शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अपर आदिवासी विकास विभागीय कार्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या

By उज्वल भालेकर | Updated: January 3, 2024 20:18 IST

वसतिगृहातील विविध समस्या तसेच डीबीटी संदर्भात प्रशासनाला विचारला जाब

अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ असलेल्या आदिवासी वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना डीबीटीचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. तसेच वसतिगृहातही आवश्यक सोयी-सुविधा नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील सर्वच आदिवासी वसतिगृहांतील शेकडो विद्यार्थ्यांनी बुधवारी अपर आदिवासी विकास विभाग कार्यालय गाठून आंदोलन केले. परंतु, सकाळी ११ वाजता कार्यालयात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांची दुपारी ४ पर्यंतही अधिकाऱ्यांनी विचारपूस केली नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शहरी भागात उच्च शिक्षण घेता यावे, याकरिता एक हजार विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृह चालविण्यात येत आहे; परंतु, शहरातील आदिवासी वसतिगृहाची स्वत:ची इमारत नसून भाड्याच्या इमारतीमध्ये ही वसतिगृहे आहेत. या वसतिगृहांमध्ये आवश्यक सोयीसुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वसतिगृहातील समस्यांसंदर्भात आदिवासी विकास विभागाला वारंवार अवगत करूनही संबंधित अधिकारी वर्ग कोणतीही दखल घेत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. 

शासनाच्या २०११ च्या शासन निर्णयानुसार, प्रत्येक वसतिगृहात स्वतंत्र ग्रंथालय, १० विद्यार्थ्यांमागे एक काॅम्प्युटर व इंटरनेट सुविधा, प्रत्येक वसतिगृहात स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टर बसविणे, दर महिन्यातून एक वेळा विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे, व्यायामासाठी जीमची व्यवस्था करणे, दररोज वसतिगृहाची स्वच्छता, स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकांची सुविधा त्याचबरोबर चार ते पाच वृत्तपत्रे अशा सुविधा देणे अपेक्षित आहे; परंतु, वसतिगृहात यापैकी कोणत्याच सुविधा नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या डीबीटीचे पैसेही अजूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यात पडलेले नाहीत. त्यामुळे या सर्व मागण्यांना घेऊन पुन्हा एकदा शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी अपर आदिवासी विकास विभाग गाठून आंदोलन केले. परंतु, या आंदोलनानंतरही विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अमरावती ते धारणी आदिवासी प्रकल्प कार्यालयापर्यंत पायदळ मार्च काढण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती