शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

अमरावतीतील तरुणी प्रचंड दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:24 IST

शहर तथा जिल्ह्यातील महिला व तरुणी प्रचंड दहशतीत असून, महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी ठोस व कठोर पावले उचलायला हवी, असे राष्ट्रवादी युवती महिला काँग्रेसने पत्रपरिषदेतून आवाहन केले. अमरावती पोलीस गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राष्ट्रवादी युवती काँग्रेसने केला आहे.

ठळक मुद्देपत्रपरिषद : राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा आरोप,पोलिसांनी उचलावे पावले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर तथा जिल्ह्यातील महिला व तरुणी प्रचंड दहशतीत असून, महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी ठोस व कठोर पावले उचलायला हवी, असे राष्ट्रवादी युवती महिला काँग्रेसने पत्रपरिषदेतून आवाहन केले. अमरावती पोलीस गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राष्ट्रवादी युवती काँग्रेसने केला आहे.दौऱ्यावर असणाºया राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे, संगीता ठाकरे, रूपाली बुले, प्रदेश सचिव कल्पना वानखडे, राई देशमुख, संगीता देशमुख, छाया कडू, स्नेहा जाणे, पूजा कोठे, सरला इंगळे यांनी बुधवारी पत्रपरिषदेतून पोलीस विभागावर ताशेरे ओढले. अमरावतीत भरदिवसा एका तरुणीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. यापूर्वीही महिलावरील हल्ले व अत्याचारांच्या घटना शहरात घडल्या आहेत. तरुण विद्यार्थिंनीवर होणाºया या हल्ल्याच्या घटना पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. तरुणीवर सतरा चाकूचे वार केले जातात. हा अमानवीय प्रकार पुढे आला आहे. या घटनेमुळे शहरासह जिल्ह्यातील महिला व तरुणी स्वत:ला आता असुरक्षित समजू लागल्या आहेत. या गंभीर विषयाच्या अनुषंगाने सक्षणा यांनी शहरातील एका महाविद्यालयाला भेट दिली, त्यावेळी विद्यार्थिनीने नाव न सांगण्याच्या अटीवर ती प्रचंड दहशतीत व भीतीत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे वरूड येथील एक विद्यार्थिनीदेखील भयभित झाल्याचे त्यांना आढळले. पोलीस महिलांना सुरक्षित वातावरण देण्यात अपयशी ठरले आहे. पोलीस आयुक्त संजय बावीस्कर यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कडक पावले उचलण्याची गरज होती. परंतु, त्यांनी काहीच केले नाही. दामिनी पथकदेखील दिसेनासे झाले. राज्यातील गुन्हेगारीत अमरावती शहराची परिस्थितीही आता सर्वाची धोक्याची झाल्याचे राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले.सक्षणा यांचे डोळे पाणावलेराष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी राजापेठ हद्दीत घडलेल्या हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी तरुणीची भेट घेतली. मैत्रिणीच्या हत्येचा थरारक अनुभव त्या तरुणीने भयभीत अवस्थेत सक्षणा यांना सांगितले. पत्रपरिषदेत बोलताना त्या तरुणीची व्यथा सांगताना सक्षणा यांचे डोळे पाणावले.विजया रहाटकर यांचे मौन का?राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महिलांविषयक अनेक चांगले निर्णय घेतले. मात्र, महिलांच्या सुरक्षेविषयीच त्यांनी चुप्पी साधली आहे. भाजप आमदार राम कदमसह अन्य भाजप नेत्यांच्या महिलांविषयक भाष्यावर त्यांनी मौन धरले. महिलांच्या सुरक्षेविषयी कामकाज करताना अपमान केला जातो. याविषयी त्यांनी मौन बाळगल्याचा आरोप महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी केला आहे.मुख्यमंत्री धृतराष्ट्र असल्याची टीकाराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धृतराष्ट्र असल्याची टीका राष्ट्रवादीच्या महिलांनी पत्रपरिषदेतून केली. अमरावती शहरासह राज्यातील कायदा व सुव्यवस्थेकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुर्लक्ष आहे. गृहखाते त्यांनी आता सोडले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. महिलांच्या सुरक्षेला सरकार व पोलीस प्राधान्य देत नाही. आघाडी सरकारच्या कार्यकाळापेक्षा गेल्या पाच वर्षांत राज्यात गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.