शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती : गारपिटीने संत्रा उत्पादकांना 200 कोटी रुपयांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 16:44 IST

अमरावती जिल्ह्यात ११, १२ व १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी व वरूड तालुक्यातील संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

अमरावती - अमरावती जिल्ह्यात ११, १२ व १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी व वरूड तालुक्यातील संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. एक वर्षाच्या कालावधीत तीन वेळा अवकाळीमुळे संत्रा बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. गारपीट व वादळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील १५ हजार हेक्टर क्षेत्रातील संत्रा उत्पादकांचे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज संत्राउत्पादक व जाणकार व्यक्त करीत आहेत. 

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने चांदूर बाजार तालुक्यातील सुमारे ९ हजार, अचलपूरमध्ये ४ हजार, मोर्शी २ हजार ५०० व वरूड तालुक्यात १०० हेक्टरमधील संत्राबागांचे नुकसान झाल्याचा अंदाज संत्रा जाणकार वर्तवण्यात येत आहे. कृषी विभागाने पंचनामे सुरू केले आहे. चांदूर बाजार तालुक्यात आंबिया बहराचे सुमारे १२० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. अचलपूर तालुक्यात ५० कोटी तर मोर्शी तालुक्यात ३० कोटी रुपये, तर वरूड तालुक्यात १० कोटी रुपयांपर्यंत संत्रा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने अद्याप संत्रा बागायतदारांच्या नुकसानाची आकडेवारी जाहीर केली नाही. 

जिल्ह्यात ८७ हजार हेक्टर क्षेत्रात संत्राबागा आहेत. त्यापैकी ५५ हजार हेक्टरमधील संत्राबागा उत्पादनक्षम आहेत. यात ३५ हजार हेक्टर क्षेत्रात मृग बहर घेतला जातो, तर २० हजार हेक्टर क्षेत्रात आंबिया बहरातून उत्पादन घेतले जाते. यंदा मृग बहर अत्यल्प आला, तर आंबिया बहराची फळे मोठ्या प्रमाणात गळल्याने ११०० कोटीचे नुकसान झाले होते.  

मृग बहराच्या फुटीला अवरोध वरूड व मोर्शी तालुक्यात २८ मे २०१७ रोजी आलेल्या अवेळी पावसामुळे मृग बहर फुटीचे प्रमाण केवळ १० टक्क्यांपर्यंतच राहिले. अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने आंबिया बहराची मोठी गळती झाली. ७ डिसेंबर २०१७ ला जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी संयुक्त पंचनाम्याचे आदेश दिलेत. यामध्ये जिल्ह्यातील ११३६ गावांमधील ५९ हजार ९५६ शेतक-यांच्या ५३ हजार ६१२ हेक्टरमधील आंबिया बहराचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. याची मदत अद्याप मिळायची आहे. 

चांदूर बाजार तालुक्यात १२० कोटी रुपयांचे नुकसान गारपिटीने तालुक्यातील २० हजार ५५८ शेतकरी गारद झाले असून, आंबिया बहराचे सरासरी अंदाजे ९० कोटींचे आर्थिक नुकसान त्यांना झेलावे लागत आहे. मृग बहरालाही गारपिटीची झळ पोहोचल्याने त्याचे उत्पादन घेणाºया शेतकºयांना अंदाजे ३० कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :HailstormगारपीटAmravatiअमरावती