शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

तासभराचा भोजन अवकाश तरीही कामे सावकाश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

राज्य शासनाने २४ फेब्रुवारी २०२० च्या आदेशानुसार शासकीय कार्यालयाचा पाच दिवसाचा आठवडा लागू केला आहे. यानुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्येही बदल केला. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५  ते ६.१५, तर कार्यालयातील शिपायाकरिता ९.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित केली आहे. पाच दिवसांचा आठवडा असल्याने आणि अधिकारी व कर्मचारी शासकीय काम महिनाभर काम या वृत्तीने काम करीत असल्याने कामाचा खोळंबा होत आहे.

 जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत  ग्रामीण भागातून कामानिमित्त येणाऱ्या  अभ्यागताची संख्या मोठी असल्याने वर्दळ कमी होत नाही. दुपारी मात्र त्यांचे काम होत नाही. कारण दुपारी एक ते अडीच ते तीन वाजेपर्यंत लंच टाईम सांगितला जातो. त्यामुळे कामानिमित्त आलेल्यांना आल्यापावली परत जावे लागते किंवा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत वेळ घालवात बसावे लागत असल्याचे दिसून आले.राज्य शासनाने २४ फेब्रुवारी २०२० च्या आदेशानुसार शासकीय कार्यालयाचा पाच दिवसाचा आठवडा लागू केला आहे. यानुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्येही बदल केला. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५  ते ६.१५, तर कार्यालयातील शिपायाकरिता ९.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित केली आहे. पाच दिवसांचा आठवडा असल्याने आणि अधिकारी व कर्मचारी शासकीय काम महिनाभर काम या वृत्तीने काम करीत असल्याने कामाचा खोळंबा होत आहे. मेळघाटसह गैरआदिवासी भागातून नागरिक तक्रारी, गऱ्हाणी, निवेदन, अर्ज घेऊन कार्यालयात येत असतात. परंतु, बरेचदा अधिकारी व कर्मचारी जागेवर उपलब्ध होत नाही. त्यांना विचारणा केली, तर जेवणाची वेळ आहे, असे सांगून मोकळे होतात. म्हणून पाच दिवसांच्या आठवड्यासंदर्भात काढलेल्या आदेशांमध्ये भोजनाची वेळ दुपारी १ ते २ अशी करण्यात आली. या वेळेत केवळ अर्धा तासात भोजन अवकाश देण्यात आला आहे. परंतु जिल्हा परिषदेचे कर्मचारी तासभराहून अधिक वेळ भोजन अवकाशात घालवतात. यामुळे कामे सावकाश करताना दिसत आहेत.

कार्यालयीन वेळेत घरगुती कामाकडे लक्ष- बऱ्याच विभागातील कर्मचारी लंच टाइममध्ये जेवण करण्याकरता घरी जातात. त्यामुळे अर्ध्या तासाऐवजी त्यांचे एक  ते दीड तास तशीच निघून जातात. कार्यालय वेळेची बंधने येथे पाळली जात नसल्याचे चित्र आहे.

काय म्हणतो शासनाचा आदेश?राज्य शासकीय कार्यालयातील भोजनाच्या वेळेबाबत शासनाने ४ जून २०१९ रोजी काढलेल्या आदेशानुसार अधिकारी व कर्मचारी करता कार्यालयीन वेळेत भोजनासाठी दुपारी १ ते २ वाजता  अर्धा तासाची वेळ असावी, अशा सूचना आहेत. 

कार्यालयीन वेळा सर्वांनी पाळल्याच पाहिजे, कार्यालय वेळेचा दुरुपयोग होत असेल किंवा भोजन अवकाशानंतर  कर्मचारी उपस्थित राहत नसतील तर योग्य ती कारवाई केली जाईल.- तुकाराम टेकाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारीसामान्य प्रशासन

मेळघाटसारख्या दुर्गम भागातून आल्यानंतर बरेचदा अधिकारी, कर्मचारी वेळेत भेटत नाही. हा प्रकार थांबला पाहिजे. - कुलदीप काळबांडे, नागरिक

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद