शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:30 IST

तालुक्यातील हजारो शेतकºयांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा ऐन आलिताच्या काळात महावितरणने खंडित केला.

ठळक मुद्देशेतकºयांचा आंदोलनाचा पवित्रा : थकबाकी वसुलीसाठी महावितरणची ‘अभिनव योजना’

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : तालुक्यातील हजारो शेतकºयांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा ऐन आलिताच्या काळात महावितरणने खंडित केला. यामुळे शेतकºयांसमोर ओलिताचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी आंदोलन करण्याची तयारी शेतकºयांनी चालविली आहे.रबी हंगामासाठी पेरणीची लगबग असताना शेतात सिंचन करावे तरी कसे, असा प्रश्न शेतकºयांनासमोर ठाकला आहे. पाण्याअभावी चना, गव्हाची पेरणी रखडली आहे. वरुड तालुक्यात बागायती क्षेत्र ३५ हजार हेक्टरपेक्षा अधिक असून संत्रा हे मुख्य पीक आहे. २१ हजार ५०० हेक्टर जमिनीमध्ये संत्राचे पीक घेतले जाते. रबी पिकामध्ये चना, गव्हाचे मोठे उत्पादनक्षेत्र आहे. नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये गहू, चनाची पेरणी होते. कपाशी, मिरची, तूरसह आदी पालेभाज्या पिकांचेही उत्पादन घेतले जाते. शेतकºयांना सरकारने २४ तास वीज पुरवठ्याचे गाजर दाखवून दिशाभूल केली. केवळ आठ तास वीजपुरवठा मिळतो. यातही तीन-तीन दिवसाचे भाग करून दिवसा व रात्री भारनियमन करण्यात येत आहे.तांत्रिक बिघाडही कारणीभूतअनेकवेळा तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा होत नाही. यामुळे कृषिपंप आठ दिवसांपेक्षा अधिक काळ बंद असतो. यासंदर्भात तक्रार केल्यावर त्याची दखल घेतली जात नाही. वारंवार तक्रारी केल्यांनतर दुरुस्ती करताच बिलाची मागणी केली जाते. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बहुधा बिघाड आलेल्या ठिकाणी शेतकरी पुढाकार घेऊन स्वत:च दुरु स्ती करीत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.पेरणी, मळणी, सिंचन रखडलेतालुक्यात आॅक्टोबर ते जूनपर्यंत ओलिताचा हंगाम असतो. रबी पिकांसह वांगी, पालेभाज्या, लसूण, कांद्याचे रोपण केले जाते. शेतात पडून असलेल्या ज्वारी, सोयाबीनची मळणी केली जाते. वीजच नसल्याने ही सारी कामे रखडली आहेत. यावर्षी पावसाअभावी संत्राबागा गजविणे कठीण झाले आहे. थेट ट्रान्सफॉर्मरवरून वीजपुरवठा होत असल्याने सर्वच शेतकरी वेठीस धरले जात आहेत.विदर्भाची वीज विदर्भालाच द्याशेतकºयांना २४ तास वीजपुरवठा, कर्जमाफी, कृषी अनुदानासारखे विषय हे राजकीय नसून शेतकºयांच्या हिताचे आहेत. विदर्भातील वीज विदर्भातील शेतकºयांनाच द्यावी, तालुक्यात सक्तीने वीज देयकांची वसुली करण्याकरिता खंडित केलेला शेतकºयांच्या कृषिपंपांचा वीज पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा, अन्यथा तालुक्यापासून तीव्र आंदोलन करणार असल्याचे शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष सुबोध मोहिते यांनी सांगितले.