शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सोयाबीनच्या पंचनाम्याचे आदेश, शासनाचे ‘वरातीमागून घोडे’

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: October 11, 2023 18:13 IST

कालावधी झाल्याने पीक करपले : कृषी विभागासमोर झाला पेच

अमरावती : १०० दिवसांचे पीक असणाऱ्या सोयाबीनचा कालावधी संपल्याने पिवळे होऊन नैसर्गिकरीत्या करपायला लागले आहे. अशा परिस्थितीत शासनाने येलो मोझॅक, खोडकूज व मूळकूज बाधित पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोंगणीच्या स्थितीतील सोयाबीनचे पंचनामे कसे करावेत, हा पेच कृषी विभागासमोर उभा ठाकला आहे.

ऑगस्ट महिन्यातील पावसाचा खंड व त्यात ‘येलो मोझॅक’ या रोगाचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन पीक पिवळे पडून करपायला लागले आहे. यासह खोडकूज, मूळकूज या रोगांचाही प्रादुर्भाव पिकावर झालेला आहे. यासाठी पीक विम्याचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे प्राधान्याने पंचनामे करण्याचे आदेश मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये दिले आहेत व याअनुषंगाने महसूल विभागाने ९ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन बाधित सोयाबीनच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात किमान ३० ते ४० हजार हेक्टरमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. यामध्ये धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यात याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. तसे पाहता सर्वच तालुक्यांतील सोयाबीन या रोगामुळे काही प्रमाणात पिवळे पडले असल्याच्या शेतकऱ्यांच्या कृषी विभागाकडे तक्रारी आहेत. मात्र पंचनाम्याचे आदेश उशिरा आल्याने संयुक्त पंचनाम्यासाठी यंत्रणांसमोर पेच निर्माण झालेला आहे.सोयाबीनचा १०० दिवसांचा कालावधी पूर्ण

सोयाबीन पीक हे साधारणपणे ९५ ते १०० दिवसांचे गृहीत धरण्यात येते व पेरण्यांना उशीर झाला असला तरी बहुतेक भागांत पिकांचा कालावधी पूर्ण झालेला आहे व पीक नैसर्गिकरीत्या पिवळे पडून करपायला लागले आहे. त्यामुळे बाधित पीक कोणते?, हे लक्षात येत नाहीत, शासनाचा उद्देश जरी चांगला असला तरी उशीर झाल्याने फारसे साध्य होणार नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCrop Insuranceपीक विमा