शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

अमरावतीच्या मुलीचे आग्य्रातून अपहरण, मावशीच्या सुनेविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 11:05 PM

दोन महिन्यांची असताना आई मुलीला सोडून गेली. १५ वर्षांनंतर मावशीच्या सुनेने त्या मुलीला आग्रा येथे नेऊन आईशी भेट घालून दिली. दरम्यानच त्या मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार पुढे आला. मुलीच्या शोधात असणाऱ्या वडिलांनी राजापेठ पोलिसात धाव घेतली. मात्र, तेथील पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले नाही.

ठळक मुद्देवडिलांची पोलीस उपायुक्तांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन महिन्यांची असताना आई मुलीला सोडून गेली. १५ वर्षांनंतर मावशीच्या सुनेने त्या मुलीला आग्रा येथे नेऊन आईशी भेट घालून दिली. दरम्यानच त्या मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार पुढे आला. मुलीच्या शोधात असणाऱ्या वडिलांनी राजापेठ पोलिसात धाव घेतली. मात्र, तेथील पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. त्यामुळे अखेर वडिलांनी सोमवारी पोलीस उपायुक्तांकडे दाद मागितली. त्यांनी राजापेठ पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी दुपारी अपहरणाचा गुन्हा नोंदविला.सिद्धार्थनगरातील रहिवासी एका ५० वर्षीय व्यक्तीची मुलगी दोन महिन्यांची असताना तिची आई सोडून गेली. आईने आग्रा येथील एका इसमाशी संसार थाटला. दरम्यान मुलीचे वडील बेलपुºयात भाड्याच्या खोली करून चौकीदाराची नोकरी करू लागले. बेलपुºयातच मुलीची मोठी मावशी राहत होती. आॅक्टोबर २०१८ मध्ये एके दिवशी मावशीची सून मुलीच्या घरी आली. आईची भेट करून देण्याचे सांगून तिने मुलीला आग्रा येथे नेले. त्यानंतर मावशीची सून तेथून परत अमरावतीत आली. दरम्यान दोन ते तीन महिने ती मुलगी आग्रा येथे आईकडे राहिली. त्यानंतर मावशीच्या सुनेने मुलीला आग्ºयाहून परत अमरावतीत आणले. १० जून रोजी मावशीच्या कोणालाही न सांगता त्या मुलीला पुन्हा आग्रा येथे नेले व तेथेच सोडून सून अमरावतीत परतली. दरम्यान मुलगी घरात नसल्याचे पाहून वडिलांनी शोधाशोध सुरू केली. त्यांनी मुलीबद्दल नातेवाईकांकडे चौकशी केली. राजापेठ पोलिसात तक्रार देण्यास गेले. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदविली नाही. त्यांनी मावशीच्या सुनेला चौकशीकरिता बोलाविले होते. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आग्रा येथील नातेवाईकांशी संपर्क साधला. मुलीच्या आईच्या दुसºया पतीसोबत संपर्क साधून मुलीबाबत विचारणा केली. त्यावेळी धक्कादायक बाब पुढे आली. मुलगी तेथूनही बेपत्ता असल्याचे वडिलांना कळले. १५ जून २०१९ रोजी ती मुलगी आग्राहून बेपत्ता झाली. तिने रात्रीच्या वेळी घराचे दार बाहेरून बंद करून पलायन केले. यासंदर्भात आग्रा पोलिसांत तक्रार नोंदविल्याची माहिती तिच्या आईच्या दुसºया पतीने पोलिसांनाही दिली. या घडलेल्या प्रकारसंदर्भात मुलीचे वडील व आत्याने सोमवारी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांची भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली. त्यांनीही आग्रा येथील त्या व्यक्तीशी संपर्क साधून माहिती घेतली. या घटनेच्या अनुषंगाने डीसीपी सोळंके यांनी राजापेठचे प्रभारी ठाणेदार दिलीप चव्हाण यांना अपहरणाचा गुन्हा नोंदविण्याचे सूचित केले. त्यानुसार मुलीचे वडील राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले. याप्रकरणात पोलिसांनी भावना नामक मावशीच्या सुनेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.भावना पतीसह पसारमुलीच्या मावशीची सून बेलपुऱ्यातील रहिवासी ठिकाणावरून पसार झाली आहे. राजापेठ पोलीस तिचा शोध घेत आहेत. मुलीला आग्रा पोहोचून देण्यात व तेथून परत आणण्यात भावनाने पुढाकार घेतला होता. तिच्या या पुढाकाराचे गुपित काय आहे, हे भावनाला अटक केल्यानंतर पुढे येईल.