शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
3
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
4
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
5
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
6
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
7
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
8
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
9
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
10
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
11
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
12
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
13
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
14
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
15
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
16
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
17
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
18
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
19
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
20
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!

मुलाचा डीएनए जुळला अन् आईचा मारेकरी गवसला!

By प्रदीप भाकरे | Updated: January 3, 2023 18:37 IST

अकोटच्या महिलेची मेळघाटच्या जंगलात हत्या; आरोपीला अटक

चिखलदरा (अमरावती) : गतवर्षीच्या फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा खून झाल्याचा खळबळजनक उलगडा डीएनए अहवालावरून झाला आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री एकाविरूध्द खून व खुनाचा पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. चिखलदरा पोलिसांनी ४ एप्रिल २०२२ रोजी खटकाली जंगलातून जप्त केलेली मानवी हाडे व बेपत्ता महिलेचा मुलाचा डीएनए जुळल्याने या खुनाची उकल झाली. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वात हा उलगडा करण्यात आला.

भारती विष्णू नागोर (४२, रा. अकोली जहांगिर, ता. अकोट, जि. अकोला) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी विष्णू धर्मे (३६, अकोली जहागीर, ता. अकोट) याला अटक करण्यात आली. त्याला ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या खटकाली परिसरात जंगलात वन कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना मानवी हाडे सापडली होती. सबब, पोलीस आणि वन विभागाने त्यावेळी सहा किलोमीटर जंगल पिंजून काढले. त्यात कवटी उर्वरित हाडे सापडली. त्याबाबत ९ एप्रिल २०२२ रोजी चिखलदरा पोलिसांनी मर्ग दाखल केला.

असा झाला उलगडा

दरम्यान, त्या अनुषंगाने बेपत्ता इसमांची माहिती घेतली असता, १७ फेब्रुवारी २०२२ पासून भारती विष्णू नागोरे ही बेपत्ता असल्याची फिर्याद अकोट पोलीस स्टेशनमध्ये नोेंदविली गेल्याचे समोर आले. त्यावरून चिखलदरा पोलिसांनी खटकाली जंगलातून जप्त केलेली मानवी कवटी व भारती हिचा मुलगा परशुराम यांचे डीएनए नमुुने चाचणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल डिसेंबर २०२२ मध्ये प्राप्त झाला. ती मानवी कवटी व परशुरामचा डीएनए जुळून आला.

सहा किलोमीटर जंगल पिंजून काढले

अकोट वन्यजीव विभागाच्या खटकाली परिसरात वन कर्मचारी गस्तीवर असताना ४ एप्रिल २०२२ रोजी त्यांना मानवी कवटी, हाडे, कपडे सापडले. याची माहिती चिखलदरा पोलिसांना देण्यात आली. ४० ते ५० संख्येत असलेल्या वन व पोलीस अधिकाऱ्यांनी जंगल पिंजून काढले होते. पाच ते सहा किलोमीटर परिसरात एक एक अवयव हाडे सापडत गेली होती.

नेमके काय आहे प्रकरण

भारतीच्या नातेवाईक व मुलाला पोलिसांनी विचारपूस केली. त्यावरून भारती नागोरे व गावातील अमोल धर्मे यांचे अनेक वर्षापासून फोनवर बोलणे व संबंध होते. त्यांच्यात काही दिवसांपुर्वी काही कारणास्तव वाद झाला. नंतर देखील त्यांचे बोलणे आणि संभाषण सुरू होते. भारती ही अमोल धर्मे याला लग्न करण्यासाठी बोलत होती. अमोल धर्मे यानेच तिचा खून करून तिचे प्रेत जंगलामध्ये टाकले असल्याची फिर्याद तिच्या मुलाने नोंदविली.

डीएनएवरून महिलेची ओळख पटली. फिर्यादीवरून खून व पुराव नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आरोपीला ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

- राहुल वाढवे ठाणेदार चिखलदरा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती