शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अमरावतीला दहशतवादाची प्रयोगशाळा होऊ देणार नाही; यशोमती ठाकूर यांचा भाजपवर घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 19:16 IST

Amravati News अमरावतीला दहशतवादाची प्रयोगशाळा कधीच होऊ देणार नाही, यात माझे प्राण गेले तरी चालेल, असा आक्रमक पवित्रा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी येथे घेतला.

ठळक मुद्दे खासदार, आमदार राणा दाम्पत्यावरही ओढले ताशेरे

अमरावती : अमरावती शहर हे जातीय एकता, सामाजिक सलोख्याचे केंद्र असताना आता काही प्रवृतींकडून जातीय दंगली, जाळपोळ, हत्याकांड अशा घटनांना वाव दिला जात आहे. मात्र, अमरावतीला दहशतवादाची प्रयोगशाळा कधीच होऊ देणार नाही, यात माझे प्राण गेले तरी चालेल, असा आक्रमक पवित्रा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी येथे घेतला. काॅंग्रेस पक्षातर्फे येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषेदत त्या बोलत होत्या.

ॲड. ठाकूर यांच्या मते, राजस्थानच्या उदयपूर येथील घटनेतील आरोपी मोहम्मद रियाज हा भाजपचा कार्यकर्ता असून, अमरावती येथील इरफान खान हा मुख्य सूत्रधार खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या जवळील आहे. त्यामुळे दहशतवादी प्रवृत्तीला कोण सहकार्य करते, हे स्पष्ट होते. उमेश कोल्हे यांची हत्या ही घटना अतिशय दुर्देवी बाब आहे. मात्र, खासदार, आमदार राणा दाम्पत्याने कोल्हे यांच्या मृत्यूचा इव्हेंट म्हणून वापर केला, असा घणाघात ॲड. यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर केला.

२१ जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या होते आणि २८ जून रोजी उदयपूर येथे कन्हैयालाल शर्मा यांना ठार मारले जाते. परंतु, खासदार नवनीत राणा यांनी २७ जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उदयपूर व अमरावती येथील हत्याकांडाच्या घटनेत साम्य असल्याने एनआयए अथवा सीबीआयमार्फत कोल्हे यांच्या हत्येची चौकशी करावी, अशा मागणीचे पत्र दिले होते. त्यामुळे उदयपूर येथे कन्हैयालाल यांची हत्या होणार, ही माहिती खासदार नवनीत राणा यांना एक दिवस अगोदरच म्हणजे २७ जून २०२२ रोजी कशी व कोठून मिळाली, याचा शोध केंद्रीय यंत्रणांनी घ्यावा, अशी मागणी ॲड. यशाेमती ठाकूर यांनी केली. त्यामुळे अमरावतीला दहशतवादाची प्रयोगशाळा करावी आणि मतांच्या ध्रुवीकरणामागे भाजप वा त्यांच्या सहयोगी मित्रांचे कारस्थान तर नाही ना, अशी शंकाही ॲड. ठाकूर यांनी उपस्थित केली.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर