शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

अमरावती : विकास आराखड्यावर ग्रामपंचायतींची मदार; ‘आमचं गाव - आमचा विकास’ उपक्रम; लोकसहभागाची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 16:50 IST

‘आमचं गाव - आमचा विकास’ उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ‘ग्रामपंचायत विकास आराखडा - जीपीडीपी’ तयार करावयाचा असून, त्यावर शासननिधीची मदार राहणार आहे

अमरावती : ‘आमचं गाव - आमचा विकास’ उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ‘ग्रामपंचायत विकास आराखडा - जीपीडीपी’ तयार करावयाचा असून, त्यावर शासननिधीची मदार राहणार आहे. सन २०१८-१९ चा वार्षिक आराखडा अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींनी प्रस्तावित उपक्रम व वस्तुनिष्ठ अपेक्षित निधी विचारात घेऊन विकास आराखडा अंतिम करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करताना राबविण्यात आलेल्या लोकसहभागाच्या नियोजन प्रक्रियेमुळे गावांच्या विविध स्वरूपाच्या व वेगवेगळ्या क्षेत्रातील गरजा निश्चित करून गरजांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. तथापि, ग्रामपंचायतींनी विकास आराखड्यासाठी वेगवेगळ्या निधीच्या स्रोतातून उपलब्ध होणाºया निधीचा घेतलेला अंदाज वस्तुनिष्ठ नसल्याचे निरीक्षण सरकारने नोंदविले. त्या पार्श्वभूमीवर सन २०१७-१८ च्या वार्षिक आराखड्यानुसार प्रत्येक स्रोतामधून अपेक्षित निधी व प्रत्यक्षात प्राप्त झालेला निधी विचारात घेऊन सन २०१८-१९ चा वस्तुनिष्ठ अपेक्षित निधी निश्चित करावा; अपेक्षित निधीनुसार मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सन २०१८-१९ चा वार्षिक आराखडा अंतिम करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.

ग्रामपंचायत हद्दीतील व मालकीच्या आणि जिल्हा परिषदेच्या मालकीच्या, तथापि गावासाठी वापरत असलेल्या सर्व शाळा, अंगणवाड्या इमारतीची दुरूस्ती व देखभालीसाठी पुरेशी तरतूद करावी. यात ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, स्वच्छतागृहांचा समावेश असावा, वार्षिक आराखडा अंतिम करताना ग्रामपंचायतींनी सामूहिक स्वरूपाच्या प्रकल्पांवर प्राधान्याने निधीची तरतूद करणे अपेक्षित आहे.

या बाबींचा समावेश दरवर्षी ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचे अभिसरण (कन्व्हर्ज$न्स) करून योजनांतर्गत जास्तीत जास्त निधी प्राप्त करण्याचा प्रथम प्रयत्न करावा. दारिद्र्य निर्मूलन, लिंगभाव समानता, स्वच्छ व सुरक्षित पाणी, स्वच्छता, शांतता, न्याय, सर्वसमावेशक विकास, समानता, उद्योजकता, मूलभूत सुविधा या बाबी ग्रामपंचायतींना विकास आराखड्यात अंतर्भूत राहणार आहेत. ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना प्रवीण प्रशिक्षक व प्रभारी अधिकाºयांची मदत घेतली जाणार आहे.