शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

Amravati: टंचाईची तीव्रता; अमरावती जिल्हा परिषदेचा यंदा तिमाही नव्हे तर वार्षिक आराखडा

By जितेंद्र दखने | Updated: October 28, 2023 18:03 IST

Amravati: गतवर्षी सरासरीपेक्षा २५ टक्के कमी झालेल्या पावसाचा फटका यंदा जिल्ह्यातील साडेपाचशे गावांना बसणार आहे. विशेष म्हणजे, टँकरच्या संख्येतही यंदा कमी पावसामुळे वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

- जितेंद्र दखनेअमरावती - गतवर्षी सरासरीपेक्षा २५ टक्के कमी झालेल्या पावसाचा फटका यंदा जिल्ह्यातील साडेपाचशे गावांना बसणार आहे. विशेष म्हणजे, टँकरच्या संख्येतही यंदा कमी पावसामुळे वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आतापासून पाणीटंचाई आराखडा तयार करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. यावेळी मात्र पाणीटंचाईचा आराखडा हा तीन महिन्यांऐवजी वार्षिक आराखडा तयार केला जाणार आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा २५ टक्के कमी झालेल्या पावसामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न अधिक गडद हाेण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून आतापासून पाणीटंचाई आराखड्याला सुरुवात केली आहे.

पाणीटंचाईची तीव्रता फारशी नव्हती. केवळ दोनशे गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यातील बहुतांश गावे मेळघाटमधील होती. मागील वर्षी मे व जून महिन्यात ११ गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आला होता, मात्र यंदाची परिस्थिती अतिशय भीषण असल्याचे दिसून येते. यंदा आतापर्यंत सरासरी ४६ टक्केच पाऊस पडला आहे. त्यामुळे नद्या व धरणांमध्ये किमान जलसाठा आहे. शिवाय भूजलस्तरात ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाईचे संकेत आहेत.आतापर्यंत तीन टप्प्यांत पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात येत होता. टंचाईची तीव्रता पाहून उपाययोजना केल्या जात होत्या. त्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत पहिला टप्पा, मार्च व एप्रिल दुसरा आणि जूनमध्ये तिसरा, अशा तीन टप्प्यांत आराखड्याची विभागणी केली जात होती. मात्र, यावर्षीपासून एकाच टप्प्यात वर्षभराचा आराखडा तयार करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तसे पत्रसुद्धा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाले आहे.

यंदा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने टंचाईत वाढ होण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरून पाणीपुरवठा विभागाकडून तहसीलनिहाय आराखडे मागविले आहेत. अद्याप पाच तालुक्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.-सुनील जाधवकार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAmravatiअमरावती