शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
4
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
5
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
6
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
7
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
8
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
9
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
10
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
11
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
12
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
13
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
14
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
15
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
16
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
17
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
18
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
19
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
20
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले

सर्वच शेतकरी होणार सोसायटीचे सभासद

By admin | Updated: October 6, 2016 00:32 IST

जिल्ह्यातील सर्वच ७/१२ धारक शेतकऱ्यांना कर्जासह विविध योजनांचा लाभ व्हावा,

अभियान राबविणार : सर्व शेतकऱ्यांना होणार कर्जाचा लाभअमरावती : जिल्ह्यातील सर्वच ७/१२ धारक शेतकऱ्यांना कर्जासह विविध योजनांचा लाभ व्हावा, यासाठी सेवा सहकारी सोसायटींचे सभासद केल्या जाणार आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारा यासाठी अभियान राबविल्या जाणार आहे. यासाठी तालुकास्तरावरील चमू शेतकऱ्यांशी संपर्क करणार आहे.प्रत्येक शेतकऱ्याला कर्जासह सोसायटींच्या मध्यभागातून विविध सुविधांचा लाभ मिळावा व या माध्यमातून शेतकरी आर्थिक संपन्न व्हावा, यासाठी शासनाने सहकार विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी हा गावातील सेवा सहकारी सोसायटीचा सभासद व्हावा, यासाठी हे अभियान सुरू केले आहे. जिल्ह्यात ६२३ सोसायटी आहेत. या सोसायटीचे सभासद होण्यासाठी काही अटी आहेत. अनेक सातबाराधारक शेतकरी सोसायटीचे सभासद झालेले नाहीत. त्यामुळे सोसायटीच्या निवडणूक त्यांना सहभागी होता येत नाही. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळत नाही. तसेच जिल्हा बँकेद्वारा कर्ज मिळत नाही, अशा अनेक सुविधांपासून शेतकरी वंचित राहतात. शेतकऱ्यांना या सर्व सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांच्या मार्गदर्शनात ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. यामुळे तालुकास्तर पथक करून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येत आहे. यामध्ये शासनाचे या महत्वाकांक्षी उपक्रमाविषयी गावस्तरावर सभा घेणे, भित्तीपत्रकांद्वारे व गावस्तरावर दवंडी देऊन जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांनी दिल्या आहेत.एखाद्या सेवा सहकारी सोसायटीने शेतकऱ्याला सभासद पद देण्याचे नाकारल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २३ नुसार सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे सभासदपद मिळण्याबाबत अपिलाची तरतूद यामध्ये आहे, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सांगितले. शासनाचे सहकार विषयक या महत्वपूर्ण धोरणामुळे सहकार क्षेत्रात गत अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या प्रस्तापितांना या निर्णयाचा जोरदार फटका बसणार आहे. तर सर्वसामान्य शेतकरी देखील आता सेवा सहकारी सोसायटींचे भागदारक व सभासद होणार असल्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत.जिल्ह्यात २१ हजार शेतकरी सभासद होणे बाकीजिल्ह्यात एकूण ६२३ शेतकरी सहकारी सोसायटी आहेत व जिल्ह्यात ४ लाख १६ हजार शेतकरी आहे. या सोसायट्यांचे ३ लाख ९४ हजार शेतकरी सभासद आहेत. अद्याप २१ हजार सभासद होणे बाकी आहेत. यासाठी जिल्हा उपनिबंधकाच्या अ‍ॅक्शन प्लॅनद्वारे शेतकऱ्यांना सभासद केल्या जाणार आहे.फक्त एवढे करणे गरजेचेसभासद होण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे. अर्जदार व्यक्ती १८ वर्षांपेक्षा जास्त वयाची हवी. तो संस्थेच्या कार्यक्षेत्रामधला रहिवासी असावा व त्यांच्याकडे किमान १० हजार क्षेत्र जमीन धारणा असावी. याविषयीचा सातबारा हा पुरावा त्याने अर्जासोबत जोडावा तसेच पोट नियमाप्रमाणे १०० रुपये शुल्क व १०० रुपयांचा एक भाग संस्थेकडे जमा करणे आवश्यक असल्याचे नियमावली आहे.जिल्ह्यात अजून २१ हजार शेतकरी सभासद होणे बाकी आहे. त्यांनी सभासद व्हावे यासाठी प्रत्येक गावात जनजागृती केल्या जात आहे. सहकार विभागाचा हा स्पेशल ड्राईव्ह आहे. - गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक