शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

भाऊसाहेबांच्या जन्मगावी लवकरच कृषी महाविद्यालय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 05:00 IST

राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, मी महाविद्यालयात असताना कृषी आणि शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेबांनी केलेले कार्य ऐकले होते. आज श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात आल्यानंतर  अनुभवले. पंतप्रधान नेहरूंच्या काळात देश प्रगतीकडे वाटचाल करीत होता. देशात नव्या उद्योगक्रांतीचे धोरण आखले जात होते, त्यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कृषिमंत्री म्हणून कृषिक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविला आणि शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तनासाठी पुरेपूर प्रयत्न केले. भाऊसाहेब हे शिक्षण व कृषिमहर्षी आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथे लवकरच कृषी महाविद्यालय स्थापन होणार असल्याचे संकेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी येथे दिले. श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारे संचलित श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी राज्यपाल बोलत होते. समारंभाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख होते. विशेष अतिथी म्हणून महापौर चेतन गावंडे, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके यांच्यासह संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, सचिव शेषराव खाडे, प्राचार्य नंदकिशोर चिखले आदी उपस्थित होते. राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, मी महाविद्यालयात असताना कृषी आणि शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेबांनी केलेले कार्य ऐकले होते. आज श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात आल्यानंतर  अनुभवले. पंतप्रधान नेहरूंच्या काळात देश प्रगतीकडे वाटचाल करीत होता. देशात नव्या उद्योगक्रांतीचे धोरण आखले जात होते, त्यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कृषिमंत्री म्हणून कृषिक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविला आणि शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तनासाठी पुरेपूर प्रयत्न केले. भाऊसाहेब हे शिक्षण व कृषिमहर्षी आहेत. त्यामुळे त्यांच्या जन्मगावी पापळ येथे कृषी महाविद्यालयाची निर्मिती व्हावी, असा प्रस्ताव श्री शिवाजी शिक्षण संस्थेने देताच त्या अनुषंगाने कृषिमंत्री दादाजी भुसे, कृषी विभागाचे सचिव, कृषी आयुक्त, आदींची यासंदर्भात बैठक घेतली. आतापर्यंत राज्यात स्थापन झालेल्या कृषी महाविद्यालयांची संख्या, माहिती जाणून घेतली. भाऊसाहेबांच्या जन्मगावी कृषी महाविद्यालय स्थापन व्हावे, यासाठी स्वत: पुढाकार घेणार असल्याचे राज्यपाल कोश्यारी म्हणाले. दरम्यान, महापौर चेतन गावंडे, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके यांनीसुद्धा संबोधित केले. दर्यापूर येथील जे.डी. सांगळूदकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समारंभात स्वागतगीत गायिले. संचालन किशोर फुले व आभार प्रदर्शन दिलीप इंगाले  यांनी केले. 

भाऊसाहेबांच्या जन्मगावी भेटराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथे भेट दिली. यावेळी त्यांनी भाऊसाहेबांचे जन्मस्थळ असलेल्या वाड्याची पाहणी केली. कुटुंबातील सदस्य रजनी भीमराव देशमुख, कुसुमताई देशमुख, महेंद्र देशमुख, अनुप्रीता देशमुख, विद्यानंद देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपालांनी भाऊसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. पापळ येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेला भेट दिली व नियोजित कृषी महाविद्यालयाच्या जागेची पाहणी केली. यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आ. प्रताप अडसड, जिल्हाधिकारी पवनीत कौर, संस्थेचे सचिव शेषराव खाडे, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले आदी उपस्थित होते.

भाऊसाहेबांचा भारतरत्न देऊन सन्मान करादेशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी आणि शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे. राज्यात दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकाची श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून त्याद्वारे गाव, खेड्यात शाळा, महाविद्यालयांची निर्मिती केली. बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे केंद्र सरकारने डॉ. भाऊसाहेबांना ‘भारतरत्न’ उपाधीने सन्मानित करावे, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी प्रास्ताविकातून केली.

 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीagricultureशेती