शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील १,६४७ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त,  अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक ४८७ ग्रापंचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 17:22 IST

विभागात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात राबविलेल्या अभियानात तीन हजार ९२५ पैकी एक हजार ६४७ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ४८७ ग्रामपंचायती अमरावती जिल्ह्यामधील आहेत.

अमरावती  - विभागात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात राबविलेल्या अभियानात तीन हजार ९२५ पैकी एक हजार ६४७ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ४८७ ग्रामपंचायती अमरावती जिल्ह्यामधील आहेत. यापैकी ६०७ ग्रामपंचायतींचे समितीच्या मार्फत तपासणी करण्यात येऊन शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे. अमरावती विभागात एकूण तीन हजार ९२५ ग्रामपंचायती आहेत. यापैकी २१६ ग्रामपंचायती मार्च २०१५ अखेर, तर २०१६-१७ मध्ये सद्यस्थितीत एक हजार ४३१ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झालेल्या आहेत. ही ४२.०९ टक्केवारी आहे यापैकी ६०७ ग्रामपंचायतींचे समितीद्वारा तपासणीदेखील झालेली आहे. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यातील ८३९ पैकी ४८७, अकोला जिल्ह्यातील ५३२ पैकी २१६, बुलडाणा जिल्ह्यातील ८६६ पैकी ३२४, वाशिम जिल्ह्यातील ४९० पैकी २१८, तर यवतमाळ जिल्ह्यातील १,१९८ पैकी ४०७ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झालेल्या आहेत.विभागातील सात तालुके हगणदारीमुक्त झालेले आहेत. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे व तिवसा, बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर व शेगाव, यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव व वाशिम जिल्ह्यातील कारंजा या तालुक्यांचा समावेश आहे. २०१२ च्या सर्वेक्षणानुसार यासर्व तालुक्यात १,३९,६५४ कुटुंबे आहेत व यापैकी १,३९,४०२ कुटुंबाकडे शौचालय आहेत. ही ९९.८२ टक्केवारी आहे. चार लाख २६ हजार कुटुंबाकडे शौचालयेच नाहीतबेसलाईन सर्वेक्षणानुसार विभागात १५ लाख ३५ हजार कुटुंब आहेत. यापैकी ११ लाख १० हजार कुटुंबाकडे शौचालय आहेत. ही ७२.२३ टक्केवारी आहे. चार लाख २६ हजार कुटुंबाकडे अद्यापही शौचालय नाहीत. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ५२,३७६, अकोला जिल्ह्यात ५०,२३३, बुलडाणा जिल्ह्यात १,१०,२४०, वाशिम जिल्ह्यात ६१,३३५ व यवतमाळ जिल्ह्यात १,५२,४०० कुटूंबाकडे शौचालय नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई