शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

‘न्हाइ’च्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध वनगुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:48 IST

वरूड वनपरिक्षेत्र हद्दीतील पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणात राखीव, संरक्षित क्षेत्रातील सुमारे ३०९ वृक्ष अवैधरीत्या कापल्याप्रकरणी अकोला येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय - न्हाइ) चे कार्यकारी अभियंता आर.बी. झाल्टे यांच्याविरुद्ध वनगुन्हा नोंदविला आहे.

ठळक मुद्देराखीव वनातील अवैध वृक्षकटाई: ४५ लाखांचे लाकूड जप्त; पर्यावरण परवानगीला खो

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: वरूड वनपरिक्षेत्र हद्दीतील पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणात राखीव, संरक्षित क्षेत्रातील सुमारे ३०९ वृक्ष अवैधरीत्या कापल्याप्रकरणी अकोला येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय - न्हाइ) चे कार्यकारी अभियंता आर.बी. झाल्टे यांच्याविरुद्ध वनगुन्हा नोंदविला आहे. हे वृक्ष कापताना पर्यावरण खात्याची परवानगी घेण्यात आली नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.वरूड-पांढुर्णा हा रस्ता राखीव वनांतून जात असला तरी रस्त्याचा उजवा भाग हा सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या ताब्यात दिला आहे. मात्र, वृक्षांची मालकी ही वनविभागाची आहे. असे असताना केंद्र सरकारची पूर्वपरवानगी न घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राखीव, संरक्षित क्षेत्रातील ३०९ झाडे अवैधरीत्या कापली आहेत. ही बाब वरूड वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच कार्यकारी अभियंता झाल्टे यांच्याविरुद्ध १६ जानेवारी रोजी प्राथमिक वनगुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून इमारती, बल्ली, जळाऊ असे एकूण ८९ घनमीटर सागवान लाकूड जप्त केले आहे. त्याचे बाजारमूल्य ८९ लाख रुपये असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. महामार्गालगत वृक्षाचे मूल्यांकन व मोजणी वनविभागाने केली. त्यानंतर वृक्षाचे मूल्यनिर्धारण करण्यात आले. त्यानुसार त्याच परिक्षेत्रातून वृक्ष कापण्याची परवानगी दिली गेली. मात्र, वृक्ष कापण्याची प्रक्रिया आटोपल्यानंतर पुसला- चांदुरी मार्ग राखीव वनांतून जात असल्याचे वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानुसार वृक्ष कापण्यात आलेल्या घटनास्थळाचे वनविभागाने नकाशे तपासले. मोजणीसाठी पीडीए यंत्र असताना अवैधरीत्या वृक्ष कापल्याचे वनाधिकाऱ्यांच्या निदर्शनास येऊ नये, ही बाब आर्श्चयकारक मानली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते निर्मिती कंत्राटदारांना कशाच्या आधारे राखीव वनक्षेत्रातून वृक्ष कापण्याची परवानगी दिली, याबाबत शंका उपस्थित होत आहे.वनअधिनियम संवर्धन तरतुदीचा भंग...: वरूड-पांढुर्णा या महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरणास प्रारंभ करण्यापूर्वी राखीव वनक्षेत्रातील वृक्ष अवैधरीत्या कापण्यात आल्याप्रकरणी वनसंवर्धन अधिनियम १९८०, भारतीय वनअधिनियम १९२७ आणि जैवविविधता अधिनियम २००२ मधील अनेक तरतुदींचे उल्लंघन झाले आहे. मात्र, न्हाइच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध वनगुन्हा नोंदविताना भारतीय वन अधिनियमांचा उलेख करण्यात आलेला नाही.वरुड-पांढुर्णा महामार्ग सिमेंट काँक्रीटीकरणात काही वृक्ष कापल्याप्रकरणी प्राथमिक वनगुन्हा नोंदविला आहे. वनविभागाने तसे कळविले असून, कापल्या गेलेल्या वृक्षांची हद्दीची मालकी स्पष्ट करण्याचे सांगितले आहे.- आर.बी. झाल्टेकार्यकारी अभियंता,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अकोला.