शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

...अन् आमदार घरी पोहोचलेच नाही

By admin | Updated: November 6, 2014 22:48 IST

मागील १६ दिवसांपासून आमदार घरी पोहोचले नाहीत, हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. पण हो हे खरे आहे. मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर हे १९ आॅक्टोंबर रोजी निवडून आल्यानंतर या एकच दिवशी घरी

मतदारांच्या भेटीगाठी सुरुच: प्रभुदास भिलावेकर मेळघाट दौऱ्यावरगणेश वासनिक - अमरावतीमागील १६ दिवसांपासून आमदार घरी पोहोचले नाहीत, हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. पण हो हे खरे आहे. मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर हे १९ आॅक्टोंबर रोजी निवडून आल्यानंतर या एकच दिवशी घरी ते आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पोहचले. त्यानंतर ते सतत मतदारांच्या भेटीगाठी आणि गावातील समस्या जाणून घेण्यासाठी ‘आमदार जनतेच्या दारी’ हा उपक्रम राबवित आहेत. एकदा निवडून गेले की, त्यानंतर कोणीही आमदार पाच वर्षे गावात येवून समस्या जाणून घेत नाही, ही मेळघाट मतदार संघातील मतदारांची निवडणूक प्रचारादरम्यान गाऱ्हाणी होती. मात्र प्रभुदास भिलावेकर हे भाजपचे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांनी आदिवासी मतदारांच्या या गाऱ्हाणीला प्रत्यक्ष कृतीत उत्तर देण्यासाठी गावोगावी जाऊन भेटीगाठी सुरु केल्या आहेत. विजयाच्या दिवशी एकदाच घरी गेले. त्यानंतर ते सतत मतदारांच्या भेटीगाठी घेत असून गावोगावी जावून आदिवासी बांधवांची कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. ऐवढेच नव्हे तर त्यांच्या समस्या व प्रश्न पोटतिडकीने ऐकून घेत आहे. मागील १६ दिवसांपासून आ. भिलावेकर यांचा हा शिरस्ता अव्याहतपणे सुरुच आहे. मेळघाटातील ४१५ गावांपैकी आतापर्यत ६५ गावांमध्ये जावून त्यांनी मतदारांशी संवाद साधला असून गावात करावयाच्या अतिमहत्वाच्या विकास कामांची नोंद सुद्धा ते घेत आहेत. मेळघाटात कुपोषण, वीज समस्या, पाणी, रोजगार, योजनांच्या अंमलबजावणीत होत असलेली घुसखोरी ही बाब आर्वजून निर्दशनात आल्याचे आ. भिलावेकर यांनी धारणी येथे बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमानंतर ते ‘लोकमत’ शी बोलत होते. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असून मेळघाटातही भाजपचे कमळ फुलले आहे. त्यामुळे आदिवासींच्या जीवनात नवी उभारी यावी, याअनुशंगाने आपण विकास कामे करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अख्ख्ये मंत्रीमंडळ मेळघाटात आणून येथील समस्यांवर तोडगा काढण्याची तयारी त्यांनी चालविली आहे. त्यामुळेच मेळघाट मतदार संघातील प्रत्येक गावात जात असताना तेथील समस्या, समजून आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या शासनाकडे सादर करताना वस्तुनिष्ठ असाव्यात यावर त्यांचा भर आहे. यापूर्वीचा लोकप्रतिनिधी म्हणून असलेला प्रशासकीय कामकाजांचा अनुभव भिलावेकर यांच्या पाठीशी आहे. ३५० गावांमधील समस्या, प्रश्न जाणून घ्यायच्या आहेत. याकरिता किमान दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे.