शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

कृषी उत्पन्न बाजार समिती रामभरोसे

By admin | Updated: January 23, 2016 00:35 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध धान्याची आवक वाढली आहे. परंतु ढगाळी वातावरणात शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर ठेवण्यात आले आहे.

कोट्यवधींचे धान्य उघड्यावर : शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल, अशुद्ध पाणीपुरवठा मनीष कहाते अमरावतीयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध धान्याची आवक वाढली आहे. परंतु ढगाळी वातावरणात शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर ठेवण्यात आले आहे. मात्र व्यापाऱ्यांनी शेडमध्ये धान्य ठेवल्याने शेतकऱ्यांच्या धान्याचे पावसामुळे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.विलासनगर स्थित कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल साठवणूक आणि हर्रास करण्याकरिता ७० हजार स्के. फुटाचे दोन शेड आहे. एक ५००० स्के. फुटांचा अशा तीन शेड शेतकऱ्यांच्या मालाऐवजी व्यापाऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा तूर, सोयाबीन, उडीद, ज्वारी, हरभरा इत्यादी धान्य उघड्यावर पडून आहे. अवकाळी पाऊस आल्यास संपूर्ण धान्य ओले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र बाजार समितीत आहे. दररोज चार कोटी रुपयांची उलाढाल होत असलेल्या बाजार समितीत ४०० दलालसह १५० व्यापारी आहेत. वर्षाला बाजार समितीला कोट्यवधींचा नफा शेतकऱ्यांच्या माध्यमातून अप्र्रत्यक्षपणे बाजार समितीला होता. परंतु त्याप्रमाणात बाजार समितीने शेतकऱ्यांना कोणत्याही सुविधा निर्माण करण्यात आल्या नाहीत. टीएमसी शेडजवळ शेतकऱ्यांसाठी पाणी पिण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे शेतकरी जवळच्या हॉटेलमध्ये पाणी पिण्यासाठी जातात. शिदोरीही तिथेच खातात. बाजार समितीचा २२ एकरांचा परिसर आहे. जिकडे- तिडके घाणच घाण आहे. परिसरात तीन धान्य साठवणुकीचे शेड, दलालांचे शेकडो दुकाने आहेत. प्रत्येक दलाल आपआपल्या दुकानांसमोर शेतकऱ्यांचा माल हर्रास करतात. मात्र शेडमध्ये व्यापाऱ्यांचे धान्याचे सुमारे ६० हजार पोते पडून आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रोज ४० हजार विविध धान्याचे पोत्याचे आवक सुरू आहे. परंतु ढगाळी वातावरण असतानाही माल उघडण्यावर आहे.