शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अमरावती : गारपिटीने संत्रा उत्पादकांना 200 कोटी रुपयांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 16:44 IST

अमरावती जिल्ह्यात ११, १२ व १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी व वरूड तालुक्यातील संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

अमरावती - अमरावती जिल्ह्यात ११, १२ व १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी व वरूड तालुक्यातील संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. एक वर्षाच्या कालावधीत तीन वेळा अवकाळीमुळे संत्रा बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. गारपीट व वादळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील १५ हजार हेक्टर क्षेत्रातील संत्रा उत्पादकांचे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज संत्राउत्पादक व जाणकार व्यक्त करीत आहेत. 

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने चांदूर बाजार तालुक्यातील सुमारे ९ हजार, अचलपूरमध्ये ४ हजार, मोर्शी २ हजार ५०० व वरूड तालुक्यात १०० हेक्टरमधील संत्राबागांचे नुकसान झाल्याचा अंदाज संत्रा जाणकार वर्तवण्यात येत आहे. कृषी विभागाने पंचनामे सुरू केले आहे. चांदूर बाजार तालुक्यात आंबिया बहराचे सुमारे १२० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. अचलपूर तालुक्यात ५० कोटी तर मोर्शी तालुक्यात ३० कोटी रुपये, तर वरूड तालुक्यात १० कोटी रुपयांपर्यंत संत्रा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने अद्याप संत्रा बागायतदारांच्या नुकसानाची आकडेवारी जाहीर केली नाही. 

जिल्ह्यात ८७ हजार हेक्टर क्षेत्रात संत्राबागा आहेत. त्यापैकी ५५ हजार हेक्टरमधील संत्राबागा उत्पादनक्षम आहेत. यात ३५ हजार हेक्टर क्षेत्रात मृग बहर घेतला जातो, तर २० हजार हेक्टर क्षेत्रात आंबिया बहरातून उत्पादन घेतले जाते. यंदा मृग बहर अत्यल्प आला, तर आंबिया बहराची फळे मोठ्या प्रमाणात गळल्याने ११०० कोटीचे नुकसान झाले होते.  

मृग बहराच्या फुटीला अवरोध वरूड व मोर्शी तालुक्यात २८ मे २०१७ रोजी आलेल्या अवेळी पावसामुळे मृग बहर फुटीचे प्रमाण केवळ १० टक्क्यांपर्यंतच राहिले. अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने आंबिया बहराची मोठी गळती झाली. ७ डिसेंबर २०१७ ला जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी संयुक्त पंचनाम्याचे आदेश दिलेत. यामध्ये जिल्ह्यातील ११३६ गावांमधील ५९ हजार ९५६ शेतक-यांच्या ५३ हजार ६१२ हेक्टरमधील आंबिया बहराचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. याची मदत अद्याप मिळायची आहे. 

चांदूर बाजार तालुक्यात १२० कोटी रुपयांचे नुकसान गारपिटीने तालुक्यातील २० हजार ५५८ शेतकरी गारद झाले असून, आंबिया बहराचे सरासरी अंदाजे ९० कोटींचे आर्थिक नुकसान त्यांना झेलावे लागत आहे. मृग बहरालाही गारपिटीची झळ पोहोचल्याने त्याचे उत्पादन घेणाºया शेतकºयांना अंदाजे ३० कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :HailstormगारपीटAmravatiअमरावती