शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

तासभराचा भोजन अवकाश तरीही कामे सावकाश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

राज्य शासनाने २४ फेब्रुवारी २०२० च्या आदेशानुसार शासकीय कार्यालयाचा पाच दिवसाचा आठवडा लागू केला आहे. यानुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्येही बदल केला. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५  ते ६.१५, तर कार्यालयातील शिपायाकरिता ९.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित केली आहे. पाच दिवसांचा आठवडा असल्याने आणि अधिकारी व कर्मचारी शासकीय काम महिनाभर काम या वृत्तीने काम करीत असल्याने कामाचा खोळंबा होत आहे.

 जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत  ग्रामीण भागातून कामानिमित्त येणाऱ्या  अभ्यागताची संख्या मोठी असल्याने वर्दळ कमी होत नाही. दुपारी मात्र त्यांचे काम होत नाही. कारण दुपारी एक ते अडीच ते तीन वाजेपर्यंत लंच टाईम सांगितला जातो. त्यामुळे कामानिमित्त आलेल्यांना आल्यापावली परत जावे लागते किंवा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत वेळ घालवात बसावे लागत असल्याचे दिसून आले.राज्य शासनाने २४ फेब्रुवारी २०२० च्या आदेशानुसार शासकीय कार्यालयाचा पाच दिवसाचा आठवडा लागू केला आहे. यानुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्येही बदल केला. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५  ते ६.१५, तर कार्यालयातील शिपायाकरिता ९.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित केली आहे. पाच दिवसांचा आठवडा असल्याने आणि अधिकारी व कर्मचारी शासकीय काम महिनाभर काम या वृत्तीने काम करीत असल्याने कामाचा खोळंबा होत आहे. मेळघाटसह गैरआदिवासी भागातून नागरिक तक्रारी, गऱ्हाणी, निवेदन, अर्ज घेऊन कार्यालयात येत असतात. परंतु, बरेचदा अधिकारी व कर्मचारी जागेवर उपलब्ध होत नाही. त्यांना विचारणा केली, तर जेवणाची वेळ आहे, असे सांगून मोकळे होतात. म्हणून पाच दिवसांच्या आठवड्यासंदर्भात काढलेल्या आदेशांमध्ये भोजनाची वेळ दुपारी १ ते २ अशी करण्यात आली. या वेळेत केवळ अर्धा तासात भोजन अवकाश देण्यात आला आहे. परंतु जिल्हा परिषदेचे कर्मचारी तासभराहून अधिक वेळ भोजन अवकाशात घालवतात. यामुळे कामे सावकाश करताना दिसत आहेत.

कार्यालयीन वेळेत घरगुती कामाकडे लक्ष- बऱ्याच विभागातील कर्मचारी लंच टाइममध्ये जेवण करण्याकरता घरी जातात. त्यामुळे अर्ध्या तासाऐवजी त्यांचे एक  ते दीड तास तशीच निघून जातात. कार्यालय वेळेची बंधने येथे पाळली जात नसल्याचे चित्र आहे.

काय म्हणतो शासनाचा आदेश?राज्य शासकीय कार्यालयातील भोजनाच्या वेळेबाबत शासनाने ४ जून २०१९ रोजी काढलेल्या आदेशानुसार अधिकारी व कर्मचारी करता कार्यालयीन वेळेत भोजनासाठी दुपारी १ ते २ वाजता  अर्धा तासाची वेळ असावी, अशा सूचना आहेत. 

कार्यालयीन वेळा सर्वांनी पाळल्याच पाहिजे, कार्यालय वेळेचा दुरुपयोग होत असेल किंवा भोजन अवकाशानंतर  कर्मचारी उपस्थित राहत नसतील तर योग्य ती कारवाई केली जाईल.- तुकाराम टेकाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारीसामान्य प्रशासन

मेळघाटसारख्या दुर्गम भागातून आल्यानंतर बरेचदा अधिकारी, कर्मचारी वेळेत भेटत नाही. हा प्रकार थांबला पाहिजे. - कुलदीप काळबांडे, नागरिक

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद