शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

कृषी सिंचनाचे पाणी महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 23:43 IST

स्थानिक स्वराज्य संस्था वगळता कृषीसह व्यावसायिक पाण्याच्या वापरासाठी दरवाढ जलसंपदा विभागाने प्रस्तावित केली आहे.

ठळक मुद्देदरवाढ प्रस्तावीत : यंदा कमी पावसाच्या सरासरीनंतर नवे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक स्वराज्य संस्था वगळता कृषीसह व्यावसायिक पाण्याच्या वापरासाठी दरवाढ जलसंपदा विभागाने प्रस्तावित केली आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याने कृषी सिंचनासाठी पाण्याची दरवाढ होणार असल्याने रबी हंगामापूर्वीच शेतकºयांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.यापूर्वी देखील २०१० ते २०१३ व २०१३ ते २०१६ या कालावधीसाठी पानी वापरासाठी दरवाढ करण्याचे जलसंपदा विभागाने प्रस्तावित केले होते मात्र तत्कालीन आघाडी सरकारने जलसंपदा विभागाचा हा प्रस्ताव नाकारला होता. त्यामुळे सध्याचे राज्य सरकार ही दरवाढ करते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सिंचन योजनांच्या व्यवस्थापनावर हा पाणी वसुलीपेक्षा जास्त खर्च होत असल्याने ही दरवाढ प्रस्तावित केली असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.वसुली रखडल्याने प्रकल्पांच्या देखभाल दुरूस्तीवर पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. याचा थेट परिणाम पाणी वितरणावर होतो. ही बाब शासनाने मान्य केली आहे. त्येत्या २०१७ ते २०१९ या कालावधीत राज्यात किमान ९११ कोटी रूपयांचा देभाल दुरूस्तीचा खर्च अपेक्षित आहे.यामध्ये शेतीसाठी१७५ कोटी, घरगुती वापरासाठी २०० कोटीव औद्योगीक वापराला किमान ५६० कोटी रूपये लागणार आहे. प्रकल्प व योजनांचा वाढत्या खर्चाचा डोलारा कसा सांभाळायचा, हा प्रश्न जलसंपदा विभागासमोर उभा ठाकला असल्याने वाढ प्रस्तावित केली आहे. या प्रस्तावानुसार शेतीच्या पाणी वापरावर २० टक्के, महापालीका क्षेत्रातील घरगुती वापरावर १४.३ टक्के, उद्योगासाठी किमान ४० टक्के वाढ प्रसतावित आहे व २०१९ नंतर पुढील दरात सुधारणा होईपर्यत दरवर्षी १० टक्कयांनी वाढ केली जाणार आहे.शेतीसाठी पाणी वापराचे नवे दरजलसंपदा विभागाच्या दरवाढीच्या नव्या प्रसतावानुसार शेतीच्या पाणी वापराचे नवे दर हंगाम व वर्गवारीनुसार वेगवेगळे राहणार आहे. यामध्ये प्रवाही पाण्याच्या सिंचनासाठी सहकारी पानी संस्थांना खरीप हंगामाच दर ३ रूपये ६० पैसे प्रति घनमिटर, रब्बी हंगामाला ७ रूपये २० पैसे प्रति घनमिटर,तर उन्हाळ्यात १० रूपये ८० पैसे राहणार आहे.वैयक्तीक लाभ धारकासाठी या तीनही हंगामासाठी ४ रूपये ५० पैसे, नऊ रूपये व १० रूपये ९६ पैसे प्रति घनमिटर राहणार आहे.