शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

अप्पर वर्धाची सर्व दारे पुन्हा उघडली, धरण ९९.६४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 05:00 IST

मोर्शीजवळ असलेल्या अप्पर वर्धा धरण क्षेत्रामध्ये कमी पाऊस पडल्याने भर पावसाळ्यात या धरणात केवळ ७८ टक्के पाण्याचा साठा झाला होता. शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नळ-दमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा धरणाची पाणी साठवण्याची मर्यादा ३४२.५० एवढी आहे. २३ सप्टेंबर रोजी या धरणामध्ये ३४२.४८ मीटर पाणीसाठा झाला आहे. पहिल्यांदाच ११ सप्टेंबर रोजी पाच दारे ५० सेंटिमीटरने उघडण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गणल्या जाणाऱ्या अप्पर वर्धा धरणात २३ सप्टेंबर रोजी ९९.६४ टक्के जलसाठा झाला. त्यामुळे सर्व १३ दारे ५० सेंटिमीटरने उघडण्यात आली आहेत. त्यामधून १०५३ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात होत आहे. या तेराही दरवाजातून वाहणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्य बघण्यासाठी पर्यटकांनी पुन्हा मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मोर्शीजवळ असलेल्या अप्पर वर्धा धरण क्षेत्रामध्ये कमी पाऊस पडल्याने भर पावसाळ्यात या धरणात केवळ ७८ टक्के पाण्याचा साठा झाला होता. शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नळ-दमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा धरणाची पाणी साठवण्याची मर्यादा ३४२.५० एवढी आहे. २३ सप्टेंबर रोजी या धरणामध्ये ३४२.४८ मीटर पाणीसाठा झाला आहे. पहिल्यांदाच ११ सप्टेंबर रोजी पाच दारे ५० सेंटिमीटरने उघडण्यात आली होती. परंतु, धरणात पाण्याचा येवा वाढत असल्याचे पाहून त्याच दिवशी रात्री ११ वाजता धरणाची १३ दरवाजे उघडण्यात आली होती. गुरुवारी सकाळपर्यंत सहा दरवाजे उघडी ठेवण्यात आली होती. मात्र, मध्य प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने आवक वाढत गेली. सध्या अप्पर वर्धा धरणाची निर्धारित लेव्हल व धरण १०० टक्के पूर्णत्वास जात असल्याचे पाहून तेराही दारे उघडून मोठ्या प्रमाणात विसर्ग वर्धा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तेराही गेटमधून सोडण्यात येणारे पाण्याचे विहंगम दृश्य बघण्यासाठी व पाण्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पर्यटक कुटुंबकबिल्यासह धरणातून उडणारे तुषार अंगावर झेलण्यासाठी येत आहेत. दरम्यान, अप्पर वर्धा धरणाच्या पुलावरून एक युवक काही दिवसांपूर्वी  नदीपात्रात वाहून गेला होता. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी अप्पर वर्धा धरण परिसरात मोर्शी पोलीस ठाण्याच्यावतीने बॅरिकेड लावण्यात आले आहेत.धरणाचे अधिकारी व बीट अंमलदार राहुल वानखडे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. 

टॅग्स :dam tourismधरण पर्यटनDamधरण