शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीतील तरुणी प्रचंड दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:24 IST

शहर तथा जिल्ह्यातील महिला व तरुणी प्रचंड दहशतीत असून, महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी ठोस व कठोर पावले उचलायला हवी, असे राष्ट्रवादी युवती महिला काँग्रेसने पत्रपरिषदेतून आवाहन केले. अमरावती पोलीस गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राष्ट्रवादी युवती काँग्रेसने केला आहे.

ठळक मुद्देपत्रपरिषद : राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा आरोप,पोलिसांनी उचलावे पावले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर तथा जिल्ह्यातील महिला व तरुणी प्रचंड दहशतीत असून, महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी ठोस व कठोर पावले उचलायला हवी, असे राष्ट्रवादी युवती महिला काँग्रेसने पत्रपरिषदेतून आवाहन केले. अमरावती पोलीस गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राष्ट्रवादी युवती काँग्रेसने केला आहे.दौऱ्यावर असणाºया राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे, संगीता ठाकरे, रूपाली बुले, प्रदेश सचिव कल्पना वानखडे, राई देशमुख, संगीता देशमुख, छाया कडू, स्नेहा जाणे, पूजा कोठे, सरला इंगळे यांनी बुधवारी पत्रपरिषदेतून पोलीस विभागावर ताशेरे ओढले. अमरावतीत भरदिवसा एका तरुणीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. यापूर्वीही महिलावरील हल्ले व अत्याचारांच्या घटना शहरात घडल्या आहेत. तरुण विद्यार्थिंनीवर होणाºया या हल्ल्याच्या घटना पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. तरुणीवर सतरा चाकूचे वार केले जातात. हा अमानवीय प्रकार पुढे आला आहे. या घटनेमुळे शहरासह जिल्ह्यातील महिला व तरुणी स्वत:ला आता असुरक्षित समजू लागल्या आहेत. या गंभीर विषयाच्या अनुषंगाने सक्षणा यांनी शहरातील एका महाविद्यालयाला भेट दिली, त्यावेळी विद्यार्थिनीने नाव न सांगण्याच्या अटीवर ती प्रचंड दहशतीत व भीतीत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे वरूड येथील एक विद्यार्थिनीदेखील भयभित झाल्याचे त्यांना आढळले. पोलीस महिलांना सुरक्षित वातावरण देण्यात अपयशी ठरले आहे. पोलीस आयुक्त संजय बावीस्कर यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कडक पावले उचलण्याची गरज होती. परंतु, त्यांनी काहीच केले नाही. दामिनी पथकदेखील दिसेनासे झाले. राज्यातील गुन्हेगारीत अमरावती शहराची परिस्थितीही आता सर्वाची धोक्याची झाल्याचे राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले.सक्षणा यांचे डोळे पाणावलेराष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी राजापेठ हद्दीत घडलेल्या हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी तरुणीची भेट घेतली. मैत्रिणीच्या हत्येचा थरारक अनुभव त्या तरुणीने भयभीत अवस्थेत सक्षणा यांना सांगितले. पत्रपरिषदेत बोलताना त्या तरुणीची व्यथा सांगताना सक्षणा यांचे डोळे पाणावले.विजया रहाटकर यांचे मौन का?राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महिलांविषयक अनेक चांगले निर्णय घेतले. मात्र, महिलांच्या सुरक्षेविषयीच त्यांनी चुप्पी साधली आहे. भाजप आमदार राम कदमसह अन्य भाजप नेत्यांच्या महिलांविषयक भाष्यावर त्यांनी मौन धरले. महिलांच्या सुरक्षेविषयी कामकाज करताना अपमान केला जातो. याविषयी त्यांनी मौन बाळगल्याचा आरोप महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी केला आहे.मुख्यमंत्री धृतराष्ट्र असल्याची टीकाराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धृतराष्ट्र असल्याची टीका राष्ट्रवादीच्या महिलांनी पत्रपरिषदेतून केली. अमरावती शहरासह राज्यातील कायदा व सुव्यवस्थेकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुर्लक्ष आहे. गृहखाते त्यांनी आता सोडले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. महिलांच्या सुरक्षेला सरकार व पोलीस प्राधान्य देत नाही. आघाडी सरकारच्या कार्यकाळापेक्षा गेल्या पाच वर्षांत राज्यात गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.