शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीनंतर तूरबंदी हे मोठे संकट

By admin | Updated: April 26, 2017 00:14 IST

शेतकऱ्यांजवळील शेवटचा तुरीचा दानाही शासन खरेदी करेल, अशी ग्वाही देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला.

तत्काळ तूर खरेदीची मागणी : विभागीय आयुक्तांच्या दालनात बच्चू कडूंचा ठिय्याअमरावती : शेतकऱ्यांजवळील शेवटचा तुरीचा दानाही शासन खरेदी करेल, अशी ग्वाही देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. जेवढी तूर खरेदी केली त्यापेक्षा अधिक तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. तूर खरेदी बंद, हे नोटाबंदीनंतरचे सर्वात मोठे संकट आहे, असा आरोप करीत आ. बच्चू कडू यांनी मंगळवारी विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांच्या दालनात ठिय्या दिला.केंद्रावर अद्याप अडीच लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतिक्षेत आहे व यापेक्षा अधिक तूर शेतकऱ्यांच्या घरी आहे. खरीपाच्या तोंडावर शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. मुलांचे शिक्षण, घरातील लग्नकार्य कसे करावे या विवंचनेत शेतकरी आहे. अश्या परिस्थितीत शासनाने तूर खरेदी बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होणार आहे. शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न झालं, हे सरकारच्या डोळ्यात खुपते काय? असा सवाल आ. कडू यांनी केला.दोन महिने तुरीचे पेमेंट मिळत नाही, कधी बारदाना नाही तर कधी गोदामांची कमी, अशी किती कारणे सरकार सांगणार आहेत. ‘त्या’ शेतकऱ्यावर होणार गुन्हा दाखलअमरावती : जिल्ह्यात जितके तुरीचे उत्पादन झाले त्यापैकी ५० टक्के तूर व्यापाऱ्यांनी कमी भावाने खुल्या बाजारात खरेदी केली. साडेतीन लाख क्विंटल शासकीय तूर केंद्राद्वारे खरेदी केली व साधारणपणे तेवढीच तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. केंद्रावर महिना-महिना शेतकऱ्यांची तूर मोजणी होत नाही. मात्र व्यापाऱ्यांची या अवधीत कित्येक वेळा तूर खरेदी केल्या जाते असा आरोप आ. कडू यांनी केला. जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रावरील तुरीची खरेदी केली जाईल, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगताच आ. कडू यांनी ठिय्या आंदोलनाची सांगता केली. चांदूरबाजार येथील तूर खरेदी केंद्रावर एका शेतकऱ्याने एकाच सात-बारावर चार वेळा तूर विक्री केली. शेतकऱ्यांच्या नावाआड व्यापारी तूर विक्री करतात. आम्ही आंदोलन केले तर गुन्हे दाखल करता अन् व्यापाऱ्यांना मोकळं सोडता असे बोल आ. बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी के. आर. परदेशी यांना सुनावले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या शेतकऱ्यांवर तत्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)- तर मंत्र्याच्या घरी तुरीचे कुटार नेऊशासकीय तूर खरेदी केंद्रावरील तुरीची तत्काळ खरेदी करा या मागणीसाठी मंगळवारी विभागीय आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले व नंतर शासनाने शेतकऱ्यांची तूर खरेदी केली नाही, तर तुरीचे कुटार मंत्र्याच्या घरात नेऊन टाकू, हा आंदोलनाचा दुसरा टप्पा राहील, अशी माहिती आ. बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिली. व्यापाऱ्यांची गोदामे तपासण्याच्या सूचनाव्यापाऱ्यांनी कमी भावाने खुल्या बाजारातून तुरीची खरेदी केली व हीच तूर हमी भावाने शासनाला विकत आहे. यासाठी व्यापाऱ्यांच्या गोदामातील तुरीची पडताळणी करावी. तसेच शेतकऱ्यांच्या घरी किती तूर पडून आहे याची माहिती जाणून घ्यावी. जेणेकरून शेतकऱ्यांकडील तुरीचा अंदाज येईल, अशी सूचना आ. कडू यांनी विभागीय आयुक्तांना केली.