शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

राज्यातील पाच हजार गावांना ‘पोखरा’ची मात्रा, हवामानाकूल पीक बदलाद्वारे शाश्वत उत्पन्नावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 15:12 IST

लहरी हवामानामुळे शेतीपिकावर होणारे परिणाम व विविध समस्यांवर मात करण्यासाठी विदर्भ व मराठवाड्यातील ५,१४२ गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) राबविण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सहा वर्षांपर्यंत असणा-या या प्रकल्पासाठी सद्यस्थितीत गाव समित्या, गावसमूह व पहिल्या टप्प्यातील गावांमध्ये राबविण्याच्या कामांचे प्राधान्यक्रम ठरविण्यात येत आहे. 

 - गजानन मोहोड 

अमरावती  - लहरी हवामानामुळे शेतीपिकावर होणारे परिणाम व विविध समस्यांवर मात करण्यासाठी विदर्भ व मराठवाड्यातील ५,१४२ गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) राबविण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सहा वर्षांपर्यंत असणा-या या प्रकल्पासाठी सद्यस्थितीत गाव समित्या, गावसमूह व पहिल्या टप्प्यातील गावांमध्ये राबविण्याच्या कामांचे प्राधान्यक्रम ठरविण्यात येत आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांतील ५,१४२ गावांमध्ये ६ वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यामध्ये ४ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. यापैकी २,८०० कोटी जागतिक बँकेकडून अल्प व्याजदारात कर्जस्वरूपात उपलब्ध होणार आहे, तर राज्य शासनाचे स्वनिधी १२०० कोटींची गुंतवणूक यामध्ये राहणार आहे.  प्रकल्पांतर्गत गाव समूहातील प्रत्येक गावाचे सूक्ष्म नियोजन  आराखडे तयार करून ग्रामसभेच्या मान्यतेने व सरपंचाच्या अध्यक्षतेखालील कृषी संजीवनी समितीद्वारे गावात कामे सुरू करण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे. हवामान बदलास अनुसरून कृषी पद्धती विकसित करणे, अल्प व अत्यल्प शेतकºयांच्या कृषी उत्पादकतेत वृद्धी करणे, शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी मूल्य साखळीत त्याचा सहभाग वाढविणे, शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी प्रयत्न करणे, हा उद्देश आहे. क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन, संरक्षित शेती, पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर, भूजल पुनर्भरण, काढणीपश्चात व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीमालाचे संकलन, हाताळणी, मूल्यवृद्धी विक्री आदीबाबत सहाय्य, बियाणे वितरण प्रणालीची कार्यक्षमता वृद्धींगत करणे, पीक पद्धतीत बदल करण्याबाबत शेतक-यांना प्रोत्साहन देणे, पिकांचे हवामानाकुल वाण विकसित करणे आदी घटक आहेत.

राज्यातील १५ जिल्ह्यांचा समावेश- या प्रकल्पात विदर्भातील २,०५४ गावांचा समावेश आहे. यामध्ये अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातीळ ४९८, अमरावती ५३२, बुलडाणा ४४१, वाशिम १४९, यवतमाळ ३०९ तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील १२५ गावांचा समावेश आहे.- मराठवाड्यातील ३,०८८ गावे प्रकल्पात आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ४०६, बीड  ३९१, हिंगोली २४०, जळगाव ४६०, जालना ३६३, लातूर २८२, नांदेड ३८४, उस्मानाबाद २८७ वपरभणी जिल्ह्यातील २७५ जावांचा समावेश आहे.

टॅग्स :agricultureशेतीAmravatiअमरावती