शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Amravati: पावसाळ्यापूर्वी शिकस्त रस्ते, नाले, पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट

By जितेंद्र दखने | Updated: May 24, 2024 00:24 IST

Amravati News: अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यांत अतिवृष्टीमुळे इमारतींना नुकसान होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशावेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या ताब्यातील इमारती, शाळा खोल्या, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य केंद्रे आदी सुस्थितीत आहेत वा नाही, याबाबतची खात्री करण्यासाठी अशा धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट बांधकाम विभागाने सुरू केले आहे.

- जितेंद्र दखणेअमरावती -  जिल्ह्यातील काही तालुक्यांत अतिवृष्टीमुळे इमारतींना नुकसान होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशावेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या ताब्यातील इमारती, शाळा खोल्या, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य केंद्रे आदी सुस्थितीत आहेत वा नाही, याबाबतची खात्री करण्यासाठी अशा धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट बांधकाम विभागाने सुरू केले आहे.

पावसाळ्याचे दिवस आता तोंडावर आले आहेत. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे. याअनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील २९० पूल, ३६७७ रपट्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट बांधकाम विभागाच्या माध्यमातून केले जात आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी  यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी मान्सूनपूर्व सुविधा आणि उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच जि. प.च्या अखत्यारित येणाऱ्या शासकीय इमारती, शाळा, वर्गखोल्या, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य केंद्रे सुस्थितीत आहेत की नाही, याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना तालुकास्तरावर उपअभियंता बांधकाम आणि बीडीओंना दिल्या आहेत. त्यामुळे अशा धोकादायक इमारतींचा शोध घेऊन याची यादी संबंधित पोलिस स्टेशन, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्षास माहितीकरिता पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी शाळा किंवा अंगणवाडी केंद्राच्या इमारती धोकादायक असतील अशी इमारत बंद ठेवून विद्यार्थी, मुलांसाठी सुरक्षित सार्वजनिक इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात शाळा, अंगणवाडी केंद्र सुरू करावेत. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उपअभियंता, बीडीओ आणि संबंधित ग्रामपंचायतीवर सोपविली आहे. सोबतच पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटणार नाही. यासाठी अंतर्गत रस्ते, नाले, आणि रपटे यांची आवश्यक दुरुस्ती करण्याऱ्या अनुषंगाने स्ट्रक्चरल ऑडिट करून कामे केली जाणार आहेत. मान्सूनपूर्व नियोजनाबाबत सीईओंनी दिलेल्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणी सुरू आहे. तालुका स्तरावरील यंत्रणेकडून धोकादायक इमारतीबाबतचा आढावा घेऊन त्याची माहिती  मागविली आहे. ही प्रक्रिया सुरू आहे. आवश्यकतेनुसार देखभाल दुरुस्तीची कामेही केली जाणार आहेत.  -दिनेश गायकवाड, कार्यकारी अभियंताबांधकाम विभाग जिल्हा परिषद

टॅग्स :Amravatiअमरावती