शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

सर्वच शेतकऱ्यांना मताधिकार !

By admin | Updated: January 29, 2017 00:20 IST

बहुतांश बाजार समितीवर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसचे वर्चस्व असल्याने भाजपचाही यामध्ये प्रवेश व्हावा,

बाजार समिती : यार्डात किमान ३ वर्षे मालविक्री हवी अमरावती : बहुतांश बाजार समितीवर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसचे वर्चस्व असल्याने भाजपचाही यामध्ये प्रवेश व्हावा, यासाठी शासनाचे नियोजन असल्याची माहिती सहकारसूत्रांनी दिली. बाजार समितीमध्ये किमान तीन वर्षे ज्या शेतकऱ्यांनी मालाची विक्री केली त्या शेतकऱ्यांना मताधिकार मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील सहकारक्षेत्रात कॉँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने भक्कम पायाभरणी केली आहे. बहुतांश बाजार समितीवर त्यांचेच वर्चस्व आहे. मागीलवर्षी शासनाने बाजार समितीच्या आर्थिक उलाढालीच्या निकषावर तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्ती केल्यात. प्रत्येक बाजार समितीमध्ये दोन ते तीन तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आली. यानिमित्ताने सहकारात चंचूप्रवेश करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानण्यात येत आहे. किंबहुना शेतकरी संघटनांकडूनही बाजार समितीत शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व असावे, असा आग्रह होत आहे. शेतमालाचे व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी शेतकऱ्यांना मताधिकार असावा, यासाठी शासनाचा खल सुरु आहे. ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये किमान तीन वर्षे व्यवहार केलेत, त्यांना मताधिकार देण्याची मागणी समोर आली आहे. सहकारात चंचूप्रवेश? ४गावपातळीवर सहकाराचा पाया असणाऱ्या सेवा सहकारी संस्थांमध्ये शेतकरी हा सभासद असावा, यासाठी शासनाने सहकार विभागाच्या माध्यमातून विशेष ड्राईव्ह करुन सर्व शेतकऱ्यांना सोसायटींचे सभासद केले आहे. त्यांना मताधिकार देऊन सहकारात चंचूप्रवेश करण्याचा हा प्रकार मानण्यात येतो. मर्यादित मतांवर होते सहकाराची निवडणूक ४बाजार समितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकांना मताधिकार आहे. तसेच हमाल, व्यापारी आदी गटांचे देखील प्रतिनिधी असतात.मात्र, यासर्व प्रक्रियेमध्ये शेतकरी मात्र कुठेच नसल्यामुळे त्याचा सहभाग वाढवूून प्रतिनिधित्व देण्यात येणार असल्याची माहिती आहे. सहकार ही शेतकऱ्यांची चळवळ आहे. मात्र, यामध्ये राजकारण शिरुन शेतकरी मात्र बाहेरच राहिला आहे. बाजार समितीत थेट शेतकऱ्यांचा संबंध असताना त्याचा सहभाग नाममात्र असल्याने शासनाच्या या नव्या धोरणाचे स्वागत आहे. - रविंद्र देशमुख, शेतकरी