शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अन् कापूस, ऊस, कांद्याचे दर झाले जाहीर

By admin | Updated: December 13, 2015 00:08 IST

शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलन अंगार झाले होते. १९८० सालच्या १४ डिसेंबरचा तो दिवस. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे सात लाख शेतकऱ्यांच्या सभेला शरद जोशी संबोधित करीत होते.

श्रीकांत तराळ : मुख्यमंत्री अंतुलेही नमले; शरद पवार, यशवंतराव चव्हाणांना पोहऱ्यात अटकअमरावती : शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलन अंगार झाले होते. १९८० सालच्या १४ डिसेंबरचा तो दिवस. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे सात लाख शेतकऱ्यांच्या सभेला शरद जोशी संबोधित करीत होते. सभास्थळावरून हेलिकॉप्टर भिरभिरत होते. अर्ध्या सभेत जिल्हाधिकारी पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी २० डिसेंबरला वाटाघाटीसाठी बोलविल्याचा निरोप त्यांनी दिला. सभा संपली. २० डिसेंबरला वर्षा बंगल्यावर वाटाघाटी सुरू झाल्यात. शरद पवारांची दिंडी अमरावती जिल्ह्यातील पोहरा जंगलात दाखल झाली होती. वाटाघाटीचा तासभराचा अवधी उलटतो न उलटतो तोच शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना एसटीबसमध्ये बसविले. राजकीय कारकिर्दीदरम्यान पहिल्यांदाच ते एसटी बसते बसले होते. त्यांना तुरुंगात रवाना करण्यात आले. तिकडे एकाचवेळी कापसाला ७००, काद्यांला १०० आणि ऊसाला ३०० रुपये हमीभाव घोषित झाला. देशाच्या इतिहासातील ते पहिले उदाहरण होते. शासनाने खरेदी केंद्रे सुरू करून खरेदीही आरंभली. वर्षा बंगल्यावरील त्या वाटाघाटीचे श्रीकांत तराळ साक्षीदार आहेत. शरद जोशी नावाच्या वादळाची सुरुवात ज्या काळात झाली त्याच काळात त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक संघर्षात समर्थसाथ देणाऱ्या तराळ यांनी गहिवरून ही आठवण लोकमतला सांगितली.मराठ्यांचे पानिपतसाहेबांसोबत एकदा दौऱ्यावर होतो. प्रवासादरम्यान आम्ही पानिपतला पोहोचलो. रात्री दीड वाजले होते. पेंगत पेंगत आम्ही लक्झुरीतून उतरत होतो. सोबत विजय जावंधिया आणि भास्करराव बोरावसे हेदेखील होते. पायऱ्या उतरत असताना साहेंबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला नि म्हणाले, 'श्रीकांत पाऊल जरा जपून टाक. हे पानीपत आहे. मराठ्यांनी येथे चोपून मार खाल्ला होता' साहेंबांच्या त्या वाक्याने सर्वच खळाळून हसले. जांभई देत उतरतानाही त्यांची तल्लख विनोदबुद्धी अशी कार्यरत राहत असे. त्यांच्या अचाट वाचनाचा उपयोग ते जसा सरकारला नमवायला करीत असे तसाच तो वातावरण हलके फुलके करण्यासाठीही करायचे. - आणि पत्रकारांनी वाजविल्या टाळ्या७ डिसेंबर १९८० चा दिवस. शरद जोंशींच्या विदर्भ दौऱ्याची सांगता नागपुरात झाली. नागपूरच्या टीळक पत्रकार भवनात मी शरद जोशी यांची पत्रपरिषद आयोजित केली होती. त्याचवेळी शरद पवारांची पायी शेतकरी दिंडी जळगावहून निघालेली होती. पत्रकारांनी प्रश्न विचारला. पवारांच्या दिंडीबाबत आपले मत काय? शरद जोशी यांनी त्यावर दिलेले उत्तर मार्मिक होते. ते म्हणाले, एक जुना मुख्यमंत्री एका नवीन मुख्यमंत्र्याला मागून मागून काय मागेल? आणि त्या दिंडीत माझ्या शेतकऱ्यांना पायी चालावे लागणार आहे. त्यामुळे त्या दिंडीला ना माझा विरोध आहे ना माझे समर्थन. यावर पत्रकारांनी टाळ्या वाजविल्या.