेतकऱ्यांनी जर बैलाविषयी क्रूरता दाखविली असती तर असा उत्कृष्ट व चपळ बैल तयार करू शकला नसता. अशा बैलाची राहण्याची व स्वच्छतेची उत्तमरीत्या काळजी घेतली जाते. गोचीड-गोमाशा अंगावर किंवा गोठ्यात होऊ न देता सायबरमेथीन औषधाची फवारणी करून त्या कीटकांचा नाश केला जातो. त्याची दररोज साबणीने अंघोळ करून स्वच्छता राखली जाते. तसेच शेण मलमूत्राची व्यवस्था केली जाते व थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण केले जाते. त्याची निगा राखण्यासाठी स्पेशल गडी ठेवली जाते. (वार्ताहर)कत्तलखान्यावर निर्बंध नाहीएकीकडे प्राण्यांची कत्तल होत असताना व कत्तलखाने वाढत असताना त्यावर निर्बंध नाही. या कत्तलखान्यामुळे गुराढोरांच्या संख्येत कमालीची घट झाली असून गायी गुरांनी भरलेले वाडे नेस्तनाबूत झालेले दिसत आहे. गोठे नुसतेच गोठे राहिले आहेत. श्रीमंतांचे वाड्यात पोळ्याचे पूजनासाठीसुद्धा बैल दिसत नाही व गाई-म्हशीचे प्रमाणही अत्यल्प झाले त्याचा परिणाम दूध-दुभत्यावर दिसून येत आहे व शेतीवरही शेणखत कमी आल्याने उत्पन्नात घट झाली असून शेतकऱ्यांसाठी दुय्यम धंदा असलेल्या पशुपालन व दुग्ध व्यवसाय अडचणीत येत आहे. त्यापासून शेतकरी दुरावत असून आत्महत्येकडे वळत आहे. पटाला गौरवशाली परंपरातळेगावचा शंकरपट हा महाराष्ट्रात प्रसिद्ध असून पटाच्या निमित्ताने भव्य यात्रा भरते. या यात्रेत शेतीपयोगी सर्व वस्तू किफायतशीर भावात मिळतात. या पटात बैलावर कोणताही क्रूर अत्याचार पूर्वीपासून केला जात नाही. या क्रूरतेविषयी प्रत्यक्ष खात्री करूनच निर्णय घेऊन शेतकऱ्याचे नैराश्य दूर करावे, अशी परिसरातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.