शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:30 IST

तालुक्यातील हजारो शेतकºयांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा ऐन आलिताच्या काळात महावितरणने खंडित केला.

ठळक मुद्देशेतकºयांचा आंदोलनाचा पवित्रा : थकबाकी वसुलीसाठी महावितरणची ‘अभिनव योजना’

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : तालुक्यातील हजारो शेतकºयांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा ऐन आलिताच्या काळात महावितरणने खंडित केला. यामुळे शेतकºयांसमोर ओलिताचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी आंदोलन करण्याची तयारी शेतकºयांनी चालविली आहे.रबी हंगामासाठी पेरणीची लगबग असताना शेतात सिंचन करावे तरी कसे, असा प्रश्न शेतकºयांनासमोर ठाकला आहे. पाण्याअभावी चना, गव्हाची पेरणी रखडली आहे. वरुड तालुक्यात बागायती क्षेत्र ३५ हजार हेक्टरपेक्षा अधिक असून संत्रा हे मुख्य पीक आहे. २१ हजार ५०० हेक्टर जमिनीमध्ये संत्राचे पीक घेतले जाते. रबी पिकामध्ये चना, गव्हाचे मोठे उत्पादनक्षेत्र आहे. नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये गहू, चनाची पेरणी होते. कपाशी, मिरची, तूरसह आदी पालेभाज्या पिकांचेही उत्पादन घेतले जाते. शेतकºयांना सरकारने २४ तास वीज पुरवठ्याचे गाजर दाखवून दिशाभूल केली. केवळ आठ तास वीजपुरवठा मिळतो. यातही तीन-तीन दिवसाचे भाग करून दिवसा व रात्री भारनियमन करण्यात येत आहे.तांत्रिक बिघाडही कारणीभूतअनेकवेळा तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा होत नाही. यामुळे कृषिपंप आठ दिवसांपेक्षा अधिक काळ बंद असतो. यासंदर्भात तक्रार केल्यावर त्याची दखल घेतली जात नाही. वारंवार तक्रारी केल्यांनतर दुरुस्ती करताच बिलाची मागणी केली जाते. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बहुधा बिघाड आलेल्या ठिकाणी शेतकरी पुढाकार घेऊन स्वत:च दुरु स्ती करीत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.पेरणी, मळणी, सिंचन रखडलेतालुक्यात आॅक्टोबर ते जूनपर्यंत ओलिताचा हंगाम असतो. रबी पिकांसह वांगी, पालेभाज्या, लसूण, कांद्याचे रोपण केले जाते. शेतात पडून असलेल्या ज्वारी, सोयाबीनची मळणी केली जाते. वीजच नसल्याने ही सारी कामे रखडली आहेत. यावर्षी पावसाअभावी संत्राबागा गजविणे कठीण झाले आहे. थेट ट्रान्सफॉर्मरवरून वीजपुरवठा होत असल्याने सर्वच शेतकरी वेठीस धरले जात आहेत.विदर्भाची वीज विदर्भालाच द्याशेतकºयांना २४ तास वीजपुरवठा, कर्जमाफी, कृषी अनुदानासारखे विषय हे राजकीय नसून शेतकºयांच्या हिताचे आहेत. विदर्भातील वीज विदर्भातील शेतकºयांनाच द्यावी, तालुक्यात सक्तीने वीज देयकांची वसुली करण्याकरिता खंडित केलेला शेतकºयांच्या कृषिपंपांचा वीज पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा, अन्यथा तालुक्यापासून तीव्र आंदोलन करणार असल्याचे शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष सुबोध मोहिते यांनी सांगितले.