शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

अमरावती जिल्ह्यात १,५४६ गावांनी वेशीवरच रोखला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 11:46 IST

अमरावती : जिल्ह्यात १,५४६ गावांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रभावी अंमल करून कोरोनाचा संसर्ग गाव वेशीवर रोखला असल्याची सुखद वार्ता आहे.

ठळक मुद्दे१४१ गावांत आढळले ७७३ रूग्ण४३८ जणांची कोरोनावर मातग्रामीण भागात २९ जणांचा मृत्यू

जितेंद्र दखने।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात १३१ दिवसांत ३ हजार ४६७ कोरोना संक्रमितांची नोंद झाली. महापालिका क्षेत्रासह जिल्ह्याच्या १४१ गावांमध्ये कोरोनाग्रस्त निष्पन्न झाले आहेत. मात्र, १,५४६ गावांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रभावी अंमल करून कोरोनाचा संसर्ग गाव वेशीवर रोखला असल्याची सुखद वार्ता आहे.

अमरावती महापालिका क्षेत्रात हाथीपुरा भागात ४ एप्रिलला जिल्ह्यातील पहिल्या कोरोना संक्रमित रुग्णाची नोंद झाली होती. त्यानंतर ग्रामीण भागात शिराळा येथे २ मे रोजी संक्रमित रुग्णाची नोंद करण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, ग्रामीण भागात बुधवारपर्यंत १४१ गावांत ७७३ कोरोना संक्रमितांची नोंद झाली. त्यापैकी ३०६ जणांवर कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. ४३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ग्रामीण भागात २९ संक्रमितांचे मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वात ‘अमरावतीकर, मात करूया कोरोनावर’ या मोहिमेंतर्गत , १४ पंचायत समिती, १० नगर परिषद, चार नगरपंचायतींमध्ये गाव व वॉर्डनिहाय वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून चार वेळा सर्वेक्षण करण्यात आले. गावात बाहेरून आलेल्या व्यक्ती तसेच सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तीचा नोंदी घेण्यात आल्यात. बाहेरून आलेल्या व्यक्तींना सक्तीने स्थानिक शाळा, वसतिगृह इमारतींमध्ये १४ दिवस क्वारंटाईन करून आजारी व्यक्तीशी वारंवार संपर्क साधण्यात आला. आवश्यक तेव्हा तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संपर्क साधून संबंधित व्यक्तींची तपासणी तसेच त्यापैकी आजारी व्यक्तींना आवश्कयतेनुसार स्वॅब टेस्टकरिता रेफर करणे यांसारख्या उपाययोजना गावोगावी करण्यात आल्याने जिल्ह्यातील १३ आॅगस्टपर्यत दीड हजार गावे कोरोनामुक्त आहेत. गावकऱ्यांची सकारात्मक वृत्ती, त्याला प्रशासनाची समर्थ अशी साथ मिळाल्याने जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यास मदत झाली.

नेमके काय केले?१४ तालुक्यांतील प्रत्येक गावात १६ मार्चपासून कोरोना सनियंत्रण व दक्षता समितीची स्थापना करण्यात आली.ग्रामस्तरीय कोरोना संनियंत्रण समितीद्वारे गावोगावी ’डोअर टू डोअर’ सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.निर्जंतुकीरण करण्यासाठी धुरळणी व सोडियम हायपोक्लोराईडची नियमित फवारणी करण्यात आलीकोविड १९ चा संसर्ग गावात होऊ नये, याकरीता बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश करु नये यासाठी नाकाबंदी.प्रत्येक व्यक्तीने नियमित हात धुणे, सॅनिटायझर, साबण तसेच चेहºयाला मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले.संसर्गापासून बचावासाठी जाहीर मुनादी, प्रसिध्दी पत्रक व ध्वनिक्षेपकाद्वारे प्रबोधन केले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या