शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
"प्रत्येक सनातनीला माझा संदेश...", राकेश किशोर यांच्याजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली
4
आरोग्य विमा की मेडीक्लेम? गंभीर आजार, ओपीडी आणि मॅटर्निटी कव्हरेज कशात मिळते, दोन्हीत किती फरक?
5
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
6
सात युद्धे थांबवल्याचा दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल नाहीच; कुणाला मिळाला 'शांतता पुरस्कार'
7
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
8
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
9
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
10
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
11
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
12
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
13
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
14
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
15
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
16
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
17
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
18
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
19
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
20
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?

पुन्हा दिशाभूल, ८९ टक्के कपाशीचा विमाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:08 IST

यंदा गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपयांची मदत देण्याचे कृषिमंत्र्यांनी जाहीर केले.

ठळक मुद्देकशी मिळेल भरपाई? : बोंडअळीने नुकसान, मदतीचा दावा खोटा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपयांची मदत देण्याचे कृषिमंत्र्यांनी जाहीर केले. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील कपाशीच्या पेरणी क्षेत्रापैकी ८९.११ टक्के क्षेत्राचा पीक विमाच नाही; त्यामुळे भरपाई कशी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मदतीच्या नावावर शासनाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.बोंड अळीने बाधित क्षेत्राला दोन हेक्टर मर्यादेत ३० हजार ८०० रुपये मदत देण्याची घोषणा २२ डिसेंबरला शासनाने केली. यामध्ये पीक विम्याच्या भरपाईसाठी आठ हजार रुपये मदत देणार असल्याचे स्पष्ट केले. वास्तविक, पीक विम्याची भरपाई ही उंबरठा उत्पन्न जाहीर झाल्यानंतर विमा संरक्षित रकमेच्या प्रमाणात व प्रत्यक्ष नुकसानाच्या आधारावर कंपनीद्वारा जाहीर करून परस्परच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. किंबहुना यामध्ये शासनाचा हस्तक्षेप राहत नाही. या पार्श्वभूमीवर शासनाने हेक्टरी ८ हजारांच्या विमा मदतीची घोषणा केल्यामुळे ही बाब प्रामुख्याने चर्चेत आली. जिल्ह्यात यंदाच्या खरिपात कपाशीच्या एकूण २ लाख ७ हजार ४५७ हेक्टर क्षेत्रापैकी फक्त २२ हजार ८४५ हेक्टरवरील कपाशी विमा संरक्षित आहे. त्यामुळे १ लाख ८४ हजार ६१२ हेक्टर क्षेत्राला विम्याची मदत मिळू शकणार नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे.यंदा आॅक्टोबरनंतर बीटी कपाशी पात्या-फुलांवर असताना गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर अटॅक झाला. यामुळे जिल्ह्यातील किमान दीड लाख हेक्टरवरील कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही भागात तर नुकसानाची पातळी ९६ टक्क््यांवर असल्याचे कृषी विभागाच्या पंचनाम्यात स्पष्ट झाले. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा बियाणे कंपन्यांनी लाभ घेतला व दुय्यम दर्जाचे बियाणे शेतकºयांच्या माथी मारले. बोंडअळी प्रतिरोधी जिन्सचा अभाव असल्याने कपाशीची बोंडे अळींनी पोखरली. यामुळे सरासरी उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांनी घट झाली. शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी बाधित कपाशीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिलेत. प्रत्यक्षात तीन आठवड्यांपासून पंचनामेदेखील पूर्ण झालेले नाहीत. शासनाने बाधित कपाशीसाठी मदत जाहीर केली. यामध्येही शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे.विमा नसलेल्या क्षेत्राला मदत केव्हा?यंदाच्या हंगामात कपाशीच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी ८९ टक्के क्षेत्राचा विमा शेतकºयांनी संरक्षित केलेला नाही. अशा १ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्राला तुटपुंज्या ‘एनडीआरएफ’च्या व्यतिरिक्तही मदत व्हावी, यासाठी शासन मदतीच्या प्रतीक्षेत असणाºया शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. फक्त २२ हजार ८४५ हेक्टरला मदत मिळणार आहे. तीदेखील शासनाच्या घोषणेप्रमाणे की कंपनीच्या निकषाप्रमाणे, हे देखील स्पष्ट झालेले नाही.