शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीकरांनो, विकास हवा असेल तर पाणी वाचवा!

By admin | Updated: March 22, 2016 00:21 IST

राज्यात मागील काही वर्षांपासून पाऊस अनियमित झाला आहे. त्यामुळे वारंवार दुष्काळीस्थिती निर्माण होते.

जागतिक जलदिन : पाण्याचा अपव्यय ठरू शकतो घातक, अप्पर वर्धा धरण ठरले वरदानअमरावती : राज्यात मागील काही वर्षांपासून पाऊस अनियमित झाला आहे. त्यामुळे वारंवार दुष्काळीस्थिती निर्माण होते. अलिकडे पाणीटंचाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उन्हाळा आला की राज्यात पाणीटंचाईची भीषण तीव्रता जाणवू लागते. सुदैवाने अमरावती जिल्ह्यात मात्र पाणीटंचाईचे सावट नाही. परंतु अमरावतीकरांनी मुबलक उपलब्ध असलेल्या पाण्याचे महत्त्व वेळीच ओळखायला हवे. पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवून भविष्यात अमरावतीचा मराठवाडा होऊ नये, याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. अमरावतीत नळाची तोटी उघडताच शुद्ध पाणी मिळते. परंतु जे सहज मिळते त्याची किंमत न करणे, हा मानवी स्वभावगुण आहे. ‘मिल गया तो मिट्टी है, खो गया तो सोना है’ या उक्तीप्रमाणे मुबलक उपलब्ध असलेल्या पाण्याचा गैरवापर होऊ देऊ नये. शहराला अप्पर वर्धा धरणातून पाणीपुरवठा होतो. शहरापासून ५५ किलोमिटर अंतरावरून सिंभोराधरणातून पाणी, शहरात पोहोचते. या धरणातील पाण्याचा साठा बहुदा त्यावर्षी पडणाऱ्या पावसावर अवलंबून असतो. पाणी वितरणाची प्रक्रिया जरा समजून घेऊ या. धरणात साठविलेले पाणी पंपिंग स्टेशनमधून २२ किलोमिटर अंतरावरील नेरपिंगळाई येथील टेकडीवर पाईपलाइनद्वारे चढविले जाते. यासाठी ७५० हॉर्सपॉवरचे पाच पंप पंपिंग स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. नेरपिंगळाई येथे साठविलेले पाणी नंतर उतारामुळे (ग्रॅव्हिटीमार्फत) ३३ किलोमिटरचे अंतर पार करून शहरात आणले जाते. येथील जलशुद्धीकरण केंद्रात सात टप्प्यांमध्ये पाणी शुद्ध केले जाते. पश्चात त्या पाण्याचे वितरण होते. या प्रक्रियेचा महिन्याचा खर्च दोन कोटींच्या घरात आहे. कोणत्याही शहराचा विकास तेथील उद्योगधंद्यांवर अवलंबून असतो व उद्योग हे पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. त्यामुळेच विकासासाठी अमरावतीकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. गावाची, शहराची, राज्याची व देशाची प्रगती साधायची असल्यास आपल्याला पाण्याचे मोल समजावे लागेल व पाण्याचा वापर काटकसरीनेच करावा लागेल. पाणी बचतीचे छोटे-छोटे उपाय अंमलात आणल्यास आपण भीषण पाणीटंचाईवर मात करू शकतो.- संदीप ताटेवार स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती