शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

अमरावतीत जिल्हा बॅकच भरणार शेतकऱ्यांचा पिकविमा; संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

By जितेंद्र दखने | Updated: June 20, 2024 20:06 IST

नवनिर्वाचित खासदारांना बँकेत मानाची खुर्ची

अमरावती: शासनाच्या एक रूपयात विमा योजनेतील बँकेच्या खातेदार सर्वच शेतकऱ्यांचा एक रूपया बँके मार्फत भरणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना केवळ कागदपत्रे जमा करावी लागणार आहे. हा निर्णय एकमताने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये अध्यक्ष आ.बच्चु कडू, उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी घेतला.यावेळी बँकेचे संचालक बळवंत वानखडे हे खासदार म्हणुन निवडून आल्याने त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करीत त्यांच्यासाठी बैठकीत गुरूवार २० जून रोजी बॅकेचे अध्यक्ष,उपाध्यक्षांनतर पहिल्या क्रमाकाची खुर्ची राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, हा निर्णय घेणारी अमरावती जिल्हा बँक ही राज्यात आयडॉल ठरल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. याशिवाय मागील बैठकीत झालेल्या ठराववावर विरोधकांनी आक्षेप घेतला असताना अध्यक्षांनी त्यांचे आक्षेप फेटाळत ठरावांना मंजुरात दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पंतप्रधान पीकविमा योजना सुरू केल्यानंतर या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांकडून नाममात्र एक रुपया रक्कम म्हणून घेतली जात होती. ही रक्कम अत्यल्प असली तरी संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव, प्रवासखर्च असा ३०० ते ४०० रुपयांचा खर्च येतो. शिवाय या प्रक्रियेसाठी लागणारा वेळसुद्धा वाया जात होतो. हीच अडचण लक्षात घेता जिल्हा बँकेने आता शेतकऱ्यांच्या बाजूची पीकविम्याची एक रुपयाची रक्कम भरण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने पारित केला. बैठकीत बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू, उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी हा ठराव मांडला. त्याला सर्वसंमतीने मंजूरी देण्यात आली. बैठकीला संचालक तथा माजी अध्यक्ष बबलू देशमुख, खासदार बळवंत वानखडे, प्रा. वीरेंद्र जगताप, हरिभाऊ मोहोड, नरेशचंद्र ठाकरे, प्रवीण काशीकर, सुधाकर भारसाकळे, प्रकाश काळबांडे, मोनिका मार्डीकर, बाळासाहेब अलोने, चित्रा डाहाणे, दयाराम काळे, सुरेश साबळे, अजय मेहकरे, श्रीकांत गावंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल उपस्थित होते.

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा