शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

राज्यातील पाच हजार गावांना ‘पोखरा’ची मात्रा, हवामानाकूल पीक बदलाद्वारे शाश्वत उत्पन्नावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 15:12 IST

लहरी हवामानामुळे शेतीपिकावर होणारे परिणाम व विविध समस्यांवर मात करण्यासाठी विदर्भ व मराठवाड्यातील ५,१४२ गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) राबविण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सहा वर्षांपर्यंत असणा-या या प्रकल्पासाठी सद्यस्थितीत गाव समित्या, गावसमूह व पहिल्या टप्प्यातील गावांमध्ये राबविण्याच्या कामांचे प्राधान्यक्रम ठरविण्यात येत आहे. 

 - गजानन मोहोड 

अमरावती  - लहरी हवामानामुळे शेतीपिकावर होणारे परिणाम व विविध समस्यांवर मात करण्यासाठी विदर्भ व मराठवाड्यातील ५,१४२ गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) राबविण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सहा वर्षांपर्यंत असणा-या या प्रकल्पासाठी सद्यस्थितीत गाव समित्या, गावसमूह व पहिल्या टप्प्यातील गावांमध्ये राबविण्याच्या कामांचे प्राधान्यक्रम ठरविण्यात येत आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांतील ५,१४२ गावांमध्ये ६ वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यामध्ये ४ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. यापैकी २,८०० कोटी जागतिक बँकेकडून अल्प व्याजदारात कर्जस्वरूपात उपलब्ध होणार आहे, तर राज्य शासनाचे स्वनिधी १२०० कोटींची गुंतवणूक यामध्ये राहणार आहे.  प्रकल्पांतर्गत गाव समूहातील प्रत्येक गावाचे सूक्ष्म नियोजन  आराखडे तयार करून ग्रामसभेच्या मान्यतेने व सरपंचाच्या अध्यक्षतेखालील कृषी संजीवनी समितीद्वारे गावात कामे सुरू करण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे. हवामान बदलास अनुसरून कृषी पद्धती विकसित करणे, अल्प व अत्यल्प शेतकºयांच्या कृषी उत्पादकतेत वृद्धी करणे, शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी मूल्य साखळीत त्याचा सहभाग वाढविणे, शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी प्रयत्न करणे, हा उद्देश आहे. क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन, संरक्षित शेती, पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर, भूजल पुनर्भरण, काढणीपश्चात व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीमालाचे संकलन, हाताळणी, मूल्यवृद्धी विक्री आदीबाबत सहाय्य, बियाणे वितरण प्रणालीची कार्यक्षमता वृद्धींगत करणे, पीक पद्धतीत बदल करण्याबाबत शेतक-यांना प्रोत्साहन देणे, पिकांचे हवामानाकुल वाण विकसित करणे आदी घटक आहेत.

राज्यातील १५ जिल्ह्यांचा समावेश- या प्रकल्पात विदर्भातील २,०५४ गावांचा समावेश आहे. यामध्ये अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातीळ ४९८, अमरावती ५३२, बुलडाणा ४४१, वाशिम १४९, यवतमाळ ३०९ तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील १२५ गावांचा समावेश आहे.- मराठवाड्यातील ३,०८८ गावे प्रकल्पात आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ४०६, बीड  ३९१, हिंगोली २४०, जळगाव ४६०, जालना ३६३, लातूर २८२, नांदेड ३८४, उस्मानाबाद २८७ वपरभणी जिल्ह्यातील २७५ जावांचा समावेश आहे.

टॅग्स :agricultureशेतीAmravatiअमरावती