शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

अंबा, एकवीरा देवीच्या महाप्रसादात भेदभाव का?

By admin | Updated: October 26, 2015 00:30 IST

विदर्भनगरीचे कुलदैवत अंबा-एकवीरेचा नवरात्रौत्सव नुकताच आटोपलाय. या अनुषंगाने रविवारी दोन्ही संस्थानांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

निमंत्रितांनाच प्रवेश : गोरगरीब, सामान्यांसह हजारो भाविक प्रसादापासून वंचितवैभव बाबरेकर  अमरावतीविदर्भनगरीचे कुलदैवत अंबा-एकवीरेचा नवरात्रौत्सव नुकताच आटोपलाय. या अनुषंगाने रविवारी दोन्ही संस्थानांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मात्र, निवडक निमंत्रितांनाच महाप्रसादाचा लाभ मिळाला. इतर शेकडो गोरगरीब भाविक मात्र या महाप्रसादापासून वंचित राहिले. वास्तविक निमंत्रणाद्वारे झडतात त्या जेवणावळी, महाप्रसाद नव्हे. याचा अंबा-एकवीरा देवी विश्वस्तांना विसर पडला की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरवर्षी नवरात्रौत्सवात अंबा-एकवीरेच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची अंबानगरीत गर्दी उसळते. नऊ दिवस शहर गजबजलेले असते. राज्यभरातून लाखो भाविक अंबा-एकवीरेच्या दर्शनासाठी येतात. संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी एकविरा देवी संस्थानाला ८० ते ९० लाखांच्या जवळपास दानाची रक्कम भक्तांकडून प्राप्त होते. मात्र, गरिबासाठी महाप्रसाद खुला न करता पत्रिकाधारकांनाच महाप्रसाद दिला जातो.वर्षभर मंदिरात सेवा देणारे, अधिकारी, दानदाते व ओळखीतील व्यक्तींना महाप्रसादाचे निमंत्रण देण्यात येते. महाप्रसाद सार्वजनिक असल्यास नागरिक प्रचंड गर्दी करतात. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण राहत नाही. त्यामुळेच पत्रिका वाटप केल्या जातात. - रमेश गोडबोले, अध्यक्ष, एकवीरा देवी संस्थान. नऊ दिवस निरंकार उपवास करून अंबा व एकवीरा देवीच्या महाप्रसादासाठी गेलो होतो. मात्र, पत्रिका नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी आत जाऊ दिले नाही, ही काय माणुसकी आहे ? -नरेंद्र कापसे, भाविक.अंबादेवी व एकविरा देवी धार्मिक स्थळ आहे. देवीचे मंदिर सर्वांसाठी खुले असते. मग महाप्रसादासाठी पत्रिका देणे हे योग्य नाही.- शक्ती तिडके, भाविक. दसऱ्याला अंबादेवीचे मंदिर ११ वाजताच बंददसऱ्याच्या दिवशी अंबा व एकवीरेच्या मूर्ती पालखीतून सीमोल्लंघनासाठी नेल्या जातात. त्यावेळी हजारो अमरावतीकर पालखीचे दर्शन घेतात. त्यानंतर पुन्हा देवी मंदिरात आणल्या जाते. पहाटेपासून रात्री १२ वाजेपर्यंत अंबा-एकवीरा देवीचे मंदिर भाविकांसाठी खुले असते. मात्र, यंदा अंबादेवी मंदिराचे प्रवेशद्वार ११ वाजताच बंद केल्याने बाहेरगावावरून आलेल्या शेकडो भाविकांना निराश होऊन दर्शनाशिवायच परतावे लागले. यावरून अंबादेवीच्या विश्वस्तांचा मनमानी कारभार दिसून येतो.