शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

नोटाबंदीनंतर तूरबंदी हे मोठे संकट

By admin | Updated: April 26, 2017 00:14 IST

शेतकऱ्यांजवळील शेवटचा तुरीचा दानाही शासन खरेदी करेल, अशी ग्वाही देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला.

तत्काळ तूर खरेदीची मागणी : विभागीय आयुक्तांच्या दालनात बच्चू कडूंचा ठिय्याअमरावती : शेतकऱ्यांजवळील शेवटचा तुरीचा दानाही शासन खरेदी करेल, अशी ग्वाही देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. जेवढी तूर खरेदी केली त्यापेक्षा अधिक तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. तूर खरेदी बंद, हे नोटाबंदीनंतरचे सर्वात मोठे संकट आहे, असा आरोप करीत आ. बच्चू कडू यांनी मंगळवारी विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांच्या दालनात ठिय्या दिला.केंद्रावर अद्याप अडीच लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतिक्षेत आहे व यापेक्षा अधिक तूर शेतकऱ्यांच्या घरी आहे. खरीपाच्या तोंडावर शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. मुलांचे शिक्षण, घरातील लग्नकार्य कसे करावे या विवंचनेत शेतकरी आहे. अश्या परिस्थितीत शासनाने तूर खरेदी बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होणार आहे. शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न झालं, हे सरकारच्या डोळ्यात खुपते काय? असा सवाल आ. कडू यांनी केला.दोन महिने तुरीचे पेमेंट मिळत नाही, कधी बारदाना नाही तर कधी गोदामांची कमी, अशी किती कारणे सरकार सांगणार आहेत. ‘त्या’ शेतकऱ्यावर होणार गुन्हा दाखलअमरावती : जिल्ह्यात जितके तुरीचे उत्पादन झाले त्यापैकी ५० टक्के तूर व्यापाऱ्यांनी कमी भावाने खुल्या बाजारात खरेदी केली. साडेतीन लाख क्विंटल शासकीय तूर केंद्राद्वारे खरेदी केली व साधारणपणे तेवढीच तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. केंद्रावर महिना-महिना शेतकऱ्यांची तूर मोजणी होत नाही. मात्र व्यापाऱ्यांची या अवधीत कित्येक वेळा तूर खरेदी केल्या जाते असा आरोप आ. कडू यांनी केला. जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रावरील तुरीची खरेदी केली जाईल, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगताच आ. कडू यांनी ठिय्या आंदोलनाची सांगता केली. चांदूरबाजार येथील तूर खरेदी केंद्रावर एका शेतकऱ्याने एकाच सात-बारावर चार वेळा तूर विक्री केली. शेतकऱ्यांच्या नावाआड व्यापारी तूर विक्री करतात. आम्ही आंदोलन केले तर गुन्हे दाखल करता अन् व्यापाऱ्यांना मोकळं सोडता असे बोल आ. बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी के. आर. परदेशी यांना सुनावले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या शेतकऱ्यांवर तत्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)- तर मंत्र्याच्या घरी तुरीचे कुटार नेऊशासकीय तूर खरेदी केंद्रावरील तुरीची तत्काळ खरेदी करा या मागणीसाठी मंगळवारी विभागीय आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले व नंतर शासनाने शेतकऱ्यांची तूर खरेदी केली नाही, तर तुरीचे कुटार मंत्र्याच्या घरात नेऊन टाकू, हा आंदोलनाचा दुसरा टप्पा राहील, अशी माहिती आ. बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिली. व्यापाऱ्यांची गोदामे तपासण्याच्या सूचनाव्यापाऱ्यांनी कमी भावाने खुल्या बाजारातून तुरीची खरेदी केली व हीच तूर हमी भावाने शासनाला विकत आहे. यासाठी व्यापाऱ्यांच्या गोदामातील तुरीची पडताळणी करावी. तसेच शेतकऱ्यांच्या घरी किती तूर पडून आहे याची माहिती जाणून घ्यावी. जेणेकरून शेतकऱ्यांकडील तुरीचा अंदाज येईल, अशी सूचना आ. कडू यांनी विभागीय आयुक्तांना केली.