शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
4
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
5
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
6
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
7
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
8
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
9
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
10
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
11
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
12
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
13
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
14
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
15
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
16
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
17
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
18
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
19
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
20
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
Daily Top 2Weekly Top 5

अंबा, एकवीरा देवीच्या महाप्रसादात भेदभाव का?

By admin | Updated: October 26, 2015 00:30 IST

विदर्भनगरीचे कुलदैवत अंबा-एकवीरेचा नवरात्रौत्सव नुकताच आटोपलाय. या अनुषंगाने रविवारी दोन्ही संस्थानांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

निमंत्रितांनाच प्रवेश : गोरगरीब, सामान्यांसह हजारो भाविक प्रसादापासून वंचितवैभव बाबरेकर  अमरावतीविदर्भनगरीचे कुलदैवत अंबा-एकवीरेचा नवरात्रौत्सव नुकताच आटोपलाय. या अनुषंगाने रविवारी दोन्ही संस्थानांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मात्र, निवडक निमंत्रितांनाच महाप्रसादाचा लाभ मिळाला. इतर शेकडो गोरगरीब भाविक मात्र या महाप्रसादापासून वंचित राहिले. वास्तविक निमंत्रणाद्वारे झडतात त्या जेवणावळी, महाप्रसाद नव्हे. याचा अंबा-एकवीरा देवी विश्वस्तांना विसर पडला की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरवर्षी नवरात्रौत्सवात अंबा-एकवीरेच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची अंबानगरीत गर्दी उसळते. नऊ दिवस शहर गजबजलेले असते. राज्यभरातून लाखो भाविक अंबा-एकवीरेच्या दर्शनासाठी येतात. संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी एकविरा देवी संस्थानाला ८० ते ९० लाखांच्या जवळपास दानाची रक्कम भक्तांकडून प्राप्त होते. मात्र, गरिबासाठी महाप्रसाद खुला न करता पत्रिकाधारकांनाच महाप्रसाद दिला जातो.वर्षभर मंदिरात सेवा देणारे, अधिकारी, दानदाते व ओळखीतील व्यक्तींना महाप्रसादाचे निमंत्रण देण्यात येते. महाप्रसाद सार्वजनिक असल्यास नागरिक प्रचंड गर्दी करतात. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण राहत नाही. त्यामुळेच पत्रिका वाटप केल्या जातात. - रमेश गोडबोले, अध्यक्ष, एकवीरा देवी संस्थान. नऊ दिवस निरंकार उपवास करून अंबा व एकवीरा देवीच्या महाप्रसादासाठी गेलो होतो. मात्र, पत्रिका नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी आत जाऊ दिले नाही, ही काय माणुसकी आहे ? -नरेंद्र कापसे, भाविक.अंबादेवी व एकविरा देवी धार्मिक स्थळ आहे. देवीचे मंदिर सर्वांसाठी खुले असते. मग महाप्रसादासाठी पत्रिका देणे हे योग्य नाही.- शक्ती तिडके, भाविक. दसऱ्याला अंबादेवीचे मंदिर ११ वाजताच बंददसऱ्याच्या दिवशी अंबा व एकवीरेच्या मूर्ती पालखीतून सीमोल्लंघनासाठी नेल्या जातात. त्यावेळी हजारो अमरावतीकर पालखीचे दर्शन घेतात. त्यानंतर पुन्हा देवी मंदिरात आणल्या जाते. पहाटेपासून रात्री १२ वाजेपर्यंत अंबा-एकवीरा देवीचे मंदिर भाविकांसाठी खुले असते. मात्र, यंदा अंबादेवी मंदिराचे प्रवेशद्वार ११ वाजताच बंद केल्याने बाहेरगावावरून आलेल्या शेकडो भाविकांना निराश होऊन दर्शनाशिवायच परतावे लागले. यावरून अंबादेवीच्या विश्वस्तांचा मनमानी कारभार दिसून येतो.