शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Amravati: तुरीच्या हमीभावात ४००, सोयाबीनमध्ये ३०० रुपयांनी वाढ, यंदाच्या हंगामाकरिता MSP जाहीर, कापसाचे दर ६४० रुपयांनी वाढले

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 7, 2023 20:13 IST

Amravati: यंदाच्या हंगामाला सुरुवात होत असताना केंद्र शासनाद्वारा हमीभाव जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. अखेर यंदाच्या हमीभावाला मान्यता देण्यात आलेली आहे.

- गजानन मोहोडअमरावती - यंदाच्या हंगामाला सुरुवात होत असताना केंद्र शासनाद्वारा हमीभाव जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. अखेर यंदाच्या हमीभावाला मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार कापूस (लांब धागा) याला गतवर्षीच्या तुलनेत क्विंटलमागे ६४० रुपये, सोयाबीनमध्ये ३००, तर तुरीच्या हमीभावात ४०० रुपयांनी वाढ देण्यात आलेली आहे.

सन २०२३-२४ करिता खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये या वेळेस केंद्र शासनाने वाढ केलेली असली तरी उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा कुठे, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. निविष्ठांची दरवाढ झाल्याने उत्पादनखर्चात अधिक वाढ होत आहे. याशिवाय आपत्तीने हातातोंडचा घास घास हिरावला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी फारसे काही उरत नसल्याचे वास्तव आहे.

कृषिमूल्य आयोगाद्वारा एमएसपीबाबतची शिफारस केंद्र शासनाला करण्यात येत असते. यामध्ये शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल यामध्ये गृहीत धरण्यात आले आहे. याशिवाय बैलजोडी, ट्रॅक्टरद्वारे मशागत, भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीचे भाडे, बियाणे, खते, अवजारे यांवर होणारा खर्च, सिंचन शुल्क, शेतबांधणीवरील घसारा, खेळत्या भांडवलावरील व्याज, सिंचनासाठी लागणारे डिझेल, वीज व शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे श्रमाचे मोल समाविष्ट असतात.

सन २०२३-२४ करिता एमएसपी   ज्वारी  ३१८० (२१० रुपये वाढ),तूर  ७००० (४००),सोयाबीन ४६०० (३००), कापूस (मध्यम धागा) ६६२० (५४०),कापूस (लांब धागा)  ७०२० (६४०), मूग  ८५५८ (८०३), उडीद  ६९५० (३५०) असे सन २०२३-२४ करीता हमीभावाचे दर आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती