शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती, शिराळा ते चांदूरबाजार रस्ता दोन वर्षांतच उखडला; २०० कोटी पाण्यात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:45 IST

Amravati : 'हायब्रीड ॲन्युटी' कामांचा दर्जा सुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाची डोळेझाक, अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणातील 'हायब्रीड अॅन्युटी' अंतर्गत निर्माण केलेला अमरावती, शिराळा ते चांदूरबाजार या दरम्यान रस्ता अवघ्या दोन वर्षातच उखडला आहे. तब्बल २०० कोर्टीच्या निधीतून साकारलेल्या या डांबरीकरणाच्या रस्त्यावर हल्ली जागोजागी खड्डे पडले असून अनेक ठिकाणी तो दबला आहे. त्यामुळे हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर खरेच साकारण्यात आला का? असा सवाल उपस्थित होतो. परिणामी मुख्य अभियंत्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सरकारने मोठा गाजावाजा करून 'हायब्रीड अॅन्युटी' अंतर्गत रस्त्याचे जाळे निर्माण करण्याचा दावा केला आहे. मात्र अमरावती, शिराळा ते चांदूरबाजार या दरम्यान ३० किमी लांबीच्या या रस्त्यावर हल्ली वाहनचालकांना 'डॉन्सिंग कार' सारखा अनुभव येत आहे. या रस्त्याची निर्मिती करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे आता सिद्ध झाले आहे. कारण हा रस्ता अनेक जागी 'सिंक' झाल्यामुळे तो साकारताना जमिनीवर डांबरीकरणात वापरलेले साहित्य दर्जाहीन असल्याचे स्पष्ट होत आहे. हा रस्ता निर्माण होऊन पाच वर्षे झाले, पण तो दोन वर्षांतच उखडला आहे. 

पावसाचे पाणी तुंबले, अपघाताची शक्यताहा रस्ता जागोजागी दबला (सिंक) असल्याने पावसाचे पाणी साचून आहे. या रस्त्याची निर्मिती करताना योग्य ते साहित्य, मशिनरीचा वापर झाला नाही. त्यामुळे आता डांबराचे प्रमाण आणि दर्जा तपासणाऱ्या यंत्रणेवर कारवाई करावी लागणार की काय? असे दिसून येत आहे. हल्ली पावसाळ्यात या रस्त्यावर जागोजागी पाणी साचत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना कमालीची कसरत करावी लागत आहे.

विधिमंडळातही गाजला हा रस्ताअमरावती, शिराळा ते चांदूरबाजार या दरम्यान ३० किमी लांबीच्या या रस्त्याची निर्मिती करताना ई-निविदेतील अटी, शर्तीला बगलदेण्यात आल्याप्रकरणी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात २०१८-२०१९ मध्ये हा रस्ता गाजला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभागृहात थातुरमातुर उत्तर देत वेळ मारून नेली होती. अखेर हा रस्ता कसा दर्जाहीन निर्माण करण्यात आला, हे लोकप्रतिनिधींसह आता जनतेच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे या रस्ता निर्मितीचे विशेष ऑडिट करून दोषींची चौकशी करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

पेव्हिंग सोल्डर दिसेनासे, कंत्राटदाराने लावला चुना

  • रस्त्यालगत पेव्हिंग सोल्डर हे सुद्धा दिसेनासे झाले आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचा असेल, अशा प्रकारे ई-निविदेत अटी, शर्ती होत्या. मात्र, कंत्राटदारांनी हा मार्ग थातुरमातुर निर्माण करून सरकारलाच चुना लावण्याचे काम केल्याचे आता या रस्त्याची दयनीय झाल्यानंतर दिसून येत आहे.
  • करारनाम्यानुसार १० वर्षांपर्यंत या रस्त्याची डागडुजी, दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे; परंतु दोन वर्षांतच हा रस्ता उखडला असताना ना दुरुस्ती, ना डागडुजी करण्यात आली. बांधकाम विभागात नेमके चालले तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
टॅग्स :Amravatiअमरावतीroad safetyरस्ते सुरक्षा