शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Amravati: तुरीच्या हमीभावात ४००, सोयाबीनमध्ये ३०० रुपयांनी वाढ, यंदाच्या हंगामाकरिता MSP जाहीर, कापसाचे दर ६४० रुपयांनी वाढले

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 7, 2023 20:13 IST

Amravati: यंदाच्या हंगामाला सुरुवात होत असताना केंद्र शासनाद्वारा हमीभाव जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. अखेर यंदाच्या हमीभावाला मान्यता देण्यात आलेली आहे.

- गजानन मोहोडअमरावती - यंदाच्या हंगामाला सुरुवात होत असताना केंद्र शासनाद्वारा हमीभाव जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. अखेर यंदाच्या हमीभावाला मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार कापूस (लांब धागा) याला गतवर्षीच्या तुलनेत क्विंटलमागे ६४० रुपये, सोयाबीनमध्ये ३००, तर तुरीच्या हमीभावात ४०० रुपयांनी वाढ देण्यात आलेली आहे.

सन २०२३-२४ करिता खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये या वेळेस केंद्र शासनाने वाढ केलेली असली तरी उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा कुठे, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. निविष्ठांची दरवाढ झाल्याने उत्पादनखर्चात अधिक वाढ होत आहे. याशिवाय आपत्तीने हातातोंडचा घास घास हिरावला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी फारसे काही उरत नसल्याचे वास्तव आहे.

कृषिमूल्य आयोगाद्वारा एमएसपीबाबतची शिफारस केंद्र शासनाला करण्यात येत असते. यामध्ये शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल यामध्ये गृहीत धरण्यात आले आहे. याशिवाय बैलजोडी, ट्रॅक्टरद्वारे मशागत, भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीचे भाडे, बियाणे, खते, अवजारे यांवर होणारा खर्च, सिंचन शुल्क, शेतबांधणीवरील घसारा, खेळत्या भांडवलावरील व्याज, सिंचनासाठी लागणारे डिझेल, वीज व शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे श्रमाचे मोल समाविष्ट असतात.

सन २०२३-२४ करिता एमएसपी   ज्वारी  ३१८० (२१० रुपये वाढ),तूर  ७००० (४००),सोयाबीन ४६०० (३००), कापूस (मध्यम धागा) ६६२० (५४०),कापूस (लांब धागा)  ७०२० (६४०), मूग  ८५५८ (८०३), उडीद  ६९५० (३५०) असे सन २०२३-२४ करीता हमीभावाचे दर आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती