शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

पुन्हा एखादा ‘विजय’ हिरावू नये म्हणून...!

By admin | Updated: November 18, 2015 00:15 IST

‘आमचे घर उद्ध्वस्त झालेय, मुलांचे पितृछत्र हरपलेय, आम्ही निराधार झालोय, आता मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी जगायचे आहे.

नीता नकाशेंची कळकळ : न्यायासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणारअमरावती : ‘आमचे घर उद्ध्वस्त झालेय, मुलांचे पितृछत्र हरपलेय, आम्ही निराधार झालोय, आता मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी जगायचे आहे. मात्र, ज्यांच्या अरेरावी आणि मुजोरीने सरांचा बळी घेतला, त्यांच्यावर जरब बसावी आणि यानंतर कोणत्याही शिक्षकाचा‘विजय नकाशे’ होऊ नये, यासाठी ‘त्या’ दोषी आमदारांसह सर्व अधिकाऱ्यांना कडक शासन व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत, अशी बांधिलकी मृत विजय नकाशे यांच्या पत्नी नीता नकाशे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. नकाशे सरांच्या आत्महत्येचा प्रश्न राज्यस्तरावर गाजतो आहे. खासदार, आमदारांनी आमच्या कुटुंबाची भेट घेतली. मात्र, अद्यापही पीआरसीवर गुन्हा दाखल झालेला नाही. या पीआरसी सदस्यांवर गुन्हा नोंदवून कडक कारवाई करावी, अशी मागणी नीता नकाशे यांनी लावून धरली आहे. निर्दोष शिक्षकाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे काहीच वाकडे होऊ शकत नाही, असा संदेश या घटनेतून जायला नको, अशी कळकळ नीता नकाशे यांनी व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या, आतापर्यंत नोकरीची गरज भासली नाही. मात्र, आता मुलांच्या भवितव्यासाठी नोकरी करावीच लागेल. तशी मानसिकता तयार केली आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च शासनाने उचलावा, अशी आग्रही मागणीसुद्धा नीता नकाशे यांनी केली आहे. २००१ साली सून म्हणून नीता या नकाशे कुटुंबात आल्या. पतीच्या निधनानंतर त्यांच्यावर १४ वर्षीय विनित आणि १२ वर्षीय नवेन या दोन मुलांची जबाबदारी आली आहे. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी पीआसीच्या धसक्याने नीता यांच्या पतीचा बळी घेतला. ‘तो’ निरोप शेवटचाच !५ नोव्हेंबरला पीआरसी येणार म्हणून विजय नकाशे २ नोव्हेंबरला म्हणजे सोमवारी सेमाडोहकडे रवाना झाले. त्या दिवशी पहाटे ६ वाजता नीता यांनी त्यांना शेगाव नाक्यावर सोडले. तीच त्यांची शेवटची भेट ठरली. सेमाडोहमध्ये मोबाईलला रेंज मिळत नसल्याने संपर्कही झाला नाही. त्यानंतर थेट ७ नोव्हेंबरला त्यांचे पार्थिवच पाहायला मिळाले. २ नोव्हेंबरपासून संवादच झाला नाही. सहाव्या दिवशी त्यांचे पार्थिवच समोर आल्याचे सांगताना नीता नकाशेंना अश्रू आवरत नव्हते. पप्पा शाळेत गेलेत!नकाशे दाम्पत्याची विनीत आणि नवेन ही दोन्ही मुले त्यांच्या पप्पांच्या मृत्यूबाबत अनभिज्ञ आहेत. पप्पा देवाघरी गेल्याची सुतराम कल्पना सुध्दा त्यांना नाही. पप्पा शाळेत गेलेत, शनिवारी संध्याकाळी परत येतील, असा त्यांना अद्यापही विश्वास आहे.