शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील १,६४७ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त,  अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक ४८७ ग्रापंचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 17:22 IST

विभागात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात राबविलेल्या अभियानात तीन हजार ९२५ पैकी एक हजार ६४७ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ४८७ ग्रामपंचायती अमरावती जिल्ह्यामधील आहेत.

अमरावती  - विभागात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात राबविलेल्या अभियानात तीन हजार ९२५ पैकी एक हजार ६४७ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ४८७ ग्रामपंचायती अमरावती जिल्ह्यामधील आहेत. यापैकी ६०७ ग्रामपंचायतींचे समितीच्या मार्फत तपासणी करण्यात येऊन शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे. अमरावती विभागात एकूण तीन हजार ९२५ ग्रामपंचायती आहेत. यापैकी २१६ ग्रामपंचायती मार्च २०१५ अखेर, तर २०१६-१७ मध्ये सद्यस्थितीत एक हजार ४३१ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झालेल्या आहेत. ही ४२.०९ टक्केवारी आहे यापैकी ६०७ ग्रामपंचायतींचे समितीद्वारा तपासणीदेखील झालेली आहे. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यातील ८३९ पैकी ४८७, अकोला जिल्ह्यातील ५३२ पैकी २१६, बुलडाणा जिल्ह्यातील ८६६ पैकी ३२४, वाशिम जिल्ह्यातील ४९० पैकी २१८, तर यवतमाळ जिल्ह्यातील १,१९८ पैकी ४०७ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झालेल्या आहेत.विभागातील सात तालुके हगणदारीमुक्त झालेले आहेत. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे व तिवसा, बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर व शेगाव, यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव व वाशिम जिल्ह्यातील कारंजा या तालुक्यांचा समावेश आहे. २०१२ च्या सर्वेक्षणानुसार यासर्व तालुक्यात १,३९,६५४ कुटुंबे आहेत व यापैकी १,३९,४०२ कुटुंबाकडे शौचालय आहेत. ही ९९.८२ टक्केवारी आहे. चार लाख २६ हजार कुटुंबाकडे शौचालयेच नाहीतबेसलाईन सर्वेक्षणानुसार विभागात १५ लाख ३५ हजार कुटुंब आहेत. यापैकी ११ लाख १० हजार कुटुंबाकडे शौचालय आहेत. ही ७२.२३ टक्केवारी आहे. चार लाख २६ हजार कुटुंबाकडे अद्यापही शौचालय नाहीत. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ५२,३७६, अकोला जिल्ह्यात ५०,२३३, बुलडाणा जिल्ह्यात १,१०,२४०, वाशिम जिल्ह्यात ६१,३३५ व यवतमाळ जिल्ह्यात १,५२,४०० कुटूंबाकडे शौचालय नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई