शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

भरती बंदोबस्तानंतर पोलिसांवर नाकाबंदीचीही जबाबदारी

By admin | Updated: April 4, 2016 00:38 IST

पोलीस भरती प्रक्रिया शिस्तबध्द व पारदर्शक होण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्तांनी पध्दतशीर नियोजन केले आहे.

अमरावती : पोलीस भरती प्रक्रिया शिस्तबध्द व पारदर्शक होण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्तांनी पध्दतशीर नियोजन केले आहे. त्याकरिता आठ तास पोलिसांचा चोख बंदोबस्त सुध्दा लावला. मात्र, भरती प्रक्रियेत सेवा दिल्यानंतरही पोलिसांना नाकाबंदीची जबाबदारी सोपविली जात असल्यामुळे कर्मचारी वैतागले आहेत. २९ मार्चपासून शहर, ग्रामीण व एसआरपीएफ पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात पार पडत आहे. भरतीदरम्यान कोणत्याही अनोळखी व्यक्तिला मैदानात प्रवेश नसून प्रवेशद्वारावर पोलीस तैनात आहेत. प्रत्येकाची नोंद घेणे, ओळखपत्र लावणे, अशा बाबींकडेही विशेष लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांना भरतीप्रक्रिया सुरु होण्यापूर्वी अर्धातास आधीच हजर राहण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे पोलिसांना वेळेचे काटेकोर नियोजन करावे लागते. पहाटेपासून ते रात्रीपर्यंत पोलीस भरतीप्रक्रियेत व्यस्त असतात. मात्र, हे काम संपल्यानंतर या कर्मचाऱ्यांना नाकाबंदीची अतिरिक्त जबाबदारी सांभाळावी लागते. आठ तास सेवा दिल्यानंतर आणखी दोन तास पोलिसांना नाकाबंदीचे काम करावे लागते. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन करताना पोलिसांची दमछाक होत आहे.चालान बुक केव्हा?४वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांजवळचे चालान बुक काढून घेण्यात आल्याने टगेखोर वाहनचालक या पोलिसांना टाटा-बाय-बाय करीत निघून जातात. चालान बुक नसल्याने एका छोट्या रजिस्टरवर संबंधित वाहनचालकाची नोंद करण्यापर्यंत वाहतूक पोलिसांचे काम मर्यादित झाले आहे. चालान बुक नसल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना दंड सुध्दा देता येत नाही. पोलीस भरतीत दिवसभर काम नसते. काही वेळ पोलिसांना विश्रांती मिळतेच. भरतीप्रक्रियेत पोलिसांसाठी जेवण, नाश्ता, चहापाण्याची सर्व सोय करण्यात आली आहे. त्यामुळे सायंकाळनंतर तासभर नाकाबंदीचे काम दिले जात आहे. ही जबाबदारी पार पाडणे त्यांच्यासाठी काही अवघड नाही. - मोरेश्वर आत्राम,पोलीस उपायुक्त.