शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Amravati: पावसाळ्यापूर्वी शिकस्त रस्ते, नाले, पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट

By जितेंद्र दखने | Updated: May 24, 2024 00:24 IST

Amravati News: अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यांत अतिवृष्टीमुळे इमारतींना नुकसान होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशावेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या ताब्यातील इमारती, शाळा खोल्या, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य केंद्रे आदी सुस्थितीत आहेत वा नाही, याबाबतची खात्री करण्यासाठी अशा धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट बांधकाम विभागाने सुरू केले आहे.

- जितेंद्र दखणेअमरावती -  जिल्ह्यातील काही तालुक्यांत अतिवृष्टीमुळे इमारतींना नुकसान होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशावेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या ताब्यातील इमारती, शाळा खोल्या, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य केंद्रे आदी सुस्थितीत आहेत वा नाही, याबाबतची खात्री करण्यासाठी अशा धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट बांधकाम विभागाने सुरू केले आहे.

पावसाळ्याचे दिवस आता तोंडावर आले आहेत. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे. याअनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील २९० पूल, ३६७७ रपट्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट बांधकाम विभागाच्या माध्यमातून केले जात आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी  यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी मान्सूनपूर्व सुविधा आणि उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच जि. प.च्या अखत्यारित येणाऱ्या शासकीय इमारती, शाळा, वर्गखोल्या, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य केंद्रे सुस्थितीत आहेत की नाही, याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना तालुकास्तरावर उपअभियंता बांधकाम आणि बीडीओंना दिल्या आहेत. त्यामुळे अशा धोकादायक इमारतींचा शोध घेऊन याची यादी संबंधित पोलिस स्टेशन, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्षास माहितीकरिता पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी शाळा किंवा अंगणवाडी केंद्राच्या इमारती धोकादायक असतील अशी इमारत बंद ठेवून विद्यार्थी, मुलांसाठी सुरक्षित सार्वजनिक इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात शाळा, अंगणवाडी केंद्र सुरू करावेत. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उपअभियंता, बीडीओ आणि संबंधित ग्रामपंचायतीवर सोपविली आहे. सोबतच पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटणार नाही. यासाठी अंतर्गत रस्ते, नाले, आणि रपटे यांची आवश्यक दुरुस्ती करण्याऱ्या अनुषंगाने स्ट्रक्चरल ऑडिट करून कामे केली जाणार आहेत. मान्सूनपूर्व नियोजनाबाबत सीईओंनी दिलेल्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणी सुरू आहे. तालुका स्तरावरील यंत्रणेकडून धोकादायक इमारतीबाबतचा आढावा घेऊन त्याची माहिती  मागविली आहे. ही प्रक्रिया सुरू आहे. आवश्यकतेनुसार देखभाल दुरुस्तीची कामेही केली जाणार आहेत.  -दिनेश गायकवाड, कार्यकारी अभियंताबांधकाम विभाग जिल्हा परिषद

टॅग्स :Amravatiअमरावती