शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

अमरावती विद्यापीठात प्रभारीराज, कुलगुरू ते परीक्षा नियंत्रकाची पदे रिक्त

By गणेश वासनिक | Updated: May 9, 2023 20:05 IST

प्राथमिक स्तरावरच हालचाली नसल्याने राज्यपाल भवनाकडून अपेक्षा करणे कठीण आहे, असा सूर उमटू लागला आहे.

अमरावती- प्रशासकीय कामकाजावर परिणाम, नवीन कुलगुरू पदभरतीची प्रक्रिया थंडबस्त्यात अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुलगुरू, प्र-कुलगुरू ते परीक्षा नियंत्रक अशी महत्त्वाची पदे प्रभारीच आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामजकाजावर परिणाम होत असून, प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना ५०० किमी.चा पल्ला गाठून अमरावती विद्यापीठाचा कारभार हाताळावा लागत आहे.

तत्कालीन कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनानंतर राज्यपाल भवनातून प्रभारी कुलगुरू पदाची सूत्रे छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे सोपविण्यात आली, तर प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ. प्रसाद वाडेगावकर, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, प्रभारी परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक मोनाली तोटे यासह मानव्य विज्ञान विद्या शाखा आणि विज्ञान तंत्रज्ञान विद्या शाखांचे अधिष्ठाता, नवोपक्रम नवसंशोधन व सहचार्य मंडळ संचालक पदही रिक्त आहे.

येत्या काही दिवसांत ग्रंथपाल सेवानिवृत्त होत असून हे पदही रिक्त असणार आहे. कुलगुरूसारखे महत्त्वाचे पद रिक्त असल्यामुळे सिनेट, व्यवस्थापन परिषद, परीक्षा मंडळ यासह प्रशासकीय कामांचे नियोजन व्यवस्थित होत नसल्याची ओरड आहे. हल्ली मुंबई, पुणे व अमरावती विद्यापीठात कुलगुरू पदांचा कारभार प्रभारी सुरू असल्याची माहिती आहे.कुलगुरू निवडीबाबतची प्रक्रिया केव्हा?अमरावती विद्यापीठाने नवीन कुलगुरू निवडीबाबतची प्रक्रिया आरंभली नाही. त्यामुळे तृूर्त सहा महिने तरी विद्यापीठाला कुलगुरू मिळेल की नाही? हे सांगणे कठीण आहे. अद्यापही कुलगुरू पदासाठी पात्र व्यक्तींकडून आवेदन मागविण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही. प्राथमिक स्तरावरच हालचाली नसल्याने राज्यपाल भवनाकडून अपेक्षा करणे कठीण आहे, असा सूर उमटू लागला आहे.नव्या कुलगुरूसाठी स्थापन करावी लागते समितीनवीन कुलगुरू निवडीसाठी विद्यापीठात विद्वत परिषद आणि व्यवस्थापन परिषदेची संयुक्त बैठक घेऊन यात एक प्रतिनिधी समितीवर नियुक्त करावा लागतो. त्यानंतर राज्यपाल कार्यालयातून समितीच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त न्यायमूर्तींची नेमणूक केली जाते. उच्च शिक्षण संस्था वा आयआयटीमधून एक नोडल अधिकारी तसेच शासनाचे प्रधान सचिव अशी कुलगुरू निवडीसाठी स्वतंत्र समिती स्थापन केली जाते. या सर्व प्रकारात किमान सहा महिने लागतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती