शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
2
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
3
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
4
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
5
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
6
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
7
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
8
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
9
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
11
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
12
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
13
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
14
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
15
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
16
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
17
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
18
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
19
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
20
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम

नवजातांच्या मृत्यूनंतरही डॉक्टरांचा किळसवाणा बचाव?

By admin | Updated: November 15, 2014 01:07 IST

नवजातांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा डफरीन रूग्णालयातील कारभार 'लोकमत'ने पुराव्यासह लोकदरबारात मांडल्यानंतर पायाखालची वाळू ...

अमरावती : नवजातांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा डफरीन रूग्णालयातील कारभार 'लोकमत'ने पुराव्यासह लोकदरबारात मांडल्यानंतर पायाखालची वाळू सरकलेल्या अधीक्षक डॉ.अरूण यादव यांनी चूक लपविण्यासाठी मानवतेचाच मुडदा पाडला. 'नवजाताचा पलंगावरून पडून मृत्यू' हे वृत्त लोकमतने शुक्रवारच्या अंकात प्रकाशित केले. या वृत्ताची संवेदनशीलपणे दखल घेऊन डॉक्टर असलेले अमरावतीचे आमदार सुनील देशमुख यांनी जिल्हा स्त्रि रुग्णालयात शुक्रवारी दुपारी तातडीची बैठक बोलविली. डफरिनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण यादव त्यांच्या चमूसह उपस्थित होते. नवजातांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे वास्तव लपविण्यासाठी डॉ.यादव यांनी सुनील देशमुख यांना 'थंड डोक्या'ने दिशाभूल करणारी माहिती दिली. क्षणभर सुनील देशमुखांचाही डॉ.यादवांनी दिलेल्या माहितीवर विश्वास बसला, इतक्या सुनियोजितपणे खोटी माहिती सादर करण्यात आली. खोटे काय? अचलपूरच्या कासमपुरा परिसरातील राणी राऊत यांची प्रसुती नव्हे, तर गर्भपात करण्यात आला. त्यामुळे त्यांचे नवजात अर्भक पलंगावरून पडून दगावण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, अशी माहिती डॉ. यादव यांनी आमदारांना दिली. खरे काय? प्रत्यक्षात राणी राऊत यांना सातव्या महिन्यांत असह्य प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या. वारंवार याचना करूनही डॉक्टर, परिचारिकांनी जराही लक्ष दिले नाही. राणी प्रसूत होण्याची चिन्हे दिसू लागल्यावर राणी यांच्या सासूबार्इंनी प्रसुतीसाठीचे परंपरागत बाह््य उपचार केलेत. डॉक्टर्स, नर्सेसविनाच राणी प्रसूत झाल्यात. सात महिन्यांचे जिवंत बाळ सुखरूप बाहेर आले. नंतर डॉक्टरांच्या देखरेखीत असताना राणी यांचे बाळ पलंगावरून पडले नि दगावले. राणी यांचे पहिले मूलही सातव्या महिन्यातीलच आहे. ते उत्तम आहे. दुसऱ्या खेपेसही राणी यांना सातव्या महिन्यातच प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. प्रकरण दुसरे: यादवांचा खोटारडेपणारिझवाना बी जावेद शहा (२४, रा. रहेमतनगर) यांना प्रसुती कळा आल्याच नाहीत. त्यांना इतर आजार असल्याने मृत्यू बाळ जन्माला आले, अशी माहिती दिली. असे आहे वास्तव!रिझवाना यांना घटनेच्या एक दिवस आधीच डफरीनमध्ये दाखल करण्यात आले होते. असह्य वेदनांनी त्या तडफडत होत्या. सिझेरियन करून टाका, अशी गयावया वारंवार करीत होत्या. डॉक्टरांनी लक्ष दिले नाही. कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेत. बाळ दगावले. आदल्या दिवशी, योग्य वेळेत प्रसुती करविली असती तर बाळ सुखरूप असते, असे रिझवानाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. ( प्रतिनिधी)