शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच शेतकऱ्यांना मताधिकार !

By admin | Updated: January 29, 2017 00:20 IST

बहुतांश बाजार समितीवर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसचे वर्चस्व असल्याने भाजपचाही यामध्ये प्रवेश व्हावा,

बाजार समिती : यार्डात किमान ३ वर्षे मालविक्री हवी अमरावती : बहुतांश बाजार समितीवर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसचे वर्चस्व असल्याने भाजपचाही यामध्ये प्रवेश व्हावा, यासाठी शासनाचे नियोजन असल्याची माहिती सहकारसूत्रांनी दिली. बाजार समितीमध्ये किमान तीन वर्षे ज्या शेतकऱ्यांनी मालाची विक्री केली त्या शेतकऱ्यांना मताधिकार मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील सहकारक्षेत्रात कॉँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने भक्कम पायाभरणी केली आहे. बहुतांश बाजार समितीवर त्यांचेच वर्चस्व आहे. मागीलवर्षी शासनाने बाजार समितीच्या आर्थिक उलाढालीच्या निकषावर तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्ती केल्यात. प्रत्येक बाजार समितीमध्ये दोन ते तीन तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आली. यानिमित्ताने सहकारात चंचूप्रवेश करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानण्यात येत आहे. किंबहुना शेतकरी संघटनांकडूनही बाजार समितीत शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व असावे, असा आग्रह होत आहे. शेतमालाचे व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी शेतकऱ्यांना मताधिकार असावा, यासाठी शासनाचा खल सुरु आहे. ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये किमान तीन वर्षे व्यवहार केलेत, त्यांना मताधिकार देण्याची मागणी समोर आली आहे. सहकारात चंचूप्रवेश? ४गावपातळीवर सहकाराचा पाया असणाऱ्या सेवा सहकारी संस्थांमध्ये शेतकरी हा सभासद असावा, यासाठी शासनाने सहकार विभागाच्या माध्यमातून विशेष ड्राईव्ह करुन सर्व शेतकऱ्यांना सोसायटींचे सभासद केले आहे. त्यांना मताधिकार देऊन सहकारात चंचूप्रवेश करण्याचा हा प्रकार मानण्यात येतो. मर्यादित मतांवर होते सहकाराची निवडणूक ४बाजार समितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकांना मताधिकार आहे. तसेच हमाल, व्यापारी आदी गटांचे देखील प्रतिनिधी असतात.मात्र, यासर्व प्रक्रियेमध्ये शेतकरी मात्र कुठेच नसल्यामुळे त्याचा सहभाग वाढवूून प्रतिनिधित्व देण्यात येणार असल्याची माहिती आहे. सहकार ही शेतकऱ्यांची चळवळ आहे. मात्र, यामध्ये राजकारण शिरुन शेतकरी मात्र बाहेरच राहिला आहे. बाजार समितीत थेट शेतकऱ्यांचा संबंध असताना त्याचा सहभाग नाममात्र असल्याने शासनाच्या या नव्या धोरणाचे स्वागत आहे. - रविंद्र देशमुख, शेतकरी