शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

...अन् आमदार घरी पोहोचलेच नाही

By admin | Updated: November 6, 2014 22:48 IST

मागील १६ दिवसांपासून आमदार घरी पोहोचले नाहीत, हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. पण हो हे खरे आहे. मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर हे १९ आॅक्टोंबर रोजी निवडून आल्यानंतर या एकच दिवशी घरी

मतदारांच्या भेटीगाठी सुरुच: प्रभुदास भिलावेकर मेळघाट दौऱ्यावरगणेश वासनिक - अमरावतीमागील १६ दिवसांपासून आमदार घरी पोहोचले नाहीत, हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. पण हो हे खरे आहे. मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर हे १९ आॅक्टोंबर रोजी निवडून आल्यानंतर या एकच दिवशी घरी ते आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पोहचले. त्यानंतर ते सतत मतदारांच्या भेटीगाठी आणि गावातील समस्या जाणून घेण्यासाठी ‘आमदार जनतेच्या दारी’ हा उपक्रम राबवित आहेत. एकदा निवडून गेले की, त्यानंतर कोणीही आमदार पाच वर्षे गावात येवून समस्या जाणून घेत नाही, ही मेळघाट मतदार संघातील मतदारांची निवडणूक प्रचारादरम्यान गाऱ्हाणी होती. मात्र प्रभुदास भिलावेकर हे भाजपचे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांनी आदिवासी मतदारांच्या या गाऱ्हाणीला प्रत्यक्ष कृतीत उत्तर देण्यासाठी गावोगावी जाऊन भेटीगाठी सुरु केल्या आहेत. विजयाच्या दिवशी एकदाच घरी गेले. त्यानंतर ते सतत मतदारांच्या भेटीगाठी घेत असून गावोगावी जावून आदिवासी बांधवांची कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. ऐवढेच नव्हे तर त्यांच्या समस्या व प्रश्न पोटतिडकीने ऐकून घेत आहे. मागील १६ दिवसांपासून आ. भिलावेकर यांचा हा शिरस्ता अव्याहतपणे सुरुच आहे. मेळघाटातील ४१५ गावांपैकी आतापर्यत ६५ गावांमध्ये जावून त्यांनी मतदारांशी संवाद साधला असून गावात करावयाच्या अतिमहत्वाच्या विकास कामांची नोंद सुद्धा ते घेत आहेत. मेळघाटात कुपोषण, वीज समस्या, पाणी, रोजगार, योजनांच्या अंमलबजावणीत होत असलेली घुसखोरी ही बाब आर्वजून निर्दशनात आल्याचे आ. भिलावेकर यांनी धारणी येथे बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमानंतर ते ‘लोकमत’ शी बोलत होते. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असून मेळघाटातही भाजपचे कमळ फुलले आहे. त्यामुळे आदिवासींच्या जीवनात नवी उभारी यावी, याअनुशंगाने आपण विकास कामे करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अख्ख्ये मंत्रीमंडळ मेळघाटात आणून येथील समस्यांवर तोडगा काढण्याची तयारी त्यांनी चालविली आहे. त्यामुळेच मेळघाट मतदार संघातील प्रत्येक गावात जात असताना तेथील समस्या, समजून आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या शासनाकडे सादर करताना वस्तुनिष्ठ असाव्यात यावर त्यांचा भर आहे. यापूर्वीचा लोकप्रतिनिधी म्हणून असलेला प्रशासकीय कामकाजांचा अनुभव भिलावेकर यांच्या पाठीशी आहे. ३५० गावांमधील समस्या, प्रश्न जाणून घ्यायच्या आहेत. याकरिता किमान दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे.