शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वसंत चौक, चपराशीपुरातील कुख्यात जुगारचालक रफुचक्कर! खेळणारे गजाआड

By प्रदीप भाकरे | Updated: January 19, 2024 18:24 IST

सीपींच्या विशेष पथकाची कारवाई

अमरावती : पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने गुरूवारी शहर कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील वसंत चौक, बडनेरा हद्दीतील आठवडी बाजार व फ्रेजरपुरा हद्दीतील चपराशीपुरा येथे सुरू असलेल्या जुगारावरधाड टाकली. या कारवाईत १६ जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५५ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, वसंत चाैक व चपराशीपुरा येथे जुगार चालविणारे अनुक्रमे आलोक श्रीवास व रियाज खान हयात खान हे पथकाच्या हाती सापडले नाहीत. त्यांच्याविरूध्द गुन्हा देखील दाखल करण्यात आला नाही.

 स्थानिक वसंत चौक येथे आलोक श्रीवास याने जुगार भरविल्याची माहिती गस्तीवर असलेल्या विशेष पथकाला मिळाली. त्या आधारावर पथकाने तेथील जुगारावर धाड टाकली. या कारवाईत अर्शद खान नासीर खान (१९, रा. यास्मीननगर), रोहीत संतोष लोहकरे (२५, रा. यशोदानगर), राहुल लक्ष्मण लोणारे (२८, रा. बेलपुरा), जयप्रकाश विजय शर्मा (३८, रा. शोभानगर), विलास भाष्करराव बोरकर (४२, रा. गोपालनगर), मौसीन शाहा युसूफ शाहा (३३, रा. ताजनगर) व वचन कृष्णराव माहुरकर (४२, रा. गायत्रीनगर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १७ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगाऱ्यांविरुद्ध कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोबतच पथकाने बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील आठवडी बाजार येथील जुगारावर धाड टाकली. या कारवाईत हिरा रामाजी रोकडे (५०, रा. नवीवस्ती, बडनेरा), फइमोद्दीन इस्लामोद्दिन (५०, रा. मोबीनपुरा, बडनेरा), शेख लतिफ शेख नासीर (३८, रा. आठवडी बाजार, बडनेरा), ज्ञानेश्वर अन्नाजी तिडके (५५, रा. टिमटाला) व शेख इमरान शेख इब्राहीम (२२, रा. इंदिरानगर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगाऱ्यांविरुद्ध बडनेरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.जुगार कुणाचा ते ज्ञात, ‘तो’ गायब

चपराशीपुरा परिसरातील शुक्रवार बाजारात रियाज खान हयात खान हा जुगार खेळवत असल्याची माहिती विशेष पथकाने मिळाली. त्याआधारे १८ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० च्या आसपास तेथे धाड टाकण्यात आली. मात्र रियाजखान पोलिसांच्या हाती आला नाही. या कारवाईत मनोहर प्यारेलाल गौर (६२) रा. परतवाडा, सुनील नंदकिशोर गोदली (३२, रा. चपराशीपुरा), जगन बबन सरकटे (३४, रा. परिहारपुरा) व राहुल दिवाकर बोके (४१, रा. रुक्मिणीनगर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २० हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगाऱ्यांविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू यांच्या नेतृत्वात करण्यात आली.