शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:30 IST

तालुक्यातील हजारो शेतकºयांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा ऐन आलिताच्या काळात महावितरणने खंडित केला.

ठळक मुद्देशेतकºयांचा आंदोलनाचा पवित्रा : थकबाकी वसुलीसाठी महावितरणची ‘अभिनव योजना’

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : तालुक्यातील हजारो शेतकºयांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा ऐन आलिताच्या काळात महावितरणने खंडित केला. यामुळे शेतकºयांसमोर ओलिताचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी आंदोलन करण्याची तयारी शेतकºयांनी चालविली आहे.रबी हंगामासाठी पेरणीची लगबग असताना शेतात सिंचन करावे तरी कसे, असा प्रश्न शेतकºयांनासमोर ठाकला आहे. पाण्याअभावी चना, गव्हाची पेरणी रखडली आहे. वरुड तालुक्यात बागायती क्षेत्र ३५ हजार हेक्टरपेक्षा अधिक असून संत्रा हे मुख्य पीक आहे. २१ हजार ५०० हेक्टर जमिनीमध्ये संत्राचे पीक घेतले जाते. रबी पिकामध्ये चना, गव्हाचे मोठे उत्पादनक्षेत्र आहे. नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये गहू, चनाची पेरणी होते. कपाशी, मिरची, तूरसह आदी पालेभाज्या पिकांचेही उत्पादन घेतले जाते. शेतकºयांना सरकारने २४ तास वीज पुरवठ्याचे गाजर दाखवून दिशाभूल केली. केवळ आठ तास वीजपुरवठा मिळतो. यातही तीन-तीन दिवसाचे भाग करून दिवसा व रात्री भारनियमन करण्यात येत आहे.तांत्रिक बिघाडही कारणीभूतअनेकवेळा तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा होत नाही. यामुळे कृषिपंप आठ दिवसांपेक्षा अधिक काळ बंद असतो. यासंदर्भात तक्रार केल्यावर त्याची दखल घेतली जात नाही. वारंवार तक्रारी केल्यांनतर दुरुस्ती करताच बिलाची मागणी केली जाते. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बहुधा बिघाड आलेल्या ठिकाणी शेतकरी पुढाकार घेऊन स्वत:च दुरु स्ती करीत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.पेरणी, मळणी, सिंचन रखडलेतालुक्यात आॅक्टोबर ते जूनपर्यंत ओलिताचा हंगाम असतो. रबी पिकांसह वांगी, पालेभाज्या, लसूण, कांद्याचे रोपण केले जाते. शेतात पडून असलेल्या ज्वारी, सोयाबीनची मळणी केली जाते. वीजच नसल्याने ही सारी कामे रखडली आहेत. यावर्षी पावसाअभावी संत्राबागा गजविणे कठीण झाले आहे. थेट ट्रान्सफॉर्मरवरून वीजपुरवठा होत असल्याने सर्वच शेतकरी वेठीस धरले जात आहेत.विदर्भाची वीज विदर्भालाच द्याशेतकºयांना २४ तास वीजपुरवठा, कर्जमाफी, कृषी अनुदानासारखे विषय हे राजकीय नसून शेतकºयांच्या हिताचे आहेत. विदर्भातील वीज विदर्भातील शेतकºयांनाच द्यावी, तालुक्यात सक्तीने वीज देयकांची वसुली करण्याकरिता खंडित केलेला शेतकºयांच्या कृषिपंपांचा वीज पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा, अन्यथा तालुक्यापासून तीव्र आंदोलन करणार असल्याचे शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष सुबोध मोहिते यांनी सांगितले.