शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

तासभराचा भोजन अवकाश तरीही कामे सावकाश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

राज्य शासनाने २४ फेब्रुवारी २०२० च्या आदेशानुसार शासकीय कार्यालयाचा पाच दिवसाचा आठवडा लागू केला आहे. यानुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्येही बदल केला. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५  ते ६.१५, तर कार्यालयातील शिपायाकरिता ९.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित केली आहे. पाच दिवसांचा आठवडा असल्याने आणि अधिकारी व कर्मचारी शासकीय काम महिनाभर काम या वृत्तीने काम करीत असल्याने कामाचा खोळंबा होत आहे.

 जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत  ग्रामीण भागातून कामानिमित्त येणाऱ्या  अभ्यागताची संख्या मोठी असल्याने वर्दळ कमी होत नाही. दुपारी मात्र त्यांचे काम होत नाही. कारण दुपारी एक ते अडीच ते तीन वाजेपर्यंत लंच टाईम सांगितला जातो. त्यामुळे कामानिमित्त आलेल्यांना आल्यापावली परत जावे लागते किंवा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत वेळ घालवात बसावे लागत असल्याचे दिसून आले.राज्य शासनाने २४ फेब्रुवारी २०२० च्या आदेशानुसार शासकीय कार्यालयाचा पाच दिवसाचा आठवडा लागू केला आहे. यानुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्येही बदल केला. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५  ते ६.१५, तर कार्यालयातील शिपायाकरिता ९.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित केली आहे. पाच दिवसांचा आठवडा असल्याने आणि अधिकारी व कर्मचारी शासकीय काम महिनाभर काम या वृत्तीने काम करीत असल्याने कामाचा खोळंबा होत आहे. मेळघाटसह गैरआदिवासी भागातून नागरिक तक्रारी, गऱ्हाणी, निवेदन, अर्ज घेऊन कार्यालयात येत असतात. परंतु, बरेचदा अधिकारी व कर्मचारी जागेवर उपलब्ध होत नाही. त्यांना विचारणा केली, तर जेवणाची वेळ आहे, असे सांगून मोकळे होतात. म्हणून पाच दिवसांच्या आठवड्यासंदर्भात काढलेल्या आदेशांमध्ये भोजनाची वेळ दुपारी १ ते २ अशी करण्यात आली. या वेळेत केवळ अर्धा तासात भोजन अवकाश देण्यात आला आहे. परंतु जिल्हा परिषदेचे कर्मचारी तासभराहून अधिक वेळ भोजन अवकाशात घालवतात. यामुळे कामे सावकाश करताना दिसत आहेत.

कार्यालयीन वेळेत घरगुती कामाकडे लक्ष- बऱ्याच विभागातील कर्मचारी लंच टाइममध्ये जेवण करण्याकरता घरी जातात. त्यामुळे अर्ध्या तासाऐवजी त्यांचे एक  ते दीड तास तशीच निघून जातात. कार्यालय वेळेची बंधने येथे पाळली जात नसल्याचे चित्र आहे.

काय म्हणतो शासनाचा आदेश?राज्य शासकीय कार्यालयातील भोजनाच्या वेळेबाबत शासनाने ४ जून २०१९ रोजी काढलेल्या आदेशानुसार अधिकारी व कर्मचारी करता कार्यालयीन वेळेत भोजनासाठी दुपारी १ ते २ वाजता  अर्धा तासाची वेळ असावी, अशा सूचना आहेत. 

कार्यालयीन वेळा सर्वांनी पाळल्याच पाहिजे, कार्यालय वेळेचा दुरुपयोग होत असेल किंवा भोजन अवकाशानंतर  कर्मचारी उपस्थित राहत नसतील तर योग्य ती कारवाई केली जाईल.- तुकाराम टेकाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारीसामान्य प्रशासन

मेळघाटसारख्या दुर्गम भागातून आल्यानंतर बरेचदा अधिकारी, कर्मचारी वेळेत भेटत नाही. हा प्रकार थांबला पाहिजे. - कुलदीप काळबांडे, नागरिक

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद