शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

विद्यापीठात सर्वपक्षीय धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:25 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या अनागोंदी कारभाराचा जाब विचारण्यासाठी .....

ठळक मुद्देपरीक्षा विभागाच्या अनागोंदीवर आक्षेप : ‘माइंड लॉजिक’ ‘ब्लॅकलिस्ट’ करा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या अनागोंदी कारभाराचा जाब विचारण्यासाठी भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी सोमवारी विद्यापीठात धडक दिली. परीक्षा संचालकांचे निलंबन तर माइंड लॉजिक एजन्सीला ‘ब्लॅक लिस्ट’ करण्याची मागणी करण्यात आली.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अन्यायग्रस्त विद्यार्थी कृती समितीच्या बॅनरखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना, रिपाइं या प्रमुख राजकीय पक्षाच्या विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाºयांनी कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांची भेट घेतली. त्यांच्या समक्ष समस्या, प्रश्न मांडताना विद्यार्थ्यांसह पदाधिकाºयांनी परीक्षा विभागाचे संचालक जयंत वडते यांना लक्ष्य केले.परीक्षा विभागात अनागोंदी सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप नगरसेवक प्रशांत डवरे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी केला.नाकारलेल्या एजन्सीला कंत्राटपरीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ कामकाजाची जबाबदारी माइंड लॉजिक एजन्सीकडे सोपविण्याबाबतही आक्षेप नोंदविण्यात आला. या एजन्सीमुळे अभियांत्रिकी पेपरच्या निकालात घोळ असल्याची कैफियत वैभव राऊत या विद्यार्थ्यांनी मांडली. पुनर्मुल्यांकनात एकाच पेपरमध्ये सर्वच विद्यार्थ्यांना १७ गुण कसे मिळाले. त्यामुळे खरेच पुनर्मूल्यांकन होत काय, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. परीक्षा विभागाचे संचालक वडते यांच्यावर कठोर कारवाई तर मार्इंड लॉजिक एजन्सीला ‘ब्लॅक लिस्ट’ करावे, अशी आग्रही मागणी रेटण्यात आली.दरम्यान मयुराताई देशमुख यांनी वसतिगृहात मुली असुरक्षित असल्याची बाब कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली. पीएचडी ‘पेट’ परीक्षेचा मुद्दाही मांडण्यात आला. युवासेनेचे राहुल माटोडे यांनी निकालाचा घोळ थांबला नाही तर वरिष्ठांच्या खुर्चीपर्यत धाव घेऊ, असा निर्वाणीचा इशारा दिला. यावेळी कुलगुरु मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरु राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख आदींनी विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी काँग्रेसचे प्रकाश साबळे, प्रशांत डवरे, राजा बांगळे, बबलू बोबडे, सागर देशमुख, नितीन ठाकरे, संजय मापले, मनसेचे संतोष बद्रे, शाम धाने, जिजाऊ ब्रिगेडच्या मयुराताई देशमुख, रणजित तिडके, अनिकेत ढेंगळे, संकेत कुलट, युवासेनेचे राहुल माटोडे, रितेश पांडव, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे ऋषिकेश वैद्य, आकाश हिवसे, युवा स्वाभिमानचे अभिजीत देशमुख, समीर देशमुख आदींनी विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडल्यात.विद्यापीठाने परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ कामाची जबाबदारी बंगळूरु येथील माइंड लॉजिक एजन्सीकडे सोपविली आहे. मात्र, याएजन्सीला गुजरात राज्यात नाकारले असताना अमरावती विद्यापीठाने कसे स्वीकारले, असा सवाल उपस्थित करण्यात आला. मुंबई, नागपूर विद्यापीठाने सुद्धा माइंड लॉजिकला हाकलून लावल्याची बाब मांडण्यात आली. कंत्राट प्रक्रियेत बरेच काही दडले असून चौकशी केल्यास बरेच तथ्य बाहेर येईल, असे कुलगुरु चांदेकर यांना सांगितले.- तर विद्यार्थ्यांच्या रक्ताक्षराने निवेदनविद्यापीठात परीक्षा विभागात गैरकारभार करणाºया दोषींवर कठोर कारवाईसह माइंड लॉजिक या एजन्सीला ब्लॅकलिस्ट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी २४ सप्टेंबरपर्यंत कुलगुरुंनी पूर्ण करावी, अन्यथा २५ सप्टेंबरला विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांचे रक्तदान शिबिर घेऊन कुलगुरुंना रक्ताक्षराने निवेदन सादर केले जाईल, असे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे, नगरसेवक प्रशांत डवरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.परीक्षा विभागाशी संबंधित समस्यांबाबत शिष्टमंडळासोबत चर्चा झाली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, ही काळजी घेत निर्णय होईल. माइंड लॉजिक एजन्सी नेमण्याचा प्रकार यापूर्वीच झाला आहे.-मुरलीधर चांदेकर, कुलगुरु, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.