शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अमरावतीला दहशतवादाची प्रयोगशाळा होऊ देणार नाही; यशोमती ठाकूर यांचा भाजपवर घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 19:16 IST

Amravati News अमरावतीला दहशतवादाची प्रयोगशाळा कधीच होऊ देणार नाही, यात माझे प्राण गेले तरी चालेल, असा आक्रमक पवित्रा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी येथे घेतला.

ठळक मुद्दे खासदार, आमदार राणा दाम्पत्यावरही ओढले ताशेरे

अमरावती : अमरावती शहर हे जातीय एकता, सामाजिक सलोख्याचे केंद्र असताना आता काही प्रवृतींकडून जातीय दंगली, जाळपोळ, हत्याकांड अशा घटनांना वाव दिला जात आहे. मात्र, अमरावतीला दहशतवादाची प्रयोगशाळा कधीच होऊ देणार नाही, यात माझे प्राण गेले तरी चालेल, असा आक्रमक पवित्रा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी येथे घेतला. काॅंग्रेस पक्षातर्फे येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषेदत त्या बोलत होत्या.

ॲड. ठाकूर यांच्या मते, राजस्थानच्या उदयपूर येथील घटनेतील आरोपी मोहम्मद रियाज हा भाजपचा कार्यकर्ता असून, अमरावती येथील इरफान खान हा मुख्य सूत्रधार खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या जवळील आहे. त्यामुळे दहशतवादी प्रवृत्तीला कोण सहकार्य करते, हे स्पष्ट होते. उमेश कोल्हे यांची हत्या ही घटना अतिशय दुर्देवी बाब आहे. मात्र, खासदार, आमदार राणा दाम्पत्याने कोल्हे यांच्या मृत्यूचा इव्हेंट म्हणून वापर केला, असा घणाघात ॲड. यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर केला.

२१ जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या होते आणि २८ जून रोजी उदयपूर येथे कन्हैयालाल शर्मा यांना ठार मारले जाते. परंतु, खासदार नवनीत राणा यांनी २७ जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उदयपूर व अमरावती येथील हत्याकांडाच्या घटनेत साम्य असल्याने एनआयए अथवा सीबीआयमार्फत कोल्हे यांच्या हत्येची चौकशी करावी, अशा मागणीचे पत्र दिले होते. त्यामुळे उदयपूर येथे कन्हैयालाल यांची हत्या होणार, ही माहिती खासदार नवनीत राणा यांना एक दिवस अगोदरच म्हणजे २७ जून २०२२ रोजी कशी व कोठून मिळाली, याचा शोध केंद्रीय यंत्रणांनी घ्यावा, अशी मागणी ॲड. यशाेमती ठाकूर यांनी केली. त्यामुळे अमरावतीला दहशतवादाची प्रयोगशाळा करावी आणि मतांच्या ध्रुवीकरणामागे भाजप वा त्यांच्या सहयोगी मित्रांचे कारस्थान तर नाही ना, अशी शंकाही ॲड. ठाकूर यांनी उपस्थित केली.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर