शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

सोयाबीनच्या पंचनाम्याचे आदेश, शासनाचे ‘वरातीमागून घोडे’

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: October 11, 2023 18:13 IST

कालावधी झाल्याने पीक करपले : कृषी विभागासमोर झाला पेच

अमरावती : १०० दिवसांचे पीक असणाऱ्या सोयाबीनचा कालावधी संपल्याने पिवळे होऊन नैसर्गिकरीत्या करपायला लागले आहे. अशा परिस्थितीत शासनाने येलो मोझॅक, खोडकूज व मूळकूज बाधित पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोंगणीच्या स्थितीतील सोयाबीनचे पंचनामे कसे करावेत, हा पेच कृषी विभागासमोर उभा ठाकला आहे.

ऑगस्ट महिन्यातील पावसाचा खंड व त्यात ‘येलो मोझॅक’ या रोगाचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन पीक पिवळे पडून करपायला लागले आहे. यासह खोडकूज, मूळकूज या रोगांचाही प्रादुर्भाव पिकावर झालेला आहे. यासाठी पीक विम्याचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे प्राधान्याने पंचनामे करण्याचे आदेश मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये दिले आहेत व याअनुषंगाने महसूल विभागाने ९ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन बाधित सोयाबीनच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात किमान ३० ते ४० हजार हेक्टरमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. यामध्ये धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यात याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. तसे पाहता सर्वच तालुक्यांतील सोयाबीन या रोगामुळे काही प्रमाणात पिवळे पडले असल्याच्या शेतकऱ्यांच्या कृषी विभागाकडे तक्रारी आहेत. मात्र पंचनाम्याचे आदेश उशिरा आल्याने संयुक्त पंचनाम्यासाठी यंत्रणांसमोर पेच निर्माण झालेला आहे.सोयाबीनचा १०० दिवसांचा कालावधी पूर्ण

सोयाबीन पीक हे साधारणपणे ९५ ते १०० दिवसांचे गृहीत धरण्यात येते व पेरण्यांना उशीर झाला असला तरी बहुतेक भागांत पिकांचा कालावधी पूर्ण झालेला आहे व पीक नैसर्गिकरीत्या पिवळे पडून करपायला लागले आहे. त्यामुळे बाधित पीक कोणते?, हे लक्षात येत नाहीत, शासनाचा उद्देश जरी चांगला असला तरी उशीर झाल्याने फारसे साध्य होणार नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCrop Insuranceपीक विमा