शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अंगणवाडीतील बालकांना शाळेचे दर्शन दुर्लभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:16 IST

अमरावती : सर्वत्र हाहाकार माजवून सोडलेल्या कोरोना संकटाने सर्वांचेच टेन्शन वाढविले असताना शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही. ...

अमरावती : सर्वत्र हाहाकार माजवून सोडलेल्या कोरोना संकटाने सर्वांचेच टेन्शन वाढविले असताना शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही. प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीच्या पहिल्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अंगणवाडी, बालवाडीतील गतवर्षातील विद्यार्थ्यांसह यावर्षीच्याही विद्यार्थ्यांना आपल्या शाळेचे दर्शन दुर्लभच होणार आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

गेल्यावर्षी पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाचे धडे घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तसेच सत्राच्या शेवटी परीक्षा न देता पुढील वर्गासाठी ते पात्र ठरले. परंतु अंगणवाडी, बालवाडीतील विद्यार्थ्यांना तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना आपल्या हातात वही, पाटी-पेन्सिल न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. त्या सर्वांनी आपल्या शिक्षकांसह शाळेचेही वर्षभरात तोंड पाहिलेले नाही. प्राथमिक विद्यार्थ्यांना त्या वर्गाचा अभ्यास तर सोडाच परंतु शाळा व तेथील शिक्षकांची ओळख देखील न होता त्यांनी दुसऱ्या वर्गात प्रवेश केला आहे. त्यामुळे इतर पालकांची चिंता अधिक वाढली आहे. यावर्षी लहान मुलांवर कोरोनाचे भयंकर संकट ओढवणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे जूनपासून शाळा नेहमी सुरू होणे अशक्य आहे. विद्यार्थ्यांना अक्षर ओळख, अंकज्ञान व अन्य विषयाचे ज्ञान न होता त्यांना पुढील वर्गात बसविणे पालकांना धोक्याचे वाटते. ऑनलाईन शिक्षणाचा विचार केल्यास ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांना अद्याप अँड्रॉईड मोबाइल उपलब्ध झालेला नाही. हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. ते मोबाईल विकत घेऊ शकत नाहीत. प्रत्येक गावात मोबाईलची रेंज नाही. असे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहापासून वर्षभर तरी दूर आहेत. वर्गातील प्रत्यक्ष शिक्षण व ऑनलाईन शिक्षणात फरक पडत असून प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणापेक्षा मोबाईलवरील खेळ व अनेक गोष्टीत अधिक रस वाटतो. पालक व शिक्षकांचे लक्ष चुकवून ते अशा गोष्टी करीत असतात. आनलाईन शिक्षण त्यांच्या पचनी पडण्यासाठी काही अवधी लागेल.

कोट

माझा मुलगा मागील वर्षी पहिलीत गेला. तो शाळेत न जाता पास झाला. आता यावर्षी शाळेची व शिक्षकांची ओळखही न होता तो दुसरीत जाईल. त्याच्या ज्ञानाचे काय?

अतुल कावरे, पालक