शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

युवकाच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे घटनास्थळ बदलविले

By admin | Updated: October 5, 2015 00:36 IST

विद्युत प्रवाहाने युवकाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवल्याचा प्रकार मासोद येथील शेतशिवारात शुक्रवारी रात्री घडला.

घातपाताचा संशय : मासोद शेतशिवारातील घटना अमरावती : विद्युत प्रवाहाने युवकाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवल्याचा प्रकार मासोद येथील शेतशिवारात शुक्रवारी रात्री घडला. सागर विनोद काळभांडे (२३,रा.मासोद) असे मृताचे नाव असून नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. सागर हा शुक्रवारपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचा भाऊ गौरव याने फे्रजरपुरा ठाण्यात केली होती. मात्र, शनिवारी सकाळी मासोद येथील एका पडीक शेतशिवारात सागर काळबांडेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. वन्यप्राण्यापासून शेतमालाचा बचाव करण्याकरिता शेतात तारेचे कुंपण लावून त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. त्या तारेच्या कुंपणात पाय अडकल्याने सागरला विद्युत प्रवाहाचा झटका बसला व त्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे. मात्र, ज्या ठिकाणच्या कुपंणाला सागरचा स्पर्श झाला. तेथून ५० मिटर अंतरावर सागरचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी पंचनामा केला असता सागरचा मृतदेह काळा पडल्याचे दिसून आले. त्यांचे पाय व हात भाजल्याचे आढळून आले आहेत. अधिक तपास सुरू आहे.सागरचा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या झटक्याने झाल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. घटनास्थळाचा पंचनामा केला असता घटनास्थळावरून मृतदेह हलविल्याचे आढळून येत आहे. त्या दिशेने पुढील तपास सुरू आहे. - जी.जी.सोळंके,पोलीस निरीक्षक,फे्रजरपुरा पोलीस ठाणे.