शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

अमरावती शहराची लोकसंख्या दहा लाख; 'ट्रॅफिक सिग्नल' केवळ पाच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 12:51 IST

Amravati : महानगरात प्रमुख ४० चौक; वाहतुकीची वाताहत, नव्याने २५ चौकात सिग्नलची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठे शहर आणि विभागस्तरावर नावलौकिक असलेल्या महानगराची वाहतूक कोंडीमुळे वाट लागली आहे. महानगराची सुमारे दहा लाख लोकसंख्या असताना वाहतूक नियंत्रण करणारे केवळ पाचच 'ट्रॅफिक सिग्नल' सुरू असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे नव्याने २५ चौकात सिग्नलची गरज भासू लागली आहे.

विदर्भात नागपूर आणि अमरावती हे प्रादेशिक जिल्हे असून, विभागाची प्रमुख शहरे मानली जातात. नागपूर शहराने विकासाची कात टाकली आहे. वाहतूक आणि रस्ते नियोजनात नागपूर आघाडीवर आहे. मात्र, विकासात्मकदृष्ट्या अमरावती शहर प्रचंड माघारले आहे. एक मॉडेल स्टेशन वगळता औद्यागिक, शैक्षणिक आणि दळणवळणाच्या बाबतीत अमरावतीची वाट लागली आहे. अमरावतीत विकासाच्या नियोजनाचा अभाव हे महत्त्वाचे कारण दिसून येते.

शहराची वाहतूक म्हणजे सर्कसशहराची लोकसंख्या वाढल्यामुळे आयुक्तालय निर्माण करण्यात आले. त्यामुळे पोलिसांना बळ मिळाले. मात्र, येथील अंतर्गत वाहतूक ही वाहनधारकांसाठी सर्कस ठरली आहे. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने ऑटोरिक्षांची संख्या विदर्भात प्रथम क्रमांकाची आहे. एका प्रवाशाकरिता अनेक ऑटोरिक्षा उभे येऊन ठाकतात. महत्त्वाच्या चौकात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब आहे.

पाच 'ट्रॅफिक सिग्नल' सुरूशहरात किमान ४० चौक आहेत. या सर्व चौकांमध्ये सकाळ, सायंकाळी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. वाहतूक नियंत्रणासाठी किमान २८ चौकात 'ट्रॅफिक सिग्नल' आवश्यक आहेत. असे असले तरी पंचवटी चौक, ईर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, राजकमल चौक, शेगाव नाका या पाच ठिकाणी 'ट्रॅफिक सिग्नल' आहेत.

या चौकात हवे नवीन 'ट्रॅफिक सिग्नल'अमरावती महानगरात वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाला काही ठिकाणी नवीन 'ट्रॅफिक सिग्नल' निर्माण करणे गरजेचे आहे. यात गांधी चौक, जवाहर गेट, ईतवारा बाजार, नवाथे चौक, सरोज चौक, जयस्तंभ चौक, गोपालनगर डी मार्ट चौक, यशोदानगर, दस्तुरनगर, मोतीनगर चौक, मध्यवर्ती बसस्थानक, अमरावती रेल्वे स्थानक चौक, कॉटन मार्केट चौक, वडाळी ऑक्सिजन पार्क, सुंदरलाल चौक, चपराशी पुरा, रहाटगाव रिंग रोड, नवसारी रिंग रोड, कठोरा नाका ट्रॅव्हल्स पॉईंट, विदर्भ महाविद्यालय, कॅम्प चौक, विलासनगर, राजापेठ, चांदणी चौक, फरशी स्टॉप यासह बडनेरा जुनी वस्ती तसेच अकोला- यवतमाळ मार्गावर टी पॉईंट या ठिकाणी स्वयंचलित ट्रॅफिक सिग्नल लावणे काळाची गरज झाली आहे.

या चौकात बंद आहेत सिग्नल • बस स्थानक • रुक्मिणीनगर • जिल्हाधिकारी कार्यालय चौक • रहाटगाव रिंग रोड बियाणी चौक • चपराशीपुरा चोंक

शहरातील अनेक महत्वपुर्ण ठिकाणी वाहतूक नियमनासाठी ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. काही ठिकाणी ब्लिकर्स लावण्यात आली आहेत. शाळांसह काही ठिकाणी सिग्नल नसले तरी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात असतात.- संजय अढाऊ, वाहतूक पोलिस निरिक्षक

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAmravatiअमरावती