शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अमरावती : विकास आराखड्यावर ग्रामपंचायतींची मदार; ‘आमचं गाव - आमचा विकास’ उपक्रम; लोकसहभागाची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 16:50 IST

‘आमचं गाव - आमचा विकास’ उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ‘ग्रामपंचायत विकास आराखडा - जीपीडीपी’ तयार करावयाचा असून, त्यावर शासननिधीची मदार राहणार आहे

अमरावती : ‘आमचं गाव - आमचा विकास’ उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ‘ग्रामपंचायत विकास आराखडा - जीपीडीपी’ तयार करावयाचा असून, त्यावर शासननिधीची मदार राहणार आहे. सन २०१८-१९ चा वार्षिक आराखडा अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींनी प्रस्तावित उपक्रम व वस्तुनिष्ठ अपेक्षित निधी विचारात घेऊन विकास आराखडा अंतिम करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करताना राबविण्यात आलेल्या लोकसहभागाच्या नियोजन प्रक्रियेमुळे गावांच्या विविध स्वरूपाच्या व वेगवेगळ्या क्षेत्रातील गरजा निश्चित करून गरजांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. तथापि, ग्रामपंचायतींनी विकास आराखड्यासाठी वेगवेगळ्या निधीच्या स्रोतातून उपलब्ध होणाºया निधीचा घेतलेला अंदाज वस्तुनिष्ठ नसल्याचे निरीक्षण सरकारने नोंदविले. त्या पार्श्वभूमीवर सन २०१७-१८ च्या वार्षिक आराखड्यानुसार प्रत्येक स्रोतामधून अपेक्षित निधी व प्रत्यक्षात प्राप्त झालेला निधी विचारात घेऊन सन २०१८-१९ चा वस्तुनिष्ठ अपेक्षित निधी निश्चित करावा; अपेक्षित निधीनुसार मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सन २०१८-१९ चा वार्षिक आराखडा अंतिम करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.

ग्रामपंचायत हद्दीतील व मालकीच्या आणि जिल्हा परिषदेच्या मालकीच्या, तथापि गावासाठी वापरत असलेल्या सर्व शाळा, अंगणवाड्या इमारतीची दुरूस्ती व देखभालीसाठी पुरेशी तरतूद करावी. यात ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, स्वच्छतागृहांचा समावेश असावा, वार्षिक आराखडा अंतिम करताना ग्रामपंचायतींनी सामूहिक स्वरूपाच्या प्रकल्पांवर प्राधान्याने निधीची तरतूद करणे अपेक्षित आहे.

या बाबींचा समावेश दरवर्षी ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचे अभिसरण (कन्व्हर्ज$न्स) करून योजनांतर्गत जास्तीत जास्त निधी प्राप्त करण्याचा प्रथम प्रयत्न करावा. दारिद्र्य निर्मूलन, लिंगभाव समानता, स्वच्छ व सुरक्षित पाणी, स्वच्छता, शांतता, न्याय, सर्वसमावेशक विकास, समानता, उद्योजकता, मूलभूत सुविधा या बाबी ग्रामपंचायतींना विकास आराखड्यात अंतर्भूत राहणार आहेत. ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना प्रवीण प्रशिक्षक व प्रभारी अधिकाºयांची मदत घेतली जाणार आहे.