शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:30 IST

तालुक्यातील हजारो शेतकºयांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा ऐन आलिताच्या काळात महावितरणने खंडित केला.

ठळक मुद्देशेतकºयांचा आंदोलनाचा पवित्रा : थकबाकी वसुलीसाठी महावितरणची ‘अभिनव योजना’

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : तालुक्यातील हजारो शेतकºयांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा ऐन आलिताच्या काळात महावितरणने खंडित केला. यामुळे शेतकºयांसमोर ओलिताचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी आंदोलन करण्याची तयारी शेतकºयांनी चालविली आहे.रबी हंगामासाठी पेरणीची लगबग असताना शेतात सिंचन करावे तरी कसे, असा प्रश्न शेतकºयांनासमोर ठाकला आहे. पाण्याअभावी चना, गव्हाची पेरणी रखडली आहे. वरुड तालुक्यात बागायती क्षेत्र ३५ हजार हेक्टरपेक्षा अधिक असून संत्रा हे मुख्य पीक आहे. २१ हजार ५०० हेक्टर जमिनीमध्ये संत्राचे पीक घेतले जाते. रबी पिकामध्ये चना, गव्हाचे मोठे उत्पादनक्षेत्र आहे. नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये गहू, चनाची पेरणी होते. कपाशी, मिरची, तूरसह आदी पालेभाज्या पिकांचेही उत्पादन घेतले जाते. शेतकºयांना सरकारने २४ तास वीज पुरवठ्याचे गाजर दाखवून दिशाभूल केली. केवळ आठ तास वीजपुरवठा मिळतो. यातही तीन-तीन दिवसाचे भाग करून दिवसा व रात्री भारनियमन करण्यात येत आहे.तांत्रिक बिघाडही कारणीभूतअनेकवेळा तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा होत नाही. यामुळे कृषिपंप आठ दिवसांपेक्षा अधिक काळ बंद असतो. यासंदर्भात तक्रार केल्यावर त्याची दखल घेतली जात नाही. वारंवार तक्रारी केल्यांनतर दुरुस्ती करताच बिलाची मागणी केली जाते. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बहुधा बिघाड आलेल्या ठिकाणी शेतकरी पुढाकार घेऊन स्वत:च दुरु स्ती करीत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.पेरणी, मळणी, सिंचन रखडलेतालुक्यात आॅक्टोबर ते जूनपर्यंत ओलिताचा हंगाम असतो. रबी पिकांसह वांगी, पालेभाज्या, लसूण, कांद्याचे रोपण केले जाते. शेतात पडून असलेल्या ज्वारी, सोयाबीनची मळणी केली जाते. वीजच नसल्याने ही सारी कामे रखडली आहेत. यावर्षी पावसाअभावी संत्राबागा गजविणे कठीण झाले आहे. थेट ट्रान्सफॉर्मरवरून वीजपुरवठा होत असल्याने सर्वच शेतकरी वेठीस धरले जात आहेत.विदर्भाची वीज विदर्भालाच द्याशेतकºयांना २४ तास वीजपुरवठा, कर्जमाफी, कृषी अनुदानासारखे विषय हे राजकीय नसून शेतकºयांच्या हिताचे आहेत. विदर्भातील वीज विदर्भातील शेतकºयांनाच द्यावी, तालुक्यात सक्तीने वीज देयकांची वसुली करण्याकरिता खंडित केलेला शेतकºयांच्या कृषिपंपांचा वीज पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा, अन्यथा तालुक्यापासून तीव्र आंदोलन करणार असल्याचे शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष सुबोध मोहिते यांनी सांगितले.