शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

नवजातांच्या मृत्यूनंतरही डॉक्टरांचा किळसवाणा बचाव?

By admin | Updated: November 15, 2014 01:07 IST

नवजातांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा डफरीन रूग्णालयातील कारभार 'लोकमत'ने पुराव्यासह लोकदरबारात मांडल्यानंतर पायाखालची वाळू ...

अमरावती : नवजातांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा डफरीन रूग्णालयातील कारभार 'लोकमत'ने पुराव्यासह लोकदरबारात मांडल्यानंतर पायाखालची वाळू सरकलेल्या अधीक्षक डॉ.अरूण यादव यांनी चूक लपविण्यासाठी मानवतेचाच मुडदा पाडला. 'नवजाताचा पलंगावरून पडून मृत्यू' हे वृत्त लोकमतने शुक्रवारच्या अंकात प्रकाशित केले. या वृत्ताची संवेदनशीलपणे दखल घेऊन डॉक्टर असलेले अमरावतीचे आमदार सुनील देशमुख यांनी जिल्हा स्त्रि रुग्णालयात शुक्रवारी दुपारी तातडीची बैठक बोलविली. डफरिनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण यादव त्यांच्या चमूसह उपस्थित होते. नवजातांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे वास्तव लपविण्यासाठी डॉ.यादव यांनी सुनील देशमुख यांना 'थंड डोक्या'ने दिशाभूल करणारी माहिती दिली. क्षणभर सुनील देशमुखांचाही डॉ.यादवांनी दिलेल्या माहितीवर विश्वास बसला, इतक्या सुनियोजितपणे खोटी माहिती सादर करण्यात आली. खोटे काय? अचलपूरच्या कासमपुरा परिसरातील राणी राऊत यांची प्रसुती नव्हे, तर गर्भपात करण्यात आला. त्यामुळे त्यांचे नवजात अर्भक पलंगावरून पडून दगावण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, अशी माहिती डॉ. यादव यांनी आमदारांना दिली. खरे काय? प्रत्यक्षात राणी राऊत यांना सातव्या महिन्यांत असह्य प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या. वारंवार याचना करूनही डॉक्टर, परिचारिकांनी जराही लक्ष दिले नाही. राणी प्रसूत होण्याची चिन्हे दिसू लागल्यावर राणी यांच्या सासूबार्इंनी प्रसुतीसाठीचे परंपरागत बाह््य उपचार केलेत. डॉक्टर्स, नर्सेसविनाच राणी प्रसूत झाल्यात. सात महिन्यांचे जिवंत बाळ सुखरूप बाहेर आले. नंतर डॉक्टरांच्या देखरेखीत असताना राणी यांचे बाळ पलंगावरून पडले नि दगावले. राणी यांचे पहिले मूलही सातव्या महिन्यातीलच आहे. ते उत्तम आहे. दुसऱ्या खेपेसही राणी यांना सातव्या महिन्यातच प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. प्रकरण दुसरे: यादवांचा खोटारडेपणारिझवाना बी जावेद शहा (२४, रा. रहेमतनगर) यांना प्रसुती कळा आल्याच नाहीत. त्यांना इतर आजार असल्याने मृत्यू बाळ जन्माला आले, अशी माहिती दिली. असे आहे वास्तव!रिझवाना यांना घटनेच्या एक दिवस आधीच डफरीनमध्ये दाखल करण्यात आले होते. असह्य वेदनांनी त्या तडफडत होत्या. सिझेरियन करून टाका, अशी गयावया वारंवार करीत होत्या. डॉक्टरांनी लक्ष दिले नाही. कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेत. बाळ दगावले. आदल्या दिवशी, योग्य वेळेत प्रसुती करविली असती तर बाळ सुखरूप असते, असे रिझवानाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. ( प्रतिनिधी)