शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

अमरावतीकरांनो, विकास हवा असेल तर पाणी वाचवा!

By admin | Updated: March 22, 2016 00:21 IST

राज्यात मागील काही वर्षांपासून पाऊस अनियमित झाला आहे. त्यामुळे वारंवार दुष्काळीस्थिती निर्माण होते.

जागतिक जलदिन : पाण्याचा अपव्यय ठरू शकतो घातक, अप्पर वर्धा धरण ठरले वरदानअमरावती : राज्यात मागील काही वर्षांपासून पाऊस अनियमित झाला आहे. त्यामुळे वारंवार दुष्काळीस्थिती निर्माण होते. अलिकडे पाणीटंचाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उन्हाळा आला की राज्यात पाणीटंचाईची भीषण तीव्रता जाणवू लागते. सुदैवाने अमरावती जिल्ह्यात मात्र पाणीटंचाईचे सावट नाही. परंतु अमरावतीकरांनी मुबलक उपलब्ध असलेल्या पाण्याचे महत्त्व वेळीच ओळखायला हवे. पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवून भविष्यात अमरावतीचा मराठवाडा होऊ नये, याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. अमरावतीत नळाची तोटी उघडताच शुद्ध पाणी मिळते. परंतु जे सहज मिळते त्याची किंमत न करणे, हा मानवी स्वभावगुण आहे. ‘मिल गया तो मिट्टी है, खो गया तो सोना है’ या उक्तीप्रमाणे मुबलक उपलब्ध असलेल्या पाण्याचा गैरवापर होऊ देऊ नये. शहराला अप्पर वर्धा धरणातून पाणीपुरवठा होतो. शहरापासून ५५ किलोमिटर अंतरावरून सिंभोराधरणातून पाणी, शहरात पोहोचते. या धरणातील पाण्याचा साठा बहुदा त्यावर्षी पडणाऱ्या पावसावर अवलंबून असतो. पाणी वितरणाची प्रक्रिया जरा समजून घेऊ या. धरणात साठविलेले पाणी पंपिंग स्टेशनमधून २२ किलोमिटर अंतरावरील नेरपिंगळाई येथील टेकडीवर पाईपलाइनद्वारे चढविले जाते. यासाठी ७५० हॉर्सपॉवरचे पाच पंप पंपिंग स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. नेरपिंगळाई येथे साठविलेले पाणी नंतर उतारामुळे (ग्रॅव्हिटीमार्फत) ३३ किलोमिटरचे अंतर पार करून शहरात आणले जाते. येथील जलशुद्धीकरण केंद्रात सात टप्प्यांमध्ये पाणी शुद्ध केले जाते. पश्चात त्या पाण्याचे वितरण होते. या प्रक्रियेचा महिन्याचा खर्च दोन कोटींच्या घरात आहे. कोणत्याही शहराचा विकास तेथील उद्योगधंद्यांवर अवलंबून असतो व उद्योग हे पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. त्यामुळेच विकासासाठी अमरावतीकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. गावाची, शहराची, राज्याची व देशाची प्रगती साधायची असल्यास आपल्याला पाण्याचे मोल समजावे लागेल व पाण्याचा वापर काटकसरीनेच करावा लागेल. पाणी बचतीचे छोटे-छोटे उपाय अंमलात आणल्यास आपण भीषण पाणीटंचाईवर मात करू शकतो.- संदीप ताटेवार स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती